महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अयोध्येतील राममंदिरात होणाऱ्या रामलल्लााच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सोमवारी (२२ जानेवारी) कोल्हापूर परिसरातील सर्व मटण, मासे, चिकन विक्रीची दुकाने बंद ठेवावीत व सोहळयात सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय खाटिक समाज कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष विजय लक्ष्मणराव कांबळे यांनी केले आहे. खाटिक समाज कोल्हापूरचे अध्यक्ष किरण बाबूराव कोतमिरे व कार्यकारी मंडळ सदस्यांनीही या सोहळयाची पवित्रता जपण्यासाठी कोल्हापूर शहरातील सर्व मटण , चिकन, मासे विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवावीत असे म्हटले आहे. तसेच यादिवशी संस्थेतर्फे प्रसाद म्हणून बुंदी वाटप करण्यात येणार आहे.