.
जज डड
schedule04 Sep 26 person by visibility categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्यावतीने महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची अन्यायकारक संच मान्यता रद्द करण्यासाठी पुणे आयुक्त कार्यालय व शिक्षण संचालक कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी मागण्यांचे निवेदन ही सादर केले. यामध्ये 30 विद्यार्थ्यांची सायन्सची प्रॅक्टिकल बॅच पूर्वीप्रमाणे वीस विद्यार्थ्यांची करावी. वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालयाची तासिका पूर्वीप्रमाणे 45 मिनिटाची करावी. पर्यावरण शिक्षक व शारीरिक शिक्षक यांचे यांचे तास इतर शिक्षकांनादेऊ नये या शिक्षकांना सेवा शाश्वती द्यावी. अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ पदी उन्नयन करणे.
दोन विषयाचा कार्यभार एकत्र असणाऱ्या शिक्षकांना पूर्वीप्रमाणे मान्यता देण्यात यावी. वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालयास 40 मिनिटाची तासिका बनल्यास तुकडीची विद्यार्थी संख्या ही 120 ऐवजी 60 प्रमाणे गणली जावी.आय.टी विषय अनुदानित करून शिक्षकांना वेतन द्यावे. या मागण्यांचा समावेश होता
शिक्षण उपसंचालक श्रीराम पानझडे यांना देण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष. प्रा. डॉ. संजय शिंदे, मार्गदर्शक मुकुंद आंधळकर. कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. आण्णासाहेब बागडी, सचिव प्रा. बी एस पाटील, उपाध्यक्ष प्रा.विजय मेटकरी, परीक्षा विभाग सचिव प्रा. पी.बी.रक्ताडे, .प्रा.बी.आर. पाटील, प्रा. विनायक चव्हाण, उपप्राचार्य, प्रा.दिलीप संकपाळ, प्रा.अशोक चव्हाण. प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे. प्रा. रत्नदीप पवार. प्रा. राहुल चौगले. प्रा.दिनेश चिकुर्डे. प्रा. प्रवीण रसाळे. प्रा. मेघदूत पाटील.प्रा. एच बी जवळे. प्रा. शिवाजी अंगज,. प्रा.विशाल कोकरे, प्रा. अनिल पवार, प्रा. संदीप कोळी, प्रा. हेमंत गव्हाणे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी होते यास कोल्हापूर जिल्ह्यातून 250* *पेक्षा अधिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उपस्थित होते
यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे.माजी आमदार दत्तात्रय सावंत.म, जी आमदार सुधीर तांबे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, पंढरपूरचे बब्रुवान रोंगे. शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष *शिवाजीराव खांडेकर मराठवाड्याचे नरेंद्र काळे. शिक्षक सेनेचे सुनील जगताप. पुणे वाडिया कॉलेजचे सानप यांनी पाठिंबा दिला.
ठठ डद
schedule09 Aug 26 person by visibility 101 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे हे महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय क्षेत्रातील भीष्म पितामह असून, धडधाकट शरीरयष्टी, कणखर आवाज, शिस्त आणि दरारा हे त्यांचे गुण वाखाणण्यासारखे आहेत. तळागाळातील जनतेचे प्रश्न प्रशासकीय पकड व सखोल अभ्यास याद्वारे त्यांनी सोडवले असून, महाराष्ट्राला टँकरच्या जाळ्यातून मुक्त करण्याचे श्रेय अण्णासाहेब डांगे यांना जाते, असे कौतुकोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
वाळवा तालुक्यातील आष्टा येथे माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांचे अभिष्टचिंतन, आम्रवृक्ष आत्मचरित्राचे प्रकाशन आणि आष्टा शैक्षणिक संकुलातील शैक्षणिक इमारतींचे उद्घाटन अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल, आष्टा येथे आयोजित या कार्यक्रमास सत्कारमूर्ती डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्यासह विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक, लोकसभा सदस्य धैर्यशील माने, आमदार सर्वश्री अरुण लाड, सदाभाऊ खोत आणि धैर्यशील कदम तसेच, डॉ. सुरेश खाडे, विनय कोरे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख, अशोक माने आणि सुहास बाबर, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. राजेंद्र डांगे, सहसचिव विश्वनाथ डांगे यांच्यासह डांगे कुटुंबिय आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनात प्रदीर्घ काळ योगदान देणारे संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या वयाच्या 91 व्या वर्षात पदार्पणानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच, यावेळी त्यांच्या जीवनप्रवासाचा वेध घेणाऱ्या ‘आम्रवृक्ष’ या आत्मचरित्राचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अण्णासाहेब डांगे हे आपणासाठी पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे त्यांना आपण वैयक्तिकरीत्या काही देऊ शकत नसलो तरी त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उपहार दिला असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 80 च्या दशकाच्या शेवटी कर्जमाफीच्या लढ्यात सक्रिय सहभाग अण्णासाहेबांनी घेतला. या लढ्याला राजकीय स्वरूप देऊन शेतकऱ्यांच्या हक्काचा हा लढा व्यापक केला. तळागाळात जायचे असेल तर शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, याची जाणिव त्यांना होती. त्यामुळे आज कर्जमाफी करूनच त्यांच्या वाढदिनी आपण इथे आल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अण्णासाहेब डांगे पाणीपुरवठा मंत्री असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याचा धाडसी निर्धार केला. प्रत्येक गावात पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी नियोजन करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची स्थापना केली. प्रत्येक गावात पाणीपुरवठ्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलले. मोगलांच्या काळात देशभरातील हिंदू देवतांच्या मूर्ती आणि मंदिरांची विटंबणा केली गेली होती. त्या सर्व देवालयांचे व घाटांचे पुनरूज्जीवन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. पण, त्यांच्या चौंडी या जन्मस्थानाचा शोध अण्णासाहेब डांगे यांनी घेतला आणि त्याचे पुनरूज्जीवन केले. तसेच, वाटेगाव येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे कामही त्यांनी सुरू केले. त्यांचे कार्य राज्य शासन पुढे नेत असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी येथील जन्मस्थान विकासासाठी राज्य शासनाने 700 कोटींचा विकास आराखडा केला आहे. तसेच, अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी वाढीव भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असून, त्यांच्या स्मारकाचेही काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अण्णासाहेब डांगे यांनी अनेक शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्था उभारल्या. या संस्थांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी, शिक्षक आणि समाजातील विविध घटकांना त्यांनी घडविले. राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी समाजकारणाला प्राधान्य दिले. अण्णासाहेब डांगे यांचे कार्य आणि योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांना निरोगी, दीर्घ आणि आनंदी आयुष्य लाभावे, अशा सदिच्छाही त्यांनी यावेळी दिल्या. प्रास्ताविक संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अॅड. राजेंद्र उर्फ चिमण डांगे यांनी केले आहे. सूत्रसंचालन विजय कडणे व राणी यादव यांनी केले. आभार विश्वनाथ डांगे यांनी मानले. य
शेतकरी कर्ज आणि वीज बिल माफीमुळे बळीराजा आर्थिक संकटातून बाहेर
schedule30 Jul 26 person by visibility 186 categoryराजकीय
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून 56 लाख शेतकऱ्यांना 37 हजार कोटींचा लाभ
राज्यातील शेतकऱ्यांची 48 हजार कोटींची वीजबिल थकबाकीही माफ
राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांचा लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही ऐतिहासिक योजना आहे. जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 50 हजार रुपयांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेत 50 हजार रुपयांचा लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे, अशा शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 2026-27 मध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. त्याचप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंत वीजबिल आकारले जात नाही. मात्र, त्यांची वीज वापराची 48 हजार कोटींची जुनी थकबाकीही आता माफ केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी घोषित केल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्याच्या थकीत वीज बिलाची पाटी पूर्णपणे कोरी होणार आहे. याबाबत नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्याऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्याचे आभार मानले.
राष्ट्रीयकृत, व्यापारी, खासगी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे पूर्वीच्या योजनेत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता मात्र, नव्या योजनेत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असली तरी दोन लाख रुपयापर्यतची कर्जमाफी दिली जाणार आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी असलेली 50 हजार रुपयांची मर्यादा आणि 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, ही शासनाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कृषी क्षेत्रासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी सुमारे 95 हजार कोटी खर्च केले जातात. कापसाची 136 लाख क्विंटल खरेदी करून 10 हजार 883 कोटी रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. सोयाबीनचे 6 लाख टन उत्पादन 3 हजार 198 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले, तर कांदा खरेदीमुळे बाजारभाव स्थिर राहण्यास मदत झाली आहे. ठिबक सिंचनासाठी प्रलंबित 217 कोटी रुपये लवकरच वितरित करण्यात येतील, तसेच कृषी समृद्धी योजनेतील उर्वरित निधी पुरवणी मागण्यांतून उपलब्ध करून दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले
वीजबिल माफीच्या घोषणेतील मुद्दे
राज्यातील शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंत वीजबिल आकारले जात नाही. मात्र, त्यांची वीज वापराची 48 हजार कोटींची जुनी थकबाकीही आता माफ केली जाणार आहे.
आज कर्जमाफीव्यतिरिक्त शेतकऱ्यास 95 हजार कोटींचे साह्य दिले जात असून शेती क्षेत्र सक्षम आणि शाश्वत व्हावे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार हातात हात घालून प्रयत्न करत आहे.
शेतीच्या क्षेत्रात नव्या पद्धती, नवे तंत्रज्ञान आणणे ही गरज असून गुंतवणूक ही अडचण असल्याचे ओळखून 2014 नंतर शेती क्षेत्रात गुतवणूक करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
सरकारच्या 'मागेल त्याला शेततळे योजनेतून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना नव्या संधी दिसल्या, त्याची फळे आता दिसू लागली आहेत
जलयुक्त शिवारमुळे आता शेतकरी तीन तीन पिके घेऊ लागला आहे. शेतमालाला आता जागतिक बाजारपेठ उपलब्ध आहे त्याचा फायदा घ्यायचा असेल, तर उत्पादकता वाढवून उत्पादन खर्च कमी करावा लागेल, त्यामुळे गटशेतीच्या योजनेतून शेतकऱ्यांना त्याचा फायदा घेता येईल.
पुढील काळात शेतकऱ्याचे गट तयार केले, तर शेतकऱ्यांना पूरक पिके घेता येतील आणि शेती हा उद्योग फायद्यात आणता येईल
शेतकऱ्याचा शेतीखर्च कमी व्हावा यासाठी दरवर्षी 25 हजार कोटींची वीजबिलमाफी दिली जात असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वीज मिळू लागली आहे.
सौरपंप आणि सौरकृषीवाहिनी योजनांमुळे 76 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली असून वर्षअखेरीपर्यंत शंभर टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जाईल
कोणतीही निवडणूक समोर नसताना सरकारने हा कर्जमाफीचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची ग्वाही निवडणुकीच्या काळात दिली होती त्यानंतर झालेल्या सर्व निवडणुकांत भाजपा महायुतीला महाराष्ट्राने अभूतपूर्व जनादेश दिला
कर्जमाफी किंवा शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेताना राजकारण केले जाणार नाही, तर केवळ शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करूनच घेतला जाईल.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेताना काही अटी होत्या हे खरे आहे. पण आता त्या अटी दूर करण्यात आल्या आहेत. आता शेतकऱ्यांनी शेतीला उद्योगाची जोड देऊन शेतीचे अर्थकारण बदलून टाकले पाहिजे
शेतकऱ्याला नैसर्गिक शेतीकडे वळविण्यासाठी देशी गायींचे संवर्धन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतक-यांची उत्पादकता वाढविण्याची वेगवेगळे प्रयोग करावे लागतील, त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. म्हणून गुंतवणुकीच्या मॉडेलकडे जाण्याचा सरकारचा प्रयत्न राहील
शेतकऱ्यांना सुमारे 48 हजार कोटींची कर्जमाफी देताना सरकारला तिजोरीतून निधी उभारावा लागतो. उद्योग आणि सेवाक्षेत्रात मोठी गुंतवणूक आणली तर मोठ्या प्रमाणात कराच्या रूपाने तिजोरीत येणारा पैसा शेतीच्या क्षेत्रात गुंतवू शकलो तर येत्या दशकात शेतीचे क्षेत्र स्वयंपूर्ण होऊन आपल्याला पैसा देईल, आणि त्यासाठी पैसा द्यावा लागणार नाही
राज्यात 52 टक्के भाग अवर्षणप्रवण असताना दुसरीकडे अनेक भागांत पावसाचे पाणी समुद्रात जाऊन वाया जाते. गोदावरी, तापी खोऱ्यांत हे पाणी यावे यासाठी वैनगंगा, नळगंगा सारख्या नदीजोडण्या योजनातून नद्या तयार करण्यात येत असून वाहून जाणारे पाणी उचलले जाईल आणि सुमारे 24 नवी धरणे आणि 16 जुन्या धरणाची उंची वाढविली जाईल हे काम याचवर्षी पूर्ण करण्यासाठी वेगवान प्रयत्न सुरु आहेत.
दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे 200 टीएमसी पाणी वाहून जाणारे पाणी वळणबंधाऱ्यांद्वारे पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात नेण्याची योजनाही आहे उल्हास खोऱ्यात वाहून जाणारे 275 टीएमसी पाणी उचलून वेगवेगळ्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे सरकारने हाती घेतले आहे. विदर्भ, मराठवाड्यात एकही जिल्हा दुष्काळी राहणार नाही
अजून सहा लाख कोटींची कामे करण्याची योजना आहे. एकदा ही कामे पूर्ण झाली, तर महाराष्ट्रातील पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही शेतीच्या परिवर्तनासाठी भविष्याचा विचार करण्याचे सरकारचे धोरण आहे
वीज बिल थकबाकीमुळे महावितरण कपनीच्या तालेबंदाचा तोल सावरण्यासाठी सरकारने आधीच महावितरणचे 32 हजार 679 कोटींचे कर्ज स्वतःकडे घेतले आहे. त्यात आता शेतकरी वीज बिल थाकबाकी फेडण्याची जबाबदारीही सरकारने घेतल्याने महावितरणचा फायदा होणार आहे.
महावितरणमधून सध्या नफ्यात असलेला बिगर कृषी विभाग (औद्योगिक, व्यावसायिक आणि खासगी वीजग्राहक) वेगळा करून भांडवली बाजारात सूचिबद्ध करण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून सुमारे 45 लाख कृषी ग्राहकांसाठी वीजबिल माफीसारख्या योजना सुरु राहतील. यामुळे महावितरणची आर्थिक आणि संरचनात्मक फेररचना होणार आहे.
ठठ दद
schedule28 Jul 26 person by visibility 204 categoryशैक्षणिक
जज डड
schedule09 Jul 26 person by visibility 248 categoryजिल्हा परिषद
*प्रसिद्धी पत्रक (Press Note)**
**करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील २५ कोटींचा अपहार: ठेवीदारांच्या लढ्याला मोठे यश; जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून २३ कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित!**
**कोल्हापूर, जुलै २०२६:**
करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार आणि अपहार प्रकरणी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. जैसमिन (भा.प्र.से.) यांनी एक अत्यंत मोठे आणि धाडसी पाऊल उचलले आहे. पतसंस्थेचे चेअरमन आणि संचालक मंडळामध्ये सामील असलेल्या, जिल्हा परिषद सेवेतील एकूण **२३ कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश** मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जारी केले आहेत. संशयित आरोपी ज्या संवर्गातील आहेत, त्या संवर्गाच्या खाते प्रमुख आणि कार्यालय प्रमुखांना तात्काळ विभागीय चौकशी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
### **१४ जण सेवेत, तर ९ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर गाजणार हातोडा**
या चौकशीच्या कचाट्यात सापडलेल्या २३ संशयित कर्मचाऱ्यांपैकी **१४ जण सध्या जिल्हा परिषदेच्या सेवेत कार्यरत आहेत, तर ९ जण सेवानिवृत्त झालेले आहेत**. सेवानिवृत्त होऊन ज्यांना ४ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला नाही, अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांकडील संपूर्ण दप्तराची सखोल पडताळणी करून, दोषारोप निश्चित करून तात्काळ नियमोचित कारवाई करण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे.
### **काय आहे संपूर्ण प्रकरण?**
करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेमध्ये सन २०१९ ते २०२४ या कालावधीत **४४८ हून अधिक गरीब व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अंदाजे २४ कोटी ६९ लाख रुपयांच्या ठेवी आणि नियमबाह्य गुंतवणूक असा एकूण २५ कोटी ६९ लाख ५१ हजार २७९ रुपयांचा प्रचंड मोठा अपहार** झाला आहे. या प्रकरणी फिर्यादी श्री. सुबराव रामचंद्र पवार (रा. कोल्हापूर) यांच्या तक्रारीवरून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४६०/२०२४ अन्वये भा.द.वि.स. कलम ४२०, ४०६, ४०८, ४०९, ४६५, ४६८, ४७१, ४७७(अ), ३४ सह 'महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९' च्या कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सद्यस्थितीत या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा (EOW), कोल्हापूर करत आहे.
### **कामगार न्यायालयात आरोपींचा स्थगितीचा प्रयत्न फसला**
या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी कर्मचारी श्री. अतुल आनंदराव कारंडे, श्री. फिरोजखान मुबारक फरास व श्री. सुधीर अभय मगदूम यांनी प्रशासकीय कारवाई व निलंबनापासून वाचण्यासाठी कामगार न्यायालय क्रमांक २, कोल्हापूर येथे धाव घेऊन स्थगिती (Status Quo) मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, **मा. कामगार न्यायालयाने त्यांचा हा अर्ज पूर्णपणे फेटाळून लावल्याने** जिल्हा परिषद प्रशासनाचा कारवाईचा मार्ग मोकळा झाला.
### **ठेवीदार कोर कमिटीचे यश आणि निलंबनाची आग्रही मागणी**
हा प्रचंड मोठा आर्थिक घोटाळा समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेची जनमाणसातील प्रतिमा मलीन झाली असून, या कर्मचाऱ्यांनी 'महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम, १९६७' मधील नियम ३ चा भंग केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
पिडीत ठेवीदार आणि फिर्यादी सुबराव रामचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील कोर कमिटीने गेल्या १८ महिन्यांपासून या प्रकरणी सातत्यपूर्ण लढा दिला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुरू केलेली ही कारवाई म्हणजे ठेवीदारांच्या संघर्षाला मिळालेले मोठे यश असून, याचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
> **"प्रशासनाने विभागीय चौकशीचे आदेश देऊन योग्य पाऊल उचलले असले, तरी गुन्ह्याचे गांभीर्य पाहता सेवेत असलेल्या सर्व १४ लोकसेवकांना तात्काळ निलंबित करावे, जेणेकरून ते पुराव्यांशी छेडछाड करू शकणार नाहीत. जर प्रशासनाने निलंबनाची कारवाई करण्यास टाळाटाळ केली, तर आम्ही मा. उच्च न्यायालय, मुंबई (सर्किट बेंच कोल्हापूर) येथे रिट याचिका दाखल करू आणि तीव्र आंदोलन छेडू."**
श्री सुबराव रामचंद्र पवार , **फिर्यादी व ठेवीदार, ताराराणी ,कोअर कमिटी, कोल्हापूर**
>
*अधिक माहितीसाठी संपर्क: फिर्यादी श्री. सुबराव रामचंद्र पवार (मो. नं. ९९२३४६८६७७)*
णण तय
schedule12 Apr 26 person by visibility 453 categoryसामाजिक
*माझी आणि आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट झाल्यानंतर त्यांचे सगळे गैरसमज दूर होतील*
*वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण*
*आमदार श्री. पाटील यांना दूध संस्था नोंदणीची प्रक्रियाही सविस्तर समजावून सांगेन*
*कोल्हापूर, दि. १२:*
माझी आणि आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट झाल्यानंतर त्यांच्या मनातील सगळे गैरसमज, शंका- कुशंका आणि प्रश्न दूर होतील, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आमदार श्री. पाटील यांना दूध संस्था नोंदणीची प्रक्रियाही सविस्तर समजावून सांगेन, असेही ते म्हणाले.
याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता श्री. मुश्रीफ म्हणाले.....
□ गोकुळ दूध संघामध्ये आजघडीला महायुतीची सत्ता आहे.
यामध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार म्हणून मी, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, भाजपाचे माजी आमदार संजयबाबा घाटगे व इतर नेतेमंडळी आम्ही सत्तेमध्ये सहभागी आहोत. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आमची याबद्दल सविस्तर चर्चा झालेली आहे. ही सगळी माहिती आमदार शिवाजीराव पाटील यांना कळाली की त्यांच्या सगळ्या शंकांचे आणि गैरसमजांचे निरसन होईल, अशी मला खात्री आहे.
□ चंदगडचे आमदार श्री. शिवाजीराव पाटील यांची सोशल मीडियावर व्हिडिओ बघितला आणि मी आश्चर्यचकित झालो. कारण माझी आणि त्यांची गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत दोनवेळा सविस्तर चर्चा झालेली होती. ते असे का बोलले आहेत, हे ते मला भेटल्यानंतरच समजेल.
□ आमदार श्री. शिवाजीराव पाटील यांची जी वक्तव्ये आहेत ते पाठीमागून त्यांना कुणीतरी चुकीचे "प्राॅम्टींग" करीत असल्यासारखे वाटते.
□ आमदार शिवाजीराव पाटील यांना मी समजावून सांगेन की, त्यांनी कागलसह करवीर, राधानगरी या तीन तालुक्यांचा उल्लेख केलेला आहे. कदाचित, या वातावरणामुळे सभासदांच्यात गैरसमज निर्माण होतील आणि आमदार शिवाजीराव पाटील जे उमेदवार देणार आहेत त्यांच्या मताधिक्यावरही परिणाम होऊ शकतो. ही गोष्टही मी त्यांना समजावून सांगणार आहे.
□ याबद्दल मा. उच्च न्यायालय आणि दुग्धविकास विभागाने एस. आय. टी. नेमलेली आहे. या सर्व चौकशीअंती "दूध का दूध आणि पाणी का पाणी" होईलच. न्यायालयात प्रत्यक्षात बाराशे दूध संस्थांची सुनावणी सुरू असताना, तो आकडा ३७०० सांगितल्यामुळे विनाकारण लोकांच्यात गैरसमज निर्माण होईल.
चौकट........
मोठा गैरसमज......!
□ श्री. मुश्रीफ म्हणाले, आमदार शिवाजीराव पाटील यांचा मोठा गैरसमज झालेला दिसतोय. दूध संस्था नोंदणी करतानाची काय -काय प्रक्रिया असते, हे सुद्धा मी त्यांना समजावून सांगेन. सरकारी अधिकारी ही कोणतीही बेकायदेशीर गोष्ट करू शकत नाहीत. श्री. महेश कदम हे सहाय्यक निबंधक- दुग्ध कधीच नव्हते. माझ्या माहितीनुसार या दूध संस्थांची नोंदणी दुग्धचे सहाय्यक निबंधक श्री. गजेंद्र देशमुख आणि श्री. प्रदीप मालगावे यांच्या काळामध्ये झालेली आहे.
===========
णण तत
schedule25 Mar 26 person by visibility 515 categoryउद्योग
[25/03, 18:49] Raja: " प्रेस नोट "
"मुंबई उच्च्य न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून तत्कालीन मा. मैत्री दुग्धविकास व सहनिबंधक सहकारी संख्या (दुग्ध) यांचे दि. ०८/१२/२०२३ चे आदेश रद्द "
तत्कालीन सचिव दुग्धविकास श्री. तुकाराम मुढे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील ग्रामीण प्राथमिक सहकारी दुध संस्था नियम व उपविधीनुसार वर्षातून २४० दिवस किमान ५० लिटर दुध हे दुध संघास पुरवठा करीत नाहीत त्या संस्था नियमानुसार त्यांच्यावर अवसायनात्त्वी कारवाई करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले होते. असा निर्णय त्यांच्या २७/०९/२०२३ च्या बैठकीत झाला होता. त्यानुसार राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यातील सहनिबंधकांना बैठीतील निर्णयानुसार अवसायनायची कारवाई पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
सहनिबंधक सहकारी संस्था दुग्धा कोल्हापूर यांनी गोकूळ कडून सर्व दुग्ध संस्थाच्या दूध संकलनाची माहिती मागितली होती गोकूळचे रेकॉर्ड तपासून सुमारे १२०० दूध संस्था दररोज १५ लिटरपेक्षा कमी दुध टाकण्याचे निष्पन झाले. त्यामुळे अंतरिम आदेश काढून १२०० संस्था अवसायनात काढयाची प्रक्रिया केली सर्व संस्थांनी ३० दिवसात समाधानकारक खुलासा न दिल्यास अवसायनाचा आदेश अंमि का करण्यात येऊ नये म्हणुन त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ३० दिवसांचा वेळ दिला ३० दिवसात एकाटी संस्थेने त्यांचे म्हणणे मांडले नाही किंवा समाधानकारक खुलासा केला नाही याउलट तत्कालिन पालकमंत्री आणि वैद्यकीय हसन मुश्रीफ यांनी तत्कालीन दुग्ध विकास मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून राज्यात लंपी नावाच्या रोंगाचा उद्रेक झाला आहे. व महाराष्ट्रात दुष्काळ आहे म्हणून दुध उत्पादन कमी झाल्याने दुध संस्थेचे संकलन कमी झाले असल्याने अशा परिस्थितीत सहनिबंधकाने अर्धव्यायक अवसायनाची प्रक्रिया रद्द करावी म्हणून बिनतारखेचे पत्र तत्कालीन दुग्ध विकास मंत्र्यांना दि. ११ डिसे २०२३ रोजी प्राप्त झाले पालकामंत्र्यांच्या वरील पत्रावर तत्कालीन दुग्ध विकास मंत्र्यांनी कोल्हापूर जिल्हातील दुग्ध विकास संस्थावरील अवसायनाच्या प्रक्रियेला स्थागिती देण्याचे आदेश दिले.
पालक मंत्र्याचे पत्र मिळण्यापूर्वी व दुग्ध विकास मंत्र्याचे आदेश होण्यापूर्वी सहनिबंधका सहकारी संस्था दुग्ध श्री. शहाजी पाटील यांनी दुग्ध विकास मंत्र्यांच्या आदेशाची अमंलबजावणी करावी असे आदेश ३ दिवस आधिच काढले विभागीय उपान्याधक पुणे यांनी मा दुग्ध विकास मंत्र्यांचे आदेशाची अमलबजावणी करावी असे आदेश दिले
[25/03, 18:49] Raja: त्यानुसार सहय्यक निबंधक कोल्हापूर यांनी अवसायनाची पुढील कारवाई स्थगित केली पर्यायाने अवसायकांची नेमणूक करून देखील संस्थांचा ताबा घेता आला नाही.
श्री प्रकाश बेलवाडे, संचालक महादेव सह. दुग्ध विकास संस्थेने मा दुग्ध विकास मंत्र्याकडे हस्तक्षेप अर्ज दाखल करून दुग्ध विकास मंत्र्यांनी दिलेली स्थागिती रद्द करावी अथवा उठवावी व दुग्ध विकास मंत्र्यांनी दिलेला आलेला रद्द करावा अशी विनवणी केली. तेव्हा दुध विकास मंत्र्यांनी बैलवाडेंच्या अर्जावर सुनावणी घेतली नाही म्हणून नाईलाजाने प्रकाश बेलवाडे यांना मा. उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली.
पालक मंत्र्यांनी वैयक्तिक राजकीय स्थार्थापोटी तत्कालीन दुग्ध विकास मंत्र्याकडून स्थागिती आदेश मिळाविला जो त्यांच्या अधिकार नव्हाता तत्कालीन दुग्ध विकास मंत्र्यांच्या अधिकार बाह्य आदेशाविरूद्ध मा. उच्च न्यायालयात आव्हाने दिले.
दुग्ध विकास मन्यानी पालक मध्याच्या पावर स्थागिती देयावी अशी टिपणी केली होती. मंत्र्याची टिपनी हा म्हणजे महाराष्ट्र शासनाचा आहेशन की एखादया अर्जावर किंवा पनावर मंत्र्यांनी टिपणी केल्यावर त्यान्चे शासन आदेशात रूपांतर होण्यासाठी मलालयात विहीत प्रक्रियेचा अवलंवा करून मा. राज्यपालांच्या नावाने आदेश काढावे स्वागतातः असे कोणतेही आदेश महाराष्ट्र शासनाकडून निर्मनिर्गमित झाले नसलेने तत्कालीन सहनिबक सहकारी संस्था दुधा महाराष्ट्र यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून गंसायी गर्जी राखण्यासाठी बेकायदेशीर आदेश काहले. वरील याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे मा न्यायमुती सचिन देशमुख यांनी समोर, झार्नेऊसना याचिकाकर्याकडून अँड सतिश तळेकर यांनी आपल्या युक्नीकदात अधिकार बाढ्य आदेश घटनेच्या कलमन्द चा भंग होतो. व तसेच सहकारी म शासनातर्फ अंडमाळी. तर हसन मुश्रीफ यांचे तकै अँड अनिल साखरेयोनी महाराष्ट्र सहकारी कायदा कलम १९ नुसार शासनास आदेश काढत्वयागचा अधिकार आहे हे म्हणने करो चुकीचे आहे कारण प्रशासकीय अधिकाराचा कपर करून अर्धन्यायिक प्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नाही. दोमिही मंसानी त्यांच्या प्रभात किंवा टिपणीत तारखेचा उल्लेख नसल्याने वरील वर्तणूक राज्यायानांनी शासनाच्या दैनंदिनी कारभाराबाबत केलेल्या नियमाला धरुना नाही.
[25/03, 18:50] Raja: अँड सतिश तळेकर यांचा युक्तिवाद सुरु असतानाच श्ती हसन मुश्रीफ यांचे वकील व शासनाचे वकील योनी वरील आदेश खूद करण्यास आमची संमती आहे तेबा कोर्टाचा वेळ वाचेल व श्री महादेव दूध व्याव सहकारी संस्थेच्या याविकेतील मागणी माझ्य करता येईल, असे मांडले.
उच्च न्यायालयाकडून मंसांच्या वर्तणूकीबद्दल ताशेरे येतील किंवा उपका ठेवला जाईल या भितीने मा. मंत्र्यांचे आदेश व रतह निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) महाराष्ट्र घोचे आदेश रद्द करण्यात यावेत अशी विनंती प्रतिवादीतर्फे करण्यात आली. कोर्टाने ती माझ्य करून तत्कालीन दूध विकास मैन्यांचे आदेश व सहनिबंधकांचे आदेश रद्द केले. अशा प्रकारे सत्याचाच विजय झाला।
घघ मण
schedule16 Jan 26 person by visibility 708 category
क्रिडाई कोल्हापूर आयोजित वास्तू विषयक प्रदर्शन (दालन) मंडप उभारणीस सुरुवात
क्रिडाई कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिक सर्वोच्च शिखर संघटना असून क्रिडाई कोल्हापूर तर्फे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे बांधकाम व वास्तू विषयक प्रदर्शन (दालन)दि. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान महासैनिक दरबार हाॅल ग्राउंड येथे आयोजित करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचा मंडप उभारणी कार्याचा शुभारंभ क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत यांच्या शुभ हस्ते व दालनचे चेरमन महेश यादव, व्हा. चेरमन आदित्य बेडेकर,समन्वयक निखिल शाह क्रिडाई चे सेक्रेटरी गणेश सावंत, दालन सेक्रेटरी संग्राम दळवी तसेच दालनचे पदाधिकारी सभासद यांच्या उपस्थितीत रविवार दि. 11/01/2026 रोजी संपन्न झाला. क्रिडाई अध्यक्ष सौ व श्री के. पी.खोत यांच्या हस्ते मंडप उभारणी कार्याचे भूमिपूजन करण्यात आले.
क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष श्री. के. पी. खोत यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलताना संघटनेच्या 35 वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेत क्रिडाई ने बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासण्याबरोबर शहराचा विकासात केलेल्या भरीव कार्यावर प्रकाश टाकला. दालन बदल माहिती देताना या दालनचे वैशिष्ट म्हणजे सन 1992 साली बांधकाम विषयक प्रदर्शनाची सुरुवात झाली. यंदाचे *दालन* 2026 हे क्रिडाई कोल्हापूर तर्फे भरवले जाणारे 13 वे दालन आहे. या दालनचे *उदघाटन*शुक्रवार दि 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11. वाजता होणार आहे. दालन 2026 विषयी माहिती देताना दालन चे चेअरमन श्री. महेश यादव यांनी या प्रदर्शनाचा मुख्य हेतू कोल्हापूर व परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली नवनवीन बांधकाम प्रकल्प व तत्रंज्ञान, बांधकाम विषयक साहित्य, सेवा अर्थसाहाय्य योजना यांची माहिती मिळणार असून घराचे स्वप्न प्रत्यक्षात सत्यात उतरविण्यात या प्रदर्शनाचा मोठा फायदा होणार असून याचे लक्ष यंदा संधी सर्वांसाठी असे आहे.
या दालनचे प्रायोजक पुढीलप्रमाणे -
प्लॅटिनम स्पॉन्सर -1) आर्या स्टील्स् रोलिंग प्रा. लि
*डायमंड स्पॉन्सर- 1)इटाका सिरमिक्स 2)एसकॉन इस्पत प्रेस्टिज एल एल पी.
गोल्ड स्पॉन्सर (बिल्डर्स)1)केवेस्ट इन्फ्रा अँड हायवेस्ट डेव्हलपर्स
गोल्ड स्पॉन्सर- 1) अविष्कार इन्फ्रा 2)मोटो टाईल्स 3) स्टेट बँक ऑफ इंडिया 4)यश पॉली 5) सिम्पोलो टाईल्स
*सिल्वर स्पॉन्सर-1)विन्डो एक्स्पर्ट 2) एच आर विंडटेक ( व्ही इ के प्रा. ली. 3)तेजस इंडस्ट्रिज 4)युनियन बँक ऑफ इंडिया
सेमी कॉ स्पॉन्सर 1) फेराकॉल 2) स्मॅश इलेव्हटर 3)बँक ऑफ इंडिया 4) एनएन आयटी कार पार्किंग सिस्टीम प्रा. ली. 5) वोक्स इंटेरियर आणि एक्सटेरियर सोलुशन प्रा. ली. 6)हायड्रा पार्क 7)ग्रेट व्हाईट ग्लोबल 8) पॅरीवेअर रोका 9) लिशा स्वीचेस 10) ओटीस इलेव्हटर्स 11) कोने इलेव्हटर्स वरील सर्व प्रयोजकांची दालन 2026 यशस्वी होण्यासाठी मदत लाभली आहे.
कोल्हापूर परिसरातील सिव्हिल इंजिनीरिंगच्या विद्यार्थी याच्यासाठी शनिवार दि. 31 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता टेक्निकल सेमिनार आयोजित केले असून, रविवार दिनांक 1 फ्रेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सुसंवाद साधणार आहेत. सांगता समारंभ सोमवार दिनांक 2 फ्रेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता होणार आहे
या कार्यक्रमास क्रिडाई कोल्हापूर अध्यक्ष के. पी.खोत उपाध्यक्ष प्रकाश देवालापूरकर, चेतन वसा,सचिव गणेश सावंत, खजानिस अजय डोईजड,दालन चेअरमन महेश यादव, व्हाईस चेअरमन आदित्य बेडेकर, समन्वयक निखिल शाह, सह समन्वयक पवन जामदार, दालन सचिव संग्राम दळवी, खजानिस अमोल देशपांडे,बिझनेस प्रोमोशन चेअरमन गौतम परमार,ग्राउंड कमिटी चेअरमन श्रीकांत पाटील, डिझाईन, प्रिटिंग कमिटी चेअरमन विजय माणगांवकर, हॉस्पीटीलिटी कमिटी चेअरमन केतन शाह, सोवियनर कमिटी चेअरमन संदीप बोरचाटे, स्टॉल ऑलॉकेशन कमिटी चेअरमन तुषार बेर्डे तसेच क्रिडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष विदयानंद बेडेकर, जेष्ठ सभासद कृष्णा पाटील, सुजय होसमनी, विवेकानंद पाटील,श्रेयांश मगदूम, शंकर गावडे,क्रिडाई कोल्हापूरचे सह खाजानिस सागर नालंग, संचालक प्रदीप भारमल,सुनील चिले,तसेच सभासद,प्रायोजक, स्टॉलधारक मोठ्या संख्येने हजर होते. शेवटी आभार प्रदर्शन सचिव गणेश सावंत यांनी केले.
भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन, नवोन्मेष तंत्रज्ञान विकासाची केंद्रे म्हणून कार्य करावे
schedule24 Dec 25 person by visibility 780 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासाची केंद्रे म्हणून कार्य केले पाहिजे. यासाठी उच्च शिक्षणाचा विस्तार आणि संशोधन उत्पादनात वाढ गरजेची आहे. शिवाय जागतिक ज्ञाननेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी भारताने आपल्या वेगाने वाढणाऱ्या उच्च शिक्षण व्यवस्थेचा आणि संशोधन क्षमतेचा प्रभावी उपयोग करणे आवश्यक आहे. शिवाजी विद्यापीठासारख्या संस्था प्रथमच विकसित होणाऱ्या तंत्रज्ञान, संशोधन निष्पत्ती आणि नावीन्यपूर्ण उत्पादनांच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावू शकतात’असे मत डॉ. जी सतीश रेड्डी यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ बुधवारी, २५ डिसेंबर २०२५ रोजी दिमाखात पार पडला. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. रेड्डी यांनी, ‘भारतात एक हजारांहून अधिक विद्यापीठे असून सुमारे ४.३८ कोटी विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. आयआयटी, आयआयएम, एनआयटी आणि केंद्रीय विद्यापीठांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच संशोधन प्रकाशनांची संख्या आणि पीएच.डी. पदवीधारकांच्या संख्येत भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संस्थांनी गुणवत्ता व स्पर्धात्मकता वाढवून अधिकाधिक विद्यापीठांना जागतिक क्रमवारीतील अग्रभागी नेणे गरजेचे आहे.१०–१५ वर्षांपूर्वी जागतिक टॉप ५०० क्रमवारीत केवळ एक-दोन भारतीय संस्था असत, आज मात्र अनेक संस्था त्या यादीत असून काही टॉप १०० कडे वाटचाल करत आहेत.’असे त्यांनी नमूद केले.
‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या आवाहनांमुळे क्षेपणास्त्रे, रडार, सोनार, टॉर्पेडो, एअरबॉर्न वॉर्निंग सिस्टीम्स, विमाने, पाणबुड्या, जहाजे, चिलखती वाहने, रणगाडे आणि तोफा अशा विविध क्षेत्रांत स्वदेशी क्षमता विकसित झाली आहे. पुण्यात टाटा आणि भारत फोर्ज यांनी डीआरडीओच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसित केलेली स्वदेशी तोफ—जिचा वापर लाल किल्ल्यावर औपचारिक समारंभात होतो—जागतिक स्तरावर उत्कृष्ट मानली जात असल्याचे त्यांनी सांगितले. ही बाब या परिवर्तनाचे प्रतीक आहे. उद्योगक्षेत्राने, विशेषतः खासगी कंपन्यांनी, संरक्षण संशोधन व उत्पादनात सक्रिय सहभाग घेऊन वाढत्या संधींचा लाभ घ्यावा.’असे आवाहन रेड्डी यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी, शिवाजी विद्यापीठाची गौरवशाली परंपरा, दर्जेदार व समताधिष्ठित शिक्षण देण्यातील त्याची भूमिका, तसेच पदवीप्राप्त विद्यार्थ्यांकडून समाजोपयोगी व जबाबदार नागरिक म्हणून अपेक्षित असलेली भूमिका यांचा सविस्तर ऊहापोह करण्यात आला. सातत्यपूर्ण अध्ययन, नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार, नैतिक मूल्यांची जोपासना आणि समाज व राष्ट्रासाठी—राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर—योगदान देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांवर आधारित गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि सामाजिक बांधिलकीचे केंद्र म्हणून शिवाजी विद्यापीठाची ओळख आहे. शिवाजी विद्यापीठ हे केवळ शैक्षणिक संस्था नसून स्वाभिमान, सामाजिक जबाबदारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशावर उभे असलेले प्रेरणास्थान असल्याचे’त्यांनी सांगितले. प्रकुलगुरु डॉ. ज्योती जाधव यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला.
घघ तत
schedule12 Dec 25 person by visibility 835 category
मा.संपादक
इंग्लंड येथील आर्बोरिकल्चर असोसिएशन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पार्कर यांचे आज भारतात आगमन झाले. ते
14 आणि 15 डिसेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत.
वारसा वृक्षांच्यासाठी जागतिक पातळीवर काम करणाऱ्या इंग्लंड येथील आर्बोरिकल्चर असोसिएशन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पार्कर यांचे आज भारतात आगमन झाले. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी 2 येथे आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी यांच्या वतीने त्यांचे पुष्पहार घालून मुंबई येथे स्वागत करण्यात आले.यावेळी वृक्ष संवर्धन तज्ञ वैभव राजे यांच्या समवेत आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टचे मुकुल म्हात्रे, राहुल कांबळे,
पंकज देहगावकर, महेंद्र हौसनूर उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील वारसा वृक्ष (हेरिटेज ट्री) हे आंतर राष्ट्रीय नकाशावर यावेत. यासाठी आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी प्रयत्नशील आहे. जागतिक पातळीवर यासाठी काम करणाऱ्या युके आर्बोरिकल्चर असोसिएशन या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पार्कर यांच्याशी संस्थापक अध्यक्ष राहुल मगदूम यांनी संपर्क केला. त्याला समाधानकारक प्रतिसाद देत जॉन पार्कर यांनी भारतामध्ये कोल्हापूर येथे गेल्या महिन्यात येणार होते. परंतु काही कौटुंबिक अडचणीमुळे त्यांना येता आले नाही.
ते आता दोन दिवसांच्या दौऱ्यात आजरा शिरशिंगी येथील भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड, शाहूवाडी येथील खेडेचा महाकाय बेहडा वृक्ष आणि कोल्हापूर शहर येथील गोरख चिंचं तसेच महावीर उद्यान येथील कैलासपती या वारसा वृक्षांची तसेच टाऊन हॉल येथील दुर्मिळ वृक्षांची पाहणी करणार आहेत त्याचबरोबर चुये येथील नदीकाठचा वड या ठिकाणी भेट देणार आहेत.अशी माहिती आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टचे आणि आझाद हिंद नेचर आर्मीचे अध्यक्ष राहुल मगदूम यांनी दिली.
फोटो ओळ :
वारसा वृक्षांच्यासाठी जागतिक पातळीवर काम करणाऱ्या इंग्लंड येथील आर्बोरिकल्चर असोसिएशन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पार्कर यांचे आज भारतात आगमन झाले. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी 2 येथे आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी यांच्या वतीने त्यांचे पुष्पहार घालून मुंबई येथे स्वागत करण्यात आले.यावेळी वृक्ष संवर्धन तज्ञ वैभव राजे यांच्या समवेत आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टचे मुकुल म्हात्रे, राहुल कांबळे,
पंकज देहगावकर, महेंद्र हौसनूर उपस्थित होते.