Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
घघ मणकोल्हापूर महापालिकेसाठी सुमारे 70 टक्के मतदानडीवाय पाटील कृषी - तंत्र विद्यापीठाचा सोमवारी तिसरा दीक्षांत समारंभकार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी नेत्यांचे मतदान !लघु-मध्यम स्केल इंडस्ट्रीला प्रोत्साहित केल्यास नवीन उद्योजक घडतील – माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभूशाहूपुरीत भगवा झंझावात, प्रकाश नाईकनवरे, नीलिमा पाटील यांची जंगी रॅलीजिल्हा परिषदेसाठी पाच फेब्रुवारीला मतदान ! मतमोजणी सात फेब्रुवारीला !!प्रभाग क्रमांक अकरामध्ये भगवे वातावरण ! महायुतीचे शक्तीप्रदर्शन, रॅलीत हजारोंचा सहभाग ! !दमसातर्फे पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहनजिल्हा परिषदेच्या निवडणुकींची आज दुपारी घोषणा

जाहिरात

 

घघ मण

schedule16 Jan 26 person by visibility 1 category

क्रिडाई कोल्हापूर आयोजित वास्तू विषयक प्रदर्शन (दालन) मंडप उभारणीस सुरुवात

क्रिडाई कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिक सर्वोच्च शिखर संघटना असून क्रिडाई कोल्हापूर तर्फे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे बांधकाम व वास्तू विषयक प्रदर्शन (दालन)दि. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान महासैनिक दरबार हाॅल ग्राउंड येथे आयोजित करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचा मंडप उभारणी कार्याचा शुभारंभ क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत यांच्या शुभ हस्ते व दालनचे चेरमन महेश यादव, व्हा. चेरमन आदित्य बेडेकर,समन्वयक निखिल शाह क्रिडाई चे सेक्रेटरी गणेश सावंत, दालन सेक्रेटरी संग्राम दळवी तसेच दालनचे पदाधिकारी सभासद यांच्या उपस्थितीत रविवार दि. 11/01/2026 रोजी संपन्न झाला. क्रिडाई अध्यक्ष सौ व श्री के. पी.खोत यांच्या हस्ते मंडप उभारणी कार्याचे भूमिपूजन करण्यात आले.
क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष श्री. के. पी. खोत यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलताना संघटनेच्या 35 वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेत क्रिडाई ने बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासण्याबरोबर शहराचा विकासात केलेल्या भरीव कार्यावर प्रकाश टाकला. दालन बदल माहिती देताना या दालनचे वैशिष्ट म्हणजे सन 1992 साली बांधकाम विषयक प्रदर्शनाची सुरुवात झाली. यंदाचे *दालन* 2026 हे क्रिडाई कोल्हापूर तर्फे भरवले जाणारे 13 वे दालन आहे. या दालनचे *उदघाटन*शुक्रवार दि 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11. वाजता होणार आहे. दालन 2026 विषयी माहिती देताना दालन चे चेअरमन श्री. महेश यादव यांनी या प्रदर्शनाचा मुख्य हेतू कोल्हापूर व परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली नवनवीन बांधकाम प्रकल्प व तत्रंज्ञान, बांधकाम विषयक साहित्य, सेवा अर्थसाहाय्य योजना यांची माहिती मिळणार असून घराचे स्वप्न प्रत्यक्षात सत्यात उतरविण्यात या प्रदर्शनाचा मोठा फायदा होणार असून याचे लक्ष यंदा संधी सर्वांसाठी असे आहे. 

या दालनचे प्रायोजक पुढीलप्रमाणे -
प्लॅटिनम स्पॉन्सर -1) आर्या स्टील्स् रोलिंग प्रा. लि

*डायमंड स्पॉन्सर- 1)इटाका सिरमिक्स 2)एसकॉन इस्पत प्रेस्टिज एल एल पी.

गोल्ड स्पॉन्सर (बिल्डर्स)1)केवेस्ट इन्फ्रा अँड हायवेस्ट डेव्हलपर्स
गोल्ड स्पॉन्सर- 1) अविष्कार इन्फ्रा  2)मोटो टाईल्स 3) स्टेट बँक ऑफ इंडिया 4)यश पॉली 5) सिम्पोलो टाईल्स 

*सिल्वर स्पॉन्सर-1)विन्डो एक्स्पर्ट  2) एच आर विंडटेक ( व्ही इ के प्रा. ली. 3)तेजस इंडस्ट्रिज 4)युनियन बँक ऑफ इंडिया

सेमी कॉ स्पॉन्सर 1) फेराकॉल 2) स्मॅश इलेव्हटर  3)बँक ऑफ इंडिया 4) एनएन आयटी कार पार्किंग सिस्टीम प्रा. ली. 5) वोक्स इंटेरियर आणि एक्सटेरियर  सोलुशन प्रा. ली. 6)हायड्रा पार्क 7)ग्रेट व्हाईट ग्लोबल 8) पॅरीवेअर रोका 9) लिशा स्वीचेस 10) ओटीस इलेव्हटर्स 11) कोने इलेव्हटर्स वरील सर्व प्रयोजकांची दालन 2026 यशस्वी होण्यासाठी मदत  लाभली आहे.

कोल्हापूर परिसरातील सिव्हिल इंजिनीरिंगच्या विद्यार्थी याच्यासाठी शनिवार दि. 31 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता टेक्निकल सेमिनार आयोजित केले असून, रविवार दिनांक 1 फ्रेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सुसंवाद साधणार आहेत. सांगता समारंभ सोमवार दिनांक 2 फ्रेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता होणार आहे 

    या कार्यक्रमास क्रिडाई कोल्हापूर अध्यक्ष के. पी.खोत  उपाध्यक्ष प्रकाश देवालापूरकर, चेतन वसा,सचिव गणेश सावंत, खजानिस अजय डोईजड,दालन चेअरमन महेश यादव, व्हाईस चेअरमन आदित्य बेडेकर, समन्वयक  निखिल शाह, सह समन्वयक  पवन जामदार, दालन सचिव संग्राम दळवी, खजानिस अमोल देशपांडे,बिझनेस प्रोमोशन चेअरमन गौतम परमार,ग्राउंड कमिटी चेअरमन श्रीकांत पाटील, डिझाईन, प्रिटिंग कमिटी चेअरमन विजय माणगांवकर, हॉस्पीटीलिटी कमिटी चेअरमन केतन शाह, सोवियनर कमिटी चेअरमन संदीप बोरचाटे, स्टॉल ऑलॉकेशन कमिटी चेअरमन तुषार बेर्डे तसेच क्रिडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष विदयानंद बेडेकर, जेष्ठ सभासद कृष्णा पाटील, सुजय होसमनी, विवेकानंद पाटील,श्रेयांश मगदूम, शंकर गावडे,क्रिडाई कोल्हापूरचे सह खाजानिस सागर नालंग, संचालक प्रदीप भारमल,सुनील चिले,तसेच सभासद,प्रायोजक, स्टॉलधारक मोठ्या संख्येने हजर होते. शेवटी आभार प्रदर्शन सचिव गणेश सावंत यांनी केले.

भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन, नवोन्मेष तंत्रज्ञान विकासाची केंद्रे म्हणून कार्य करावे

schedule24 Dec 25 person by visibility 73 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासाची केंद्रे म्हणून कार्य केले पाहिजे. यासाठी उच्च शिक्षणाचा विस्तार आणि संशोधन उत्पादनात वाढ गरजेची आहे. शिवाय जागतिक ज्ञाननेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी भारताने आपल्या वेगाने वाढणाऱ्या उच्च शिक्षण व्यवस्थेचा आणि संशोधन क्षमतेचा प्रभावी उपयोग करणे आवश्यक आहे. शिवाजी विद्यापीठासारख्या संस्था प्रथमच विकसित होणाऱ्या तंत्रज्ञान, संशोधन निष्पत्ती आणि नावीन्यपूर्ण उत्पादनांच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावू शकतात’असे मत डॉ. जी सतीश  रेड्डी यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ बुधवारी, २५ डिसेंबर २०२५ रोजी दिमाखात पार पडला. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. रेड्डी यांनी, ‘भारतात एक हजारांहून अधिक विद्यापीठे असून सुमारे ४.३८ कोटी विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. आयआयटी, आयआयएम, एनआयटी आणि केंद्रीय विद्यापीठांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच संशोधन प्रकाशनांची संख्या आणि पीएच.डी. पदवीधारकांच्या संख्येत भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संस्थांनी गुणवत्ता व स्पर्धात्मकता वाढवून अधिकाधिक विद्यापीठांना जागतिक क्रमवारीतील अग्रभागी नेणे गरजेचे आहे.१०–१५ वर्षांपूर्वी जागतिक टॉप ५०० क्रमवारीत केवळ एक-दोन भारतीय संस्था असत, आज मात्र अनेक संस्था त्या यादीत असून काही टॉप १०० कडे वाटचाल करत आहेत.’असे त्यांनी नमूद केले.

 ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या आवाहनांमुळे क्षेपणास्त्रे, रडार, सोनार, टॉर्पेडो, एअरबॉर्न वॉर्निंग सिस्टीम्स, विमाने, पाणबुड्या, जहाजे, चिलखती वाहने, रणगाडे आणि तोफा अशा विविध क्षेत्रांत स्वदेशी क्षमता विकसित झाली आहे. पुण्यात टाटा आणि भारत फोर्ज यांनी डीआरडीओच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसित केलेली स्वदेशी तोफ—जिचा वापर लाल किल्ल्यावर औपचारिक समारंभात होतो—जागतिक स्तरावर उत्कृष्ट मानली जात असल्याचे त्यांनी सांगितले. ही बाब या परिवर्तनाचे प्रतीक आहे. उद्योगक्षेत्राने, विशेषतः खासगी कंपन्यांनी, संरक्षण संशोधन व उत्पादनात सक्रिय सहभाग घेऊन वाढत्या संधींचा लाभ घ्यावा.’असे आवाहन रेड्डी यांनी केले.  

शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी,  शिवाजी विद्यापीठाची गौरवशाली परंपरा, दर्जेदार व समताधिष्ठित शिक्षण देण्यातील त्याची भूमिका, तसेच पदवीप्राप्त विद्यार्थ्यांकडून समाजोपयोगी व जबाबदार नागरिक म्हणून अपेक्षित असलेली भूमिका यांचा सविस्तर ऊहापोह करण्यात आला. सातत्यपूर्ण अध्ययन, नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार, नैतिक मूल्यांची जोपासना आणि समाज व राष्ट्रासाठी—राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर—योगदान देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांवर आधारित गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि सामाजिक बांधिलकीचे केंद्र म्हणून शिवाजी विद्यापीठाची ओळख आहे. शिवाजी विद्यापीठ हे केवळ शैक्षणिक संस्था नसून स्वाभिमान, सामाजिक जबाबदारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशावर उभे असलेले प्रेरणास्थान असल्याचे’त्यांनी सांगितले. प्रकुलगुरु डॉ. ज्योती जाधव यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला.


 

घघ तत

schedule12 Dec 25 person by visibility 128 category

मा.संपादक

   इंग्लंड येथील आर्बोरिकल्चर असोसिएशन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पार्कर यांचे आज भारतात आगमन झाले. ते 
14 आणि 15 डिसेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत.
    वारसा वृक्षांच्यासाठी जागतिक पातळीवर काम करणाऱ्या इंग्लंड येथील आर्बोरिकल्चर असोसिएशन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पार्कर यांचे आज भारतात आगमन झाले. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी 2 येथे आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी यांच्या वतीने त्यांचे पुष्पहार घालून मुंबई येथे स्वागत करण्यात आले.यावेळी वृक्ष संवर्धन तज्ञ वैभव राजे यांच्या समवेत आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टचे मुकुल म्हात्रे, राहुल कांबळे,
पंकज देहगावकर, महेंद्र हौसनूर उपस्थित होते.
          कोल्हापूर जिल्ह्यातील वारसा वृक्ष (हेरिटेज ट्री) हे आंतर राष्ट्रीय नकाशावर यावेत. यासाठी आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी प्रयत्नशील आहे. जागतिक पातळीवर यासाठी काम करणाऱ्या युके आर्बोरिकल्चर असोसिएशन  या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पार्कर यांच्याशी संस्थापक अध्यक्ष राहुल मगदूम यांनी संपर्क केला. त्याला समाधानकारक प्रतिसाद देत जॉन पार्कर यांनी भारतामध्ये कोल्हापूर येथे गेल्या महिन्यात येणार होते. परंतु काही कौटुंबिक अडचणीमुळे त्यांना येता आले नाही.
        ते आता दोन दिवसांच्या दौऱ्यात आजरा शिरशिंगी येथील भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड, शाहूवाडी येथील खेडेचा महाकाय बेहडा वृक्ष आणि कोल्हापूर शहर येथील गोरख चिंचं तसेच महावीर उद्यान येथील कैलासपती या वारसा वृक्षांची तसेच टाऊन हॉल येथील  दुर्मिळ वृक्षांची पाहणी करणार आहेत त्याचबरोबर चुये येथील नदीकाठचा वड या ठिकाणी भेट देणार आहेत.अशी माहिती आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टचे आणि आझाद हिंद नेचर आर्मीचे अध्यक्ष राहुल मगदूम यांनी दिली.
      फोटो ओळ : 
वारसा वृक्षांच्यासाठी जागतिक पातळीवर काम करणाऱ्या इंग्लंड येथील आर्बोरिकल्चर असोसिएशन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पार्कर यांचे आज भारतात आगमन झाले. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी 2 येथे आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी यांच्या वतीने त्यांचे पुष्पहार घालून मुंबई येथे स्वागत करण्यात आले.यावेळी वृक्ष संवर्धन तज्ञ वैभव राजे यांच्या समवेत आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टचे मुकुल म्हात्रे, राहुल कांबळे,
पंकज देहगावकर, महेंद्र हौसनूर उपस्थित होते.

शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन

schedule08 Dec 25 person by visibility 163 category

ठठ थफ

schedule06 Dec 25 person by visibility 178 category

कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गांवरील तसेच उपनगरांमधील अनेक ठिकाणचे पथदिवे बंद अवस्थेत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी अपघात, चेनस्नॅचिंग यासह विविध प्रकारचे गुन्हे घडत आहेत. ही बाब ध्यानात घेऊन बंद पडलेले पथदिवे बदलण्यासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांसमवेत वेळोवेळी बैठक घेतली होती. यावेळी झालेल्या चर्चेनुसार *शहराचा जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून स्वखर्चातून १००० एलईडी पथदिवे महापालिका प्रशासनाकडे सुपूर्द केले.* महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे हे पथदिवे सुपूर्द करण्यात आले.आवश्यक त्या ठिकाणी तातडीने पथदिवे बदलून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशा सूचना यावेळी केल्या. यावेळी झालेल्या संक्षिप्त बैठकीत महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारणे, महानगरपालिकेतील रिक्त पदांची तातडीने भरती करणे, महानगरपालिकेसाठी स्वमालकीची रुग्णवाहिका उपलब्ध करणे, कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुलभ शौचालयांची उभारणी करणे आणि कोल्हापूर शहरातील चौक अतिक्रमण मुक्त करण्यासंदर्भात चर्चा झाली. फुलेवाडी येथील फायर स्टेशनचा पोलीस पंचनामा पूर्ण झाला असल्यास या स्टेशनची पुनर्बांधणी प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश याप्रसंगी दिले. 
यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासह विद्युत विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

जज दद

schedule12 Nov 25 person by visibility 266 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन :  कोल्हापूर फर्स्ट व इंजिनिअरिंग असोसिएशनच्या  प्रतिनिधी मंडळाने  खासदार श शाहू महाराज यांची न्यू पॅलेस येथे भेट घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा विषयांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत रेल्वे आणि विमानतळ सेवा या विषयांवर विशेष भर देण्यात आला. आगामी हिवाळी संसदीय अधिवेशनात कोल्हापूर, सांगली, गोवा आणि कोकण विभागातील खासदारांना सोबत घेऊन रेल्वे मंत्र्यांची बैठक दिल्ली येथे आयोजित केली जाईल.
सह्याद्री एक्सप्रेस (११०२३/११०२४) ही पूर्वी दैनंदिन धावणारी गाडी पुन्हा सुरू करून कोल्हापूर-मुंबई दरम्यान कायमस्वरूपी दैनंदिन सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. वंदे भारत एक्सप्रेस (२०६७३/२०६७४) सध्या आठवड्यातून तीन दिवस धावते. ही सेवा दररोज चालविण्यात यावी आणि मुंबई सीएसएमटी पर्यंत वाढवावी, अशी मागणी करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे सुरू झाल्यामुळे वकील व प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीचे वेळापत्रक सुधारावे, अशी विनंती करण्यात आली.
कोल्हापूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी झालेल्या चर्चेत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. बैठकीला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे कोल्हापूर संचालक  अनिल शिंदे आणि त्यांची टीम उपस्थित होती.

रनवे विस्तार आणि नाईट लँडिंग सुविधा या कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. सध्याचा १७८० मीटर रनवे पटना आणि भावनगर विमानतळांप्रमाणेच क्रिटिकल एअरक्राफ्ट कॅटेगरीसाठी सक्षम आहे. त्यामुळे विद्यमान पायाभूत सुविधांवर तांत्रिक चाचणी घेऊन अपग्रेडेशन साठी मंत्री महोदयांकडे पाठपुरावा करावा.  
कोल्हापूर-दिल्ली थेट उड्डाण सेवा सुरू करावी.  तसेच जर कोणत्याही एअरलाइनने सेवा बंद केली असेल, तर त्या रिक्त मार्गांवर इतर इच्छुक एअरलाइन्सना परवानगी देऊन उड्डाणे सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
एअरपोर्ट अथॉरिटीतर्फे माहिती देण्यात आली की, कार्गो हँडलिंगसाठी आवश्यक स्वतंत्र कार्गो हब युनिट्स सुविधा सुरू करण्याची योजना सध्या प्रगतीपथावर आहे.
खासदार श्री. छत्रपती शाहू महाराज यांनी सर्व विषयांवर सकारात्मक प्रतिसाद देत केंद्र व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून या प्रश्नांवर लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.या बैठकीसाठी कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेंद्र जैन, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, स्मकचे चेअरमन जयदीप चौगुले, मॅकचे चेअरमन मोहन कुशिरे, कोल्हापूर फर्स्टचे व्हा. चेअरमन डॉ. अमोल कोडोलीकर, ्अड. सर्जेराव खोत, सचिव बाबासो कोंडेकर, सहसचिव जयदीप पाटील, खजानिस पद्मसिंह पाटील, कोल्हापूर फर्स्टचे विशेष निमंत्रित सदस्य सचिन मेनन, सतीश घाटगे, ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे बी. व्ही. वराडे, आर्किटेक्ट असोसिएशनचे अजय कोराणे, रेल्वे कमिटी सदस्य बाबा निंबाळकर, संजय देशिंगे, प्रसन्न तेरदाळकर, सुरेश शिरसागर, निलेश भालकर, विशाल मंडलिक, प्रदीप व्हराबळे, शंतनू गायकवाड, विकास जगताप आदी उपस्थित होते.

ठठ दद

schedule07 Nov 25 person by visibility 296 category

गगनबावडा हा मुसळधार पावसाळा क्षेत्र असून दुर्गम भागातील विदयार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेला स्कूल व्हॅन देण्याचा कार्यक्रम श्री पंत अमात्य बालविकास विश्वस्त निधी चे उपाध्यक्ष श्री नील पंडित बावडेकर व अध्यक्ष नितु पंडित बावडेकर यांच्या वैयक्तिक देणगीतून माईसाहेब बावडेकर शाळेत संपन्न झाला.  या संदर्भात संस्था व जिल्हा परिषद यांच्यात करार झालेला असून व्हॅन चा मेन्टेनन्स व  इंधन व्यवस्था जिल्हा परिषदेतर्फे होणार आहे.  सदर स्कुल व्हॅन नीलराजे व नितुदेवी यांच्याकडून जिल्हाधिकारी श्री अमोलजी येडगे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कार्तिकेयान यांनी स्वीकारली.  याचा उपयोग परशुराम विद्यालय व कस्तुरबा गांधी शाळा करणार आहेत.  या वेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषद Ceo कार्तिकेयान यांनी आभार व्यक्त करताना महाराष्टात या प्रकारेदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दाखवलेले एकमेव दा्तृत्व असेल असे उदगार काढले व या प्रकारे उदाहरण सर्वांना प्रेरणादायी ठरेलं असे म्हंटले.  
या वेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक मीना शेंडकर.  B D  ओ, पंत अमात्य बाल विकास विश्वस्त निधी चे विश्वस्त डॉ उद्धव पाटील.  श्रीमती अश्विनी वाळिंवडेकर,  श्रीमती माधवी पुरोहित , श्री तेज घाटगे,  परशुराम विद्यालय मधील काही विद्यार्थिनी,  शिक्षक. ,माईसाहेब बावडेकर शाळेतील शिक्षक विदयार्थी हजर होते

जज दद

schedule05 Nov 25 person by visibility 308 category

५ नोव्हेंबर २०२५ | 📍 कोल्हापूर

 शिवसेना म्हणजे संघटन, समर्पण आणि शक्ती !

आज कोल्हापूर मार्केट यार्ड येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भव्य गटप्रमुख मेळावा पार पडला.

शिवसेनेचं बळ म्हणजे कार्यकर्ता, प्रत्येक गटप्रमुख, विभागप्रमुख, पदाधिकारी हा आपल्या विभागाचा आधारस्तंभ आहे. आज या मेळाव्यातून आपण सर्वांनी एकत्र येऊन शिवसेनेचा भगवा अधिक जोमाने फडकवू असा निर्धार व्यक्त केला. 

गेल्या काही वर्षांत आपण अनेक चढ-उतार पाहिले, पण प्रत्येक शिवसैनिकाने आपल्या निष्ठा आणि समर्पणाने पक्षाचा कणा ताठ ठेवला. याच एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या जोरावर शिवसेना आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि जनतेच्या मनामनात आहे.

“शिवसेनेचं मजबूत संघटन महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आहे. त्यातील एक ठिकाण आपलं कोल्हापूर आहे" हे याप्रसंगी आवर्जून नमूद केले.

कोल्हापूरच्या भूमीवर भगवा फडकवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या असंख्य शिवसैनिकांच्या भावना साकार केल्याबद्दल आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मा. एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानले.

आगामी निवडणुका फक्त सत्ता मिळवण्यासाठी नाहीत, तर ज्यांनी शिवसेनेसाठी हाडाची काडं केली त्या प्रत्येक कार्यकर्त्याला ताकदीचं स्थान मिळवून देण्यासाठी असल्याचे याप्रसंगी ठळकपणे नमूद करत कार्यकर्त्यांना अधिक जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. 

एकत्र येऊ, संघटित होऊ आणि पुन्हा एकदा भगवा विजयी करू!

या मेळाव्याला खासदार मा. धैर्यशील माने, मा. संजयदादा मंडलिक, उद्योगमंत्री मा. उदय सामंत, राज्यमंत्री मा. योगेश कदम, मंत्री मा. शंभूराज देसाई, आमदार मा. राजेश क्षीरसागर, मा. चंद्रदीप नरके, मा. राजेंद्र पाटील-यड्रावकर, मा. सुजित मिणचेकर, मा. जयश्रीताई जाधव, जिल्हाप्रमुख मा. सुजित भाऊ चव्हाण, मा. रवींद्र माने, मा. विजय बलगुडे तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dhairyasheel Mane Sanjay Mandlik  Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Shambhuraj Desai Rajesh Kshirsagar  Chandradeep Narake - चंद्रदीप नरके Jayshri Chandrakant Jadhav 

#Shivsena #EknathShinde #prakashabitkar  #shivsenamelva #unityformaharashtra  #kolhapur

सतेज पाटलांचे दोन्ही सत्ताधारी आमदारांना आव्हान, शंभर कोटीचे रस्ते कुठे गेले ! रस्त्याचे कामाची तपासणी करा !!

schedule01 Oct 25 person by visibility 477 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘सरकारमधल्या दोन्ही सत्ताधारी आमदारांना माझे आव्हान आहे शंभर कोटीचे रस्ते कुठे गेले ? रस्त्याचे काम योग्य दर्जाचे झाले की नाही याची तपासणी करा ? अधिकाऱ्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा इशारा देणारे आमदार राजेश क्षीरसागर यांचे काहीतरी काम राहिल असेल म्हणून ते अधिकाऱ्यांच्या वर हक्कभंग आणतो म्हणत असतील.’असा खोचक टोलाही आमदार सतेज पाटील यांनी लगाविला नुसते अधिकाऱ्यांना बोलण्याने आणि हक्क भंग आणतो वगैरे बोलून उपयोग नाही. तर त्यांनी आता लगेच हक्कभंग आणावा. असे आवाहनही त्यांनी क्षीरसागरांना केले.

आमदार सतेज पाटील हे एका बैठकीसाठी काँग्रेस कमिटी कार्यालयात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक राज येऊन या ऑक्टोबरला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, महानगरपालिकेचा सर्व कारभार आलबेल सुरू असल्याची टीका त्यांनी केली. प्रशासकांच्या काळात कोणाचा कोणाला पायपोस नाही. फुलेवाडी येथे अग्निशमन विभागाच्या इमारतीच्या कामाचे टेंडर कोणाच्या दबावाखाली देण्यात आले काय ? यांचे सत्य जनतेसमोर आले पाहिजे याबाबत महापालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी चौकशीचे आदेश दिले असले तरी या चौकशीमध्ये कोणालाही क्लीनचीट देऊ नये. अशी मागणीही केली.

दंड झालेला कॉन्ट्रॅक्टर खाडे

आमदार पाटील म्हणाले, ‘शहरातील पाणीपुरवठ्यावर राजकारण करण्याऐवजी आणि आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा शहरातील दोन्ही आमदारांनी प्रशासनाची बैठक घेऊन शहरातील पाणीपुरवठ्यासंबंधी तोडगा काढायला हवा. थेट पाईप लाईन मधून कोल्हापूर शहरासाठी किती पाणी मिळते याची आकडेवारी महानगरपालिकेकडे आहे. मात्र राजकारण न करता थेट पाईपलाईन मधून आलेल्या पाण्याचे वितरण कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे होईल, आणि त्यामध्ये असलेल्या त्रुटी महानगरपालिकेने काढल्या पाहिजे.कोल्हापूर शहरात गेल्या पाच वर्षापासून प्रशासकराज आहे. ज्यांना शहरात टाक्या उभा करण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले त्यांनी ते काम केलेले नाही. त्या बदल्यात त्यांना 23 कोटीचा दंड लावण्यात आला आहे, असे असताना विनाकारण आरोप करणे चुकीचे आहे. ज्यांना दंड लावले ते कॉन्ट्रॅक्टर खाडे आहेत. त्यांनी हा दंड माफ व्हावा यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. मात्र विनाकारण काहीही काढत असाल आणि तुम्ही एक माझ्या विरोधात बोलला तर मी सात तुमच्या विरोधात बोलेन.’

ठड दद

schedule25 Sep 25 person by visibility 510 category

21:02

00

00

463

New Doc 09-25-2025 20.25.pdf

- प्रेसनोट दिनांक २५/०९/२०२५

आरोपी विनायक सुरेश तेजम, बय ३७ वर्षे, साजगी वकील, रा. फ्लॅट नं.ए-९, मंजुळा अपार्टमेंट, के.डी.सी.सी. बैंक समोर शाहुपूरी कोल्हापूर, जि. कोल्हापूर गाने प्रांत कार्यालय करवीर यांचेकडुन त्याचे ओळखीने काम करून घेतले असुन त्याकरीता प्रांत कार्यालयात पैसे दयावे लागतील असे म्हणून लाच मागणी करून स्विकारलेबाबत...

यातील मुळ तक्रारदार मांचे कोल्हापूर येथील मिळकती वरील व सत्ता प्रकार कमी करणेसाठीचे प्रकरण प्रांत कार्यालय करवीर येथे दाखल होते. त्या प्रकरणावर प्रांत कार्यालय करवीर येथुन आदेश काढून देणेसाठी खाजगी वकील विनायक तेजम याने प्रांत कार्यालयात देणेसाठी तकारदार मांचेकडुन तकारीपुर्वी १,६५,०००/-रूपये घेतले होते. त्यानंतर तकारदार यांचे प्रकरणाचा मुळ आदेश काबुन देणेकरीता प्रांत कार्यालयात आणखीन १,००,०००/-रूपये द्यावे लागतील असे म्हणून तक्रारदार यांचेकडे २५,०००/- रूपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्यूरो कोल्हापूर येथे तफार दिलेली होती.

तकारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्यूरो, कोल्हापूर येथे दिलेल्या तकार अर्जाप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणीमध्ये मुळ तक्रारदार यांचे कोल्हापूर येथील मिळकती वरील व सत्ता प्रकार कमी करणेसाठीचे प्रकरणावर प्रांत कार्यालय करवीर येथुन आदेश कावुन देणेसाठी खाजगी वकील विनायक तेजम याने प्रांत कार्यालयात देणेसाठी तक्रारदार यांचेकडून यापुर्वी १,६५,०००/- रूपये पेतल्याबाबत दुजोरा देवून तकारदार यांच्याकडे त्यांचे मिळकतीचे प्रकरणाचा आदेश प्रांत कार्यालय करवीर यांचेकडुन प्राप्त करून घेतला आहे म्हणून प्रांताधिकारी करवीर यांचे नाव सांगुन त्यांचेकरीता आणखीन २५,०००/- रूपये दयावे लागतील असे माणून तक्रारदार यांचेकडे २५,०००/- रूपये लाचेची मागणी केलेचे निष्पन्न झाले

सापळा कारवाई आयोजीत केली असता पंच साक्षीदारांचे समक्ष विनायक तेजम यांनी तक्रारदार यांचेकडुन मागणी कैलेप्रमाणे २५,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारलेने त्यांना पकडणेत आले सदरबाबत आरोपी विनायक सुरेश तेजम, वय ३७ वर्षे, खाजगी वकील, रा. पलेंट नं.ए-९, मंजुळा अपार्टमेंट, के.डी.सी.सी. बैंक समोर शाहुपूरी कोल्हापूर, जि. कोल्हापूर यांचेविरूध्द शाहुपूरी पोलीस ठाणे, जि. कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदरची कारवाई श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो, पुणे. श्री. अर्जुन भोसले, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो, पुणे यांचे तसेच वैष्णवी पाटील, पोलीस उप अधीक्षक यांचे मार्गदर्शनानुसार राजेंद्र सानप पोलीस निरीक्षक, पो हे. कॉ. सुधीर पाटील, पो.ना. सचिन पाटील, पो. कॉ. संदिप पवार, पो.कॉ. कृष्णा पाटील, चा.पो कॉ प्रशांत दावणे ता.प्र.वि. कोल्हापूर अॅन्टी करपान ब्युरो, कोल्हापूर यांनी केली आहे.

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाचेच्या अथवा अपसंपदेबाबतच्या तकारी असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या खालील कंमाकावर संपर्क साधावा

१८००२२२०२१ १) मा. महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, म.रा.मुंबई टोल फ्री क्रमांक

२) मा.पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्र, पुणे दुरध्वनी कमांक ०२०/२६१२२१३४,

०२०/२६१३२८०२, ०२०/२६०५०४२३. ३) श्रीमती वैष्णवी सुरेश पाटील, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर

मो.नं. ९७६४१४०७७७. ९४०४३२१०६४ कार्यालय दुरध्वनी कमांक ०२३१/२५४०९८९.

४) हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक: १०६४. ५) व्हॉटस अप क्रमांक ७८७५३३३३३३.

1 of 1

Scanned with OKEN Scanner

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes