महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या २०२३ मधील मुख्य परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांनी यश मिळवले. यामध्ये उत्तूर येथील वृषाली कांबळे,शाहूवाडी तालुक्यातील आशिष पाटील व कोल्हापुरातील फरहान जमादार यांचा समावेश आहे.
आजरा तालुक्यातील उत्तूर येथील २३ वर्षीय वृषाली संतराम कांबळे हिने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. देशभरात ३१० वी रॅक आहे. वृषाली राज्यशास्त्र विषयातील पदवीधर आहे. मुंबईतील सेंट झेव्हिअर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.
शाहूवाडी तालुक्यातील साळशी गावसे आशिष पाटील यांनी १४० व्या रँकने आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाले. पाटील हे सध्या दिल्ली, दिव-दमन येथे उपजिलहाधिकारी आहेत. यापूर्वी २०२१ व २०२२ मध्येही या परीक्षेत यश मिळवले होते.
ताराबाई पार्क येथील फरहान जमादान यांनी १९१ वा रँक मिळवला आहे. कदमवाडी येथील सुसंस्कार हायस्कूल येथे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाले. विवेकानंद कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण झाले. वालचंद कॉलेज सांगली येथून कम्प्युटर सायन्समधून इंजिनीअरिंगची पदवी घेतली.