महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
सर्व प्रकारच्या सुपर स्पेशियलिटी वैद्यकीय सुविधा कोल्हापुरातच उपलब्ध व्हाव्यात म्हणून सतत अग्रेसर असणाऱ्या अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सांगली परिसरातील ५५ वर्षीय रुग्ण अबरेच दिवस कालावधीपासून डायलेसिस उपचार घेत होता. आणि किडनी प्रत्यारोपण करणे हेच त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने गरजेचे होते. त्यांच्या पत्नीने त्यांना आपली एक किडनी देण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या पतीसोबत आपण या आजारपणात खंबीरपणे उभी असल्याची साक्ष दिली.
पहिल्या टप्प्यात शासकीय निकषांनुसार सर्व आवश्यक परवानगी घेतली गेली. यासाठी हॉस्पिटलमधील सर्व तज्ज्ञ, तसेच डॉ दिलीप माने, उपसंचालक व डॉ सतीश सूर्यवंशी सहायक संचालक (कोल्हापूर परिमंडळ - आरोग्य सेवा) अवयव प्रत्यारोपण समन्वयक व ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटीचे अमूल्य योगदान लाभले. २६ जानेवारी रोजी ३ तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमध्ये डॉ. राहुल पाटील, डॉ हनमशेट्टी, डॉ. दादा कोळी, डॉ. रोहित पाटील, डॉ. प्रवीण घुले, डॉ. टीना गांधी, डॉ शुभांगी पवार, डॉ अमोल धर्माधिकारी, व डॉ. बसवराज कडलगे या अनुभवी तज्ज्ञांच्या टीमचे योगदान महत्त्वाचे ठरले.
नुसते अवयव प्रत्यारोपण महत्वाचे नसून त्यानंतर लगेचच लागणारी उत्कृष्ट क्रिटिकल केयर व इन्फेक्शन कंट्रोलच्या सखोल निकषांचे पालन केल्याने रुग्ण अगदी सात दिवसांच्या आत पूर्ववत जीवनाकडे वाटचाल करत आहे. रुग्णाचे क्रियाटीनिन जे आधी ९ ते १३ दरम्यान राहत होते, ते आज नॉर्मल (१.१) आहे.
विशेष म्हणजे पहिलेच प्रत्यारोपण असूनही संपूर्ण प्रक्रिया ही अथायू हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या कोल्हापूर मधील तज्ज्ञांनीच पार पडली.