Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्ह्यातील ६१८ शाळा महिला शिक्षकाविना !  नजीकच्या शाळेतील शिक्षिकेवर किशोरी संवादची जबाबबारी !!सतेज पाटलांचे दोन्ही सत्ताधारी आमदारांना आव्हान, शंभर कोटीचे रस्ते कुठे गेले ? रस्त्यांच्या कामाची तपासणी करा !!सतेज पाटलांचे दोन्ही सत्ताधारी आमदारांना आव्हान, शंभर कोटीचे रस्ते कुठे गेले ! रस्त्याचे कामाची तपासणी करा !!ठेकेदाराचा हलगर्जीपणा, कनिष्ठ अभियंत्यांची कर्तव्यात कसूर ! फुलेवाडीतील इमारत दुर्घटना प्रकरण !!जिल्हा परिषद-पंचायत समित्यांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडतअग्निशमन इमारत दुर्घटनेच्या चौकशीसाठी महापालिकेने नेमली समितीसिनेट सदस्याचा पाठपुरावा, विद्यापीठात शिवछत्रपतींच्या जीवनकार्यावर ऑनलाइन अभ्यासक्रम सुरूअंबाबाई देवीची महिषासूरमर्दिनी रुपात पूजाकोल्हापूर फौंड्री क्लस्टरच्या सभासदासाठी आगामी काळात विविध प्रशिक्षण-चेअरमन दिपक चोरगेकोल्हापुरात चार-पाच ऑक्टोबरला रानभाज्या-सेंद्रिय उत्पादन महोत्सव

जाहिरात

 

सतेज पाटलांचे दोन्ही सत्ताधारी आमदारांना आव्हान, शंभर कोटीचे रस्ते कुठे गेले ? रस्त्यांच्या कामाची तपासणी करा !!

schedule01 Oct 25 person by visibility 132 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘सरकारमधल्या दोन्ही सत्ताधारी आमदारांना माझे आव्हान आहे शंभर कोटीचे रस्ते कुठे गेले ? रस्त्याचे काम योग्य दर्जाचे झाले की नाही याची तपासणी करा ? अधिकाऱ्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा इशारा देणारे आमदार राजेश क्षीरसागर यांचे काहीतरी काम राहिल असेल म्हणून ते अधिकाऱ्यांच्या वर हक्कभंग आणतो म्हणत असतील.’असा खोचक टोलाही आमदार सतेज पाटील यांनी लगाविला नुसते अधिकाऱ्यांना बोलण्याने आणि हक्क भंग आणतो वगैरे बोलून उपयोग नाही. तर त्यांनी आता लगेच हक्कभंग आणावा. असे आवाहनही त्यांनी क्षीरसागरांना केले.

आमदार सतेज पाटील हे एका बैठकीसाठी काँग्रेस कमिटी कार्यालयात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक राज येऊन या ऑक्टोबरला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, महानगरपालिकेचा सर्व कारभार आलबेल सुरू असल्याची टीका त्यांनी केली. प्रशासकांच्या काळात कोणाचा कोणाला पायपोस नाही. फुलेवाडी येथे अग्निशमन विभागाच्या इमारतीच्या कामाचे टेंडर कोणाच्या दबावाखाली देण्यात आले काय ? यांचे सत्य जनतेसमोर आले पाहिजे याबाबत महापालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी चौकशीचे आदेश दिले असले तरी या चौकशीमध्ये कोणालाही क्लीनचीट देऊ नये. अशी मागणीही केली.

दंड झालेला कॉन्ट्रॅक्टर खाडे

आमदार पाटील म्हणाले, ‘शहरातील पाणीपुरवठ्यावर राजकारण करण्याऐवजी आणि आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा शहरातील दोन्ही आमदारांनी प्रशासनाची बैठक घेऊन शहरातील पाणीपुरवठ्यासंबंधी तोडगा काढायला हवा. थेट पाईप लाईन मधून कोल्हापूर शहरासाठी किती पाणी मिळते याची आकडेवारी महानगरपालिकेकडे आहे. मात्र राजकारण न करता थेट पाईपलाईन मधून आलेल्या पाण्याचे वितरण कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे होईल, आणि त्यामध्ये असलेल्या त्रुटी महानगरपालिकेने काढल्या पाहिजे.कोल्हापूर शहरात गेल्या पाच वर्षापासून प्रशासकराज आहे. ज्यांना शहरात टाक्या उभा करण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले त्यांनी ते काम केलेले नाही. त्या बदल्यात त्यांना 23 कोटीचा दंड लावण्यात आला आहे, असे असताना विनाकारण आरोप करणे चुकीचे आहे. ज्यांना दंड लावले ते कॉन्ट्रॅक्टर खाडे आहेत. त्यांनी हा दंड माफ व्हावा यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. मात्र विनाकारण काहीही काढत असाल आणि तुम्ही एक माझ्या विरोधात बोलला तर मी सात तुमच्या विरोधात बोलेन.’

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes