Maharashtra News 1
Register

जाहिरात

 

णण यय

schedule05 Jun 26 person by visibility category

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न शिक्षण उपसंचालकांनी त्वरीत सोडवावेत :शिक्षक आमदार जयंत आसगावकर

कोल्हापूर / प्रतिनिधी
 शंभर पटाच्या आतील विद्यार्थी संख्येच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना संरक्षण मिळावे त्यांना स्टार देऊन सदर मुख्याध्यापकांच्या निवृत्ती पर्यंत सदर पद संरक्षित राहावे, इयत्ता नववी व दहावी या दोन्ही वर्गातील पटसंख्या वीस असल्यास तीन शिक्षक मंजूर करावेत अशा प्रमुख मागण्यासह अन्य मागण्या शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी करून कोणत्याही शिक्षक व कर्मचारी यांच्यावर अन्याय होऊ नये अशा प्रकारची मागणी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे या प्रसंगी मागणी केली.
   शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथे तीन
जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनांची बैठक शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर आणि कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधिक्षक लेखाधिकारी यांच्या समवेत आज घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.
        या बैठकीमध्ये तीनही जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघटना, शिक्षक संघटना ,  शिक्षकेत्तर सेवक संघटना आणि संस्था चालक संघटना यांच्या प्रतिनिधींनी आप आपल्या  जिल्ह्यातील शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता प्रस्ताव, मेडिकल बीले, पदोन्नती प्रस्ताव, सेवानिवृत्ती प्रस्ताव, अर्धवेळ शिक्षकांचे मान्यता प्रस्ताव, अनुकंपा मान्यता प्रस्ताव, बदली प्रस्ताव, रजा रोखीकरण प्रस्ताव, डीसीपीएस योजनेतील प्रस्ताव यासह अनेक प्रलंबित मागण्या बैठकीमध्ये मांडण्यात आल्या.
    शिक्षक  आमदार जयंत आसगावकर यांनी संघटनांनी मांडलेल्या शैक्षणिक समस्या  ताबडतोब सोडवाव्यात  अशा प्रकारची मागणी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे केली. 
     या समस्या सोडविण्यासाठी तात्काळ शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर  यांनी संघटनांनी विचारलेल्या प्रश्नांना सकारात्मक उत्तरे देऊन या प्रलंबित सर्व मागण्या सोडवण्यासाठी तीन्ही जिल्ह्यांच्या प्राथमिक، माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच वेतनपथक अधिक्षक व लेखाधिकारी यांना सभेतच आदेश दिले.
     वरिष्ट वेतनश्रेणीचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांच्याकडे न पाठविता लेखाधिकारी यांच्याकडे पाठवावेत, जिल्हातंर्गत बदली मान्यतेचे प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे मान्यतेस न पाठविता वेतनपथक अधिक्षक यांच्याकडे पाठवून ॲटाच डिट्याच व्हावे, अनुंकपा नियुक्ती मान्यता प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारी 
यांनीच मान्यता दयावी योजना शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविण्याची गरज नाही, आपल्या विभगामध्ये अनाधिकृत शाळा आहेत त्या शाळांचा शोध घेऊन त्यांची यादी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिर करून संबंधित शाळावरती कारवाई करावी अशा आग्रही मागण्या संघटनांनी केल्या.
     आपल्या स्तरावरील सर्व मागण्या तात्काळ सोडविल्या जातील आणि शासन स्तरावरील मागण्यां संदर्भात वरिष्ट कार्यालयाकडून मार्गदर्शन घेऊन कारवाई केली जाईल अशा प्रकारची ग्वाही शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी दिली. 
     सदर सभेत ज्या शिक्षक व सेवकांच्या शालार्थ आयडी प्रलंबित होत्या त्यापैकी काही शालार्थ आयडी मान्यतेचे आदेश शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांच्या समवेत शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते संबधित कर्मचाऱ्यांना वितरीत करण्यात आले. 
      या सभेस  उपसंचालक प्रभावतीकोळेकर,सहशिक्षण संचालक गणपती कमळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, सांगली माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, सातारा माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे,विशाल दशवंत उपशिक्षणाधिकारी सांगली,वेतन पथक कोल्हापूर अधिक्षक उदय सरनाईक, कोल्हापूर माध्यमिक अधिक्षक प्रविण फाटक, कोल्हापूर लेखाधिकारी नंदकिशोर भंडारे, प्राथमिक विस्तार अधिकारी रविंद्र ठोकळ, वेतन पथक सांगली अधिक्षक आबासाहेब लाड , वेतन निश्चिती सांगली लेखाधिकारी रविराज शिंदे,  वेतन पथक प्राथमिक सांगली अधिक्षक रियाज शेख,  माध्यमिक  सांगली अधिक्षक नरेंद्र माळी आदी अधिकारी उपस्थित होते.
     या सभेस व्यासपीठ अध्यक्ष एस डी लाड , शिक्षक नेते दादासाहेब लाड, संस्थाचालक संघ अध्यक्ष शारंगधर देशमुख, चेअरमन राहुल पोवार, सचिव आर. वाय. पाटील, बाळासाहेब डेळेकर, बी जी बोराडे, डी एस घुगरे, भरत रसाळे, सुधाकर निर्मळे, खंडेराव जगदाळे,दत्ता पाटील, सी. एम. गायकवाड, बाबा पाटील,सुरेश संकपाळ, राजेंद्र कोरे, उदय पाटील, मिलींद पांगिरेकर, के. के. पाटील,विजय मेटकर, रविंद्र मोरे, के. बी.वाघमोडे,अकबर पन्हाळकर, संतोष आयरे आदीसह शिक्षक शिक्षकेत्तर संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येंनी उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे  चेअरमन राहूल पोवार यांनी केले.

    फोटो कॅप्शन
कोल्हापूर :     शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर  यांच्या समवेत बैठकी प्रसंगी बोलतांना शिक्षक आमदार जयंत आसगावकर एस डी लाड दादासाहेब लाड राहूल पोवार माध्य. शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत आदीसह अन्य मान्यवर.

णणययय णण

schedule05 Jun 26 person by visibility category

*बातमीपत्र*

*महाव्दार रोड रिक्षा, चारचाकींसाठी खुला करावा*

*कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची वाहतूक पोलीस निरिक्षक नंदकुमार मोरे यांचेकडे मागणी*

 

कोल्हापूर दि. ५ : महाव्दार रोड वरील वाहतूक कोंडी कमी करणेसाठी बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी व सरस्वती टॉकीज ते महाव्दार चौक मार्गे पापाची तिकटी हे दोन रस्ते रिक्षा व चारचाकी वाहनांसाठी बंद केले असले तरी या दोन्ही रस्त्यांवर व्यापार मोठ्या प्रमाणात असून रिक्षा व चारचाकी वाहनांसाठी वाहतूक बंद निर्णयामुळे व्यापारावर मोठा परिणाम होत असल्याने दोन्ही रस्ते रिक्षा व चारचाकींसाठी खुले करावेत याबाबतचे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने वाहतूक पोलीस निरिक्षक नंदकुमार मोरे व पोलीस उपाधिक्षक (वाहतूक) ज्ञानेश गवई यांचेकडे सादर केले.

निवेदनात म्हंटले आहे, कोल्हापूर शहरातील वर्दळीचा परिसर असलेल्या महाव्दार रोड परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी व सरस्वती टॉकीज ते महाव्दार चौक मार्गे पापाची तिकटी हे दोन रस्ते रिक्षा, चारचाकी यांना प्रायोगिक तत्वावर बंद केले आहेत व पुढील काळात त्याची कायमस्वरुपी अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. 

सदर दोन्हीं रस्त्यांवर व्यापारी पूर्वापार आपला व्यवसाय करत आहेत. त्यांच्या व्यवसायावर या निर्णयामुळे फार मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या रस्त्यांवर भांडी, कापड दुकान, कन्झ्युमर प्रोडक्ट तसेच कपिलतीर्थ मार्केट येथे किराणा व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. भांड्यांचा माल, कापडाचे गट्टे, बॉक्स यांची वाहतूक टेम्पो, रिक्षा अशा वाहनांतूनच करावी लागते. कपिलतीर्थ मार्केट मधील किराणा व्यापाऱ्यांचा माल तर मोठ्या पोत्यात भरुन मोठ्या वाहनातून आणावा लागतो. परंतू या वाहनांना हे रस्ते बंद असल्याने व्यापाऱ्यांना माल आस्थापनेत आणता येत नाही व डिलिव्हरीही देता येत नाही. तसेच ट्रक व तत्सम वाहनांना शहरांतर्गत वाहतूकीसाठी सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत मनाई आहे त्याचाही फटका व्यापाऱ्यांना काही वर्षांपासून बसत आहे.

वाहतूक कोंडीचा विचार करुन बिनखांबी गणेश मंदिर ते महाव्दार रोड हा मार्ग पूर्वीपासून एकेरी मार्ग केला आहे. परंतू, या रस्त्यावर एकेरी मार्गाचा अवलंब होताना दिसत नाही. अनेक दुचाकींसह इतर वाहनधारक या एकेरी मार्गाचा भंग करत आपली वाहने महाव्दार रोड वर चालवतात. त्यामुळे देखील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो याचा विचार व्हावा. महाव्दार रोड वर रिक्षा व चारकींसाठी मनाई करण्यामागील उद्देश स्पष्ट होण्याची गरज आहे.

कोरोना, महापूर व ऑनलाईन व्यापारामुळे अगोदरच व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली आहे. महाव्दार रोड वरील अनेक व्यावसायिक हे छोटे दुकानदार आहेत. रिक्षा व चारचाकींना मनाई केल्यामुळे त्यांचा व्यवसाय कोलमडण्याची शक्यता आहेत

चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहन पार्किंगसाठी दिशादर्शक फलक लावले तर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. दिशादर्शक फलक लावणेकामी कोल्हापूर चेंबर तर्फे जरुर ते सहकार्य केले जाईल. परंतु, रिक्षा आणि चारचाकींसाठी महाव्दार रोड बंदचा प्रायोगिक तत्वावर घेतलेला निर्णय मागे घेवून वाहतूक पूर्ववत सुरळीत चालू ठेवावी व तेथील व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा.

यावेळी संजय शेटे, प्रशांत शिंदे, विज्ञानंद मुंढे, धनंजय दुग्गे, संपत पाटील, राहुल नष्टे, शाम जोशी, डॉ गुरुदत्त म्हाडगुत, विजय नारायणपुरे,सागर कदम, महेश डोईफोडे, दिपक गुळवणी यांच्यासह महाव्दार रोड परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

*चौकट : सदर रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करणेसाठी हा निर्णय घेतला असला तरी या निर्णयामुळे या रस्त्यांवर अतिक्रमणासह फेरीवाल्यांची संख्या वाढण्याचा धोका आहे असे संजय शेटे यांनी सांगितले.*

णण तत

schedule05 Jun 26 person by visibility category

*डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मध्ये 'सेंटर ऑफ एक्सलन्स इन इलेक्ट्रिक व्हेईकल्स'चे उद्घाटन*
पश्चिम महाराष्ट्रातील पहिले इलेक्ट्रिक व्हेईकल प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित

कोल्हापूर, दि. ५ जून : इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रासाठी कुशल तंत्रज्ञ घडविण्याच्या उद्देशाने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे बजाज ऑटो लिमिटेड, पुणे यांच्या उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून उभारण्यात आलेल्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स इन इलेक्ट्रिक व्हेईकल्स'चे उद्घाटन लोकप्रिय युवानेते आणि आमदार मा. श्री. रोहित पाटील (तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ) यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते. पश्चिम महाराष्ट्रातील अशा प्रकारचे हे पहिलेच अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र आहे. बजाज सी एस आर व्यवस्थापक प्रीयांशी शर्मा यांचे सोबत मान्यवरांनी केंद्राची पाहणी करून उपलब्ध प्रशिक्षण सुविधा, आधुनिक उपकरणे यांची  माहिती घेतली. 
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले , "भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योग झपाट्याने विकसित होत असून या क्षेत्रात प्रशिक्षित तंत्रज्ञांची मागणी सातत्याने वाढत आहे. अशा वेळी पश्चिम महाराष्ट्रात उभारण्यात आलेले हे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र काळाची गरज ओळखून उचललेले दूरदृष्टीचे पाऊल आहे. या उपक्रमामुळे स्थानिक युवकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील." प्राचार्य साळुंखे म्हणाले , "शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्याची प्रक्रिया आहे. 'सेंटर ऑफ एक्सलन्स इन इलेक्ट्रिक व्हेईकल्स'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी निगडित कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. उद्योग आणि शिक्षण यांच्यातील दरी कमी करून रोजगारनिर्मितीला चालना देण्याचे हे केंद्र महत्त्वपूर्ण कार्य करेल."  संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे म्हणाले " श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था , बजाज ऑटो लिमिटेड, ग्लोबल टॅलेंट ट्रॅक यांचे हे सहकार्य कौशल्याधारित शिक्षणासाठी आदर्श ठरणारे आहे. उद्योग क्षेत्राच्या अपेक्षांनुसार प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामासाठी सक्षम बनविण्याची क्षमता या केंद्रात आहे. अशा उपक्रमांमुळे शिक्षण संस्थांची सामाजिक बांधिलकी अधिक प्रभावीपणे अधोरेखित होते."  ग्लोबल टॅलेंट ट्रॅक  (GTT), पुणे चे सिनिअर डायरेक्टर (ऑपरेशन्स) अमित भोसले यांनी सदरच्या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना बजाज च्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रमातून कौशल्यपूर्ण प्रशिक्षण मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
काळे बजाज कोल्हापूर चे संचालक विप्लव कासलीवाल म्हणाले “या केंद्रामध्ये बजाज ऑटो लिमिटेडचा महत्त्वपूर्ण कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक वाहनांची दुरुस्ती, देखभाल, निदान तंत्रज्ञान आणि आधुनिक सेवा पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे कोल्हापुरातील इलेक्ट्रिक वाहने वापरणारे लोक वाहनांचा अधिकाधिक वापर करण्यास उद्युक्त होणार आहे. उपक्रमाचे प्रमुख इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी “सदरचा तीन महिन्यांचा हा प्रशिक्षण अभ्यासक्रम १२ वी (विज्ञान), आयटीआय आणि डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आला असून प्रशिक्षित तंत्रज्ञांच्या आधारावर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढून शहरातील प्रदूषणास चांगला आळा बसेल ” अशी माहिती दिली.  केंद्राचे समन्वयक प्रा. अभिजित रेडेकर यांनी केंद्राच्या उभारणी दरम्यान महत्वाचे योगदान दिले तसेच उद्घाटन कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले.
प्रा. आरती चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील , प्रा. डॉ. महेश साळुंखे , बजाज टू-व्हीलर वाहनांचे अधिकृत विक्रेते, रजिस्ट्रार अमित आवाड , महाविद्यालयाचे पदाधिकारी, सर्व विभागप्रमुख प्राध्यापक, गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

णण यय

schedule05 Jun 26 person by visibility category

*कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांचा मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच लोकार्पण सोहळा : आमदार राजेश क्षीरसागर*

 

*जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत कामांचा आढावा*

 

कोल्हापूर, दि.०५ : गेल्या अनेक वर्षात महायुतीच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्यमंत्री व सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिवंगत उपमुख्यमंत्री कै.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शहराला कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीच्या माध्यमातून पूर्णत्वास येत असलेल्या विकास कामांचे लोकार्पण तसेच प्रस्ताविक कामांचा शुभारंभ लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त दि.२६ जून  करण्याचा आमचा मानस आहे. त्याअनुषंगाने सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही सर्व कामे उच्च दर्जाची ठेवून वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यासर्व कामांचा आढावा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे सादर करून त्यांच्या हस्ते या कामांचे लोकार्पण करून राजर्षी शाहू जयंतीदिनी कोल्हापूरकरांना ही मोठी विकास भेट देता येईल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

 

कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर शहरातील कोट्यवधी रुपयांच्या विविध महत्त्वाकांक्षी विकासकामांचा लोकार्पण सोहळा येत्या २६ जून रोजी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्याचा महायुती शासनाचा मानस आहे. यामध्ये प्रामुख्याने रंकाळा तलाव येथील म्युझिकल फौंऊटेन, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, गांधी मैदान जलनिस्सारण प्रकल्प, शहरातील शाहूकालीन तालीम संस्थांच्या पुर्नबांधणी केलेल्या इमारती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, सरस्वती टॉकीज येथील बहुमजली पार्किंग इमारत, १०० ई बसेस, अमृत योजनेतून बसविण्यात आलेले एस.टी.पी. प्लांट आदी पूर्णत्वास येत आहेत. या कामांचा लोकार्पण सोहळा यासह पूरनियंत्रण प्रकल्पाचा पहिला टप्पा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर,  श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, राजर्षी शाहू मिल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक या कामांचा उद्घाटन सोहळा समाविष्ठ आहे. या विकास कामांमुळे कोल्हापूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असून, नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत. येत्या २६ जून रोजी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त किंवा ८ ऑगस्ट या रंगकर्मी दिनानिमित्त मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांची वेळ घेवून लोकार्पण व उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात येईल, अशी माहिती दिली.

 

चौकट :

 

*श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात भुयारी मार्ग प्रकल्पाचे आराखडे समाविष्ठ करा : आमदार क्षीरसागर यांच्या सूचना* 

 

कोल्हापूर शहरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे पुढील काळात भाविक व पर्यटकांची संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. यामुळे शहरातील वाहतुकीवर याचा विपरीत परिणाम होणार आहे. याची पूर्वखबरदारी घेणे आवश्यक असून, आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिरापर्यंत आणि शिवाजी स्टेडियम ते उड्डाणपूलापर्यंत भुयारी मार्ग उभारणे आवश्यक आहे. या भुयारी मार्ग प्रकल्पाचा मुख्य उद्देश मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी पूर्णपणे सोडवणे आणि भाविकांना सुरक्षित दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देणे हा आहे. या महत्त्वाकांक्षी भुयारी मार्ग प्रकल्पामुळे श्री अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. त्यामुळे भुयारी मार्गाचा आराखडा तयार करून तीर्थक्षेत्र आराखड्याच्या दुसऱ्या टप्पात याचा समावेश करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी विजय राठोड यांना दिल्या.

 

या बैठकीस जिल्हाधिकारी विजय राठोड, मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, शहरअभियंता रमेश मस्कर, सा.बा.विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.मिरजकर, उपअभियंता इंगवले, मनपा प्रकल्पअधिकारी सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

णण तय

schedule12 Apr 26 person by visibility 120 categoryसामाजिक

चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पत्रकार परिषदेबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण......
       
*माझी आणि आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट झाल्यानंतर त्यांचे सगळे गैरसमज दूर होतील*
           
*वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण* 
             
*आमदार श्री. पाटील यांना दूध संस्था नोंदणीची प्रक्रियाही सविस्तर समजावून सांगेन*
           
*कोल्हापूर, दि. १२:*
माझी आणि आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट झाल्यानंतर त्यांच्या मनातील सगळे गैरसमज, शंका- कुशंका आणि प्रश्न दूर होतील, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आमदार श्री. पाटील यांना दूध संस्था नोंदणीची प्रक्रियाही सविस्तर समजावून सांगेन, असेही ते म्हणाले.
        
याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता श्री. मुश्रीफ म्हणाले.....
      
□ गोकुळ दूध संघामध्ये आजघडीला महायुतीची सत्ता आहे.
यामध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार म्हणून मी, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, भाजपाचे माजी आमदार संजयबाबा घाटगे व इतर नेतेमंडळी आम्ही सत्तेमध्ये सहभागी आहोत. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आमची याबद्दल सविस्तर चर्चा झालेली आहे. ही सगळी माहिती आमदार शिवाजीराव पाटील यांना कळाली की त्यांच्या सगळ्या शंकांचे आणि गैरसमजांचे निरसन होईल, अशी मला खात्री आहे.
        
□ चंदगडचे आमदार श्री. शिवाजीराव पाटील यांची सोशल मीडियावर व्हिडिओ बघितला आणि मी आश्चर्यचकित झालो. कारण माझी आणि त्यांची गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत दोनवेळा सविस्तर चर्चा झालेली होती. ते असे का बोलले आहेत, हे  ते मला भेटल्यानंतरच समजेल.
      
□ आमदार श्री. शिवाजीराव पाटील यांची जी वक्तव्ये आहेत ते पाठीमागून त्यांना कुणीतरी चुकीचे "प्राॅम्टींग" करीत असल्यासारखे वाटते.
       
□ आमदार शिवाजीराव पाटील यांना मी समजावून सांगेन की, त्यांनी कागलसह करवीर, राधानगरी या तीन तालुक्यांचा उल्लेख केलेला आहे. कदाचित, या वातावरणामुळे सभासदांच्यात गैरसमज निर्माण होतील आणि आमदार शिवाजीराव पाटील जे उमेदवार देणार आहेत त्यांच्या मताधिक्यावरही परिणाम होऊ शकतो. ही गोष्टही मी त्यांना समजावून सांगणार आहे.
     
□ याबद्दल मा. उच्च न्यायालय आणि दुग्धविकास विभागाने एस. आय. टी. नेमलेली आहे. या सर्व चौकशीअंती "दूध का दूध आणि पाणी का पाणी" होईलच. न्यायालयात प्रत्यक्षात बाराशे दूध संस्थांची सुनावणी सुरू असताना, तो आकडा ३७०० सांगितल्यामुळे विनाकारण लोकांच्यात गैरसमज निर्माण होईल.
            
चौकट........
मोठा गैरसमज......!
□ श्री. मुश्रीफ म्हणाले, आमदार शिवाजीराव पाटील यांचा मोठा गैरसमज झालेला दिसतोय. दूध संस्था नोंदणी  करतानाची काय -काय प्रक्रिया असते, हे सुद्धा मी त्यांना समजावून सांगेन. सरकारी अधिकारी ही कोणतीही बेकायदेशीर गोष्ट करू शकत नाहीत. श्री. महेश कदम हे सहाय्यक निबंधक- दुग्ध कधीच नव्हते. माझ्या माहितीनुसार या दूध संस्थांची नोंदणी दुग्धचे  सहाय्यक निबंधक श्री. गजेंद्र देशमुख आणि श्री. प्रदीप मालगावे यांच्या काळामध्ये झालेली आहे.
===========

णण तत

schedule25 Mar 26 person by visibility 182 categoryउद्योग

[25/03, 18:49] Raja: " प्रेस नोट "

"मुंबई उच्च्य न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून तत्कालीन मा. मैत्री दुग्धविकास व सहनिबंधक सहकारी संख्या (दुग्ध) यांचे दि. ०८/१२/२०२३ चे आदेश रद्द "

तत्कालीन सचिव दुग्धविकास श्री. तुकाराम मुढे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील ग्रामीण प्राथमिक सहकारी दुध संस्था नियम व उपविधीनुसार वर्षातून २४० दिवस किमान ५० लिटर दुध हे दुध संघास पुरवठा करीत नाहीत त्या संस्था नियमानुसार त्यांच्यावर अवसायनात्त्वी कारवाई करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले होते. असा निर्णय त्यांच्या २७/०९/२०२३ च्या बैठकीत झाला होता. त्यानुसार राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यातील सहनिबंधकांना बैठीतील निर्णयानुसार अवसायनायची कारवाई पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.

सहनिबंधक सहकारी संस्था दुग्धा कोल्हापूर यांनी गोकूळ कडून सर्व दुग्ध संस्थाच्या दूध संकलनाची माहिती मागितली होती गोकूळचे रेकॉर्ड तपासून सुमारे १२०० दूध संस्था दररोज १५ लिटरपेक्षा कमी दुध टाकण्याचे निष्पन झाले. त्यामुळे अंतरिम आदेश काढून १२०० संस्था अवसायनात काढयाची प्रक्रिया केली सर्व संस्थांनी ३० दिवसात समाधानकारक खुलासा न दिल्यास अवसायनाचा आदेश अंमि का करण्यात येऊ नये म्हणुन त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ३० दिवसांचा वेळ दिला ३० दिवसात एकाटी संस्थेने त्यांचे म्हणणे मांडले नाही किंवा समाधानकारक खुलासा केला नाही याउलट तत्कालिन पालकमंत्री आणि वैद्यकीय हसन मुश्रीफ यांनी तत्कालीन दुग्ध विकास मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून राज्यात लंपी नावाच्या रोंगाचा उद्रेक झाला आहे. व महाराष्ट्रात दुष्काळ आहे म्हणून दुध उत्पादन कमी झाल्याने दुध संस्थेचे संकलन कमी झाले असल्याने अशा परिस्थितीत सहनिबंधकाने अर्धव्यायक अवसायनाची प्रक्रिया रद्द करावी म्हणून बिनतारखेचे पत्र तत्कालीन दुग्ध विकास मंत्र्यांना दि. ११ डिसे २०२३ रोजी प्राप्त झाले पालकामंत्र्यांच्या वरील पत्रावर तत्कालीन दुग्ध विकास मंत्र्यांनी कोल्हापूर जिल्हातील दुग्ध विकास संस्थावरील अवसायनाच्या प्रक्रियेला स्थागिती देण्याचे आदेश दिले.

पालक मंत्र्याचे पत्र मिळण्यापूर्वी व दुग्ध विकास मंत्र्याचे आदेश होण्यापूर्वी सहनिबंधका सहकारी संस्था दुग्ध श्री. शहाजी पाटील यांनी दुग्ध विकास मंत्र्यांच्या आदेशाची अमंलबजावणी करावी असे आदेश ३ दिवस आधिच काढले विभागीय उपान्याधक पुणे यांनी मा दुग्ध विकास मंत्र्यांचे आदेशाची अमलबजावणी करावी असे आदेश दिले
[25/03, 18:49] Raja: त्यानुसार सहय्यक निबंधक कोल्हापूर यांनी अवसायनाची पुढील कारवाई स्थगित केली पर्यायाने अवसायकांची नेमणूक करून देखील संस्थांचा ताबा घेता आला नाही.

श्री प्रकाश बेलवाडे, संचालक महादेव सह. दुग्ध विकास संस्थेने मा दुग्ध विकास मंत्र्याकडे हस्तक्षेप अर्ज दाखल करून दुग्ध विकास मंत्र्यांनी दिलेली स्थागिती रद्द करावी अथवा उठवावी व दुग्ध विकास मंत्र्यांनी दिलेला आलेला रद्द करावा अशी विनवणी केली. तेव्हा दुध विकास मंत्र्यांनी बैलवाडेंच्या अर्जावर सुनावणी घेतली नाही म्हणून नाईलाजाने प्रकाश बेलवाडे यांना मा. उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली.

पालक मंत्र्यांनी वैयक्तिक राजकीय स्थार्थापोटी तत्कालीन दुग्ध विकास मंत्र्याकडून स्थागिती आदेश मिळाविला जो त्यांच्या अधिकार नव्हाता तत्कालीन दुग्ध विकास मंत्र्यांच्या अधिकार बाह्य आदेशाविरूद्ध मा. उच्च न्यायालयात आव्हाने दिले.

दुग्ध विकास मन्यानी पालक मध्याच्या पावर स्थागिती देयावी अशी टिपणी केली होती. मंत्र्याची टिपनी हा म्हणजे महाराष्ट्र शासनाचा आहेशन की एखादया अर्जावर किंवा पनावर मंत्र्यांनी टिपणी केल्यावर त्यान्चे शासन आदेशात रूपांतर होण्यासाठी मलालयात विहीत प्रक्रियेचा अवलंवा करून मा. राज्यपालांच्या नावाने आदेश काढावे स्वागतातः असे कोणतेही आदेश महाराष्ट्र शासनाकडून निर्मनिर्गमित झाले नसलेने तत्कालीन सहनिबक सहकारी संस्था दुधा महाराष्ट्र यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून गंसायी गर्जी राखण्यासाठी बेकायदेशीर आदेश काहले. वरील याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे मा न्यायमुती सचिन देशमुख यांनी समोर, झार्नेऊसना याचिकाकर्याकडून अँड सतिश तळेकर यांनी आपल्या युक्नीकदात अधिकार बाढ्य आदेश घटनेच्या कलमन्द चा भंग होतो. व तसेच सहकारी म शासनातर्फ अंडमाळी. तर हसन मुश्रीफ यांचे तकै अँड अनिल साखरेयोनी महाराष्ट्र सहकारी कायदा कलम १९ नुसार शासनास आदेश काढत्वयागचा अधिकार आहे हे म्हणने करो चुकीचे आहे कारण प्रशासकीय अधिकाराचा कपर करून अर्धन्यायिक प्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नाही. दोमिही मंसानी त्यांच्या प्रभात किंवा टिपणीत तारखेचा उल्लेख नसल्याने वरील वर्तणूक राज्यायानांनी शासनाच्या दैनंदिनी कारभाराबाबत केलेल्या नियमाला धरुना नाही.
[25/03, 18:50] Raja: अँड सतिश तळेकर यांचा युक्तिवाद सुरु असतानाच श्ती हसन मुश्रीफ यांचे वकील व शासनाचे वकील योनी वरील आदेश खूद करण्यास आमची संमती आहे तेबा कोर्टाचा वेळ वाचेल व श्री महादेव दूध व्याव सहकारी संस्थेच्या याविकेतील मागणी माझ्य करता येईल, असे मांडले.

उच्च न्यायालयाकडून मंसांच्या वर्तणूकीबद्दल ताशेरे येतील किंवा उपका ठेवला जाईल या भितीने मा. मंत्र्यांचे आदेश व रतह निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) महाराष्ट्र घोचे आदेश रद्द करण्यात यावेत अशी विनंती प्रतिवादीतर्फे करण्यात आली. कोर्टाने ती माझ्य करून तत्कालीन दूध विकास मैन्यांचे आदेश व सहनिबंधकांचे आदेश रद्द केले. अशा प्रकारे सत्याचाच विजय झाला।

घघ मण

schedule16 Jan 26 person by visibility 375 category

क्रिडाई कोल्हापूर आयोजित वास्तू विषयक प्रदर्शन (दालन) मंडप उभारणीस सुरुवात

क्रिडाई कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिक सर्वोच्च शिखर संघटना असून क्रिडाई कोल्हापूर तर्फे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे बांधकाम व वास्तू विषयक प्रदर्शन (दालन)दि. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान महासैनिक दरबार हाॅल ग्राउंड येथे आयोजित करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचा मंडप उभारणी कार्याचा शुभारंभ क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत यांच्या शुभ हस्ते व दालनचे चेरमन महेश यादव, व्हा. चेरमन आदित्य बेडेकर,समन्वयक निखिल शाह क्रिडाई चे सेक्रेटरी गणेश सावंत, दालन सेक्रेटरी संग्राम दळवी तसेच दालनचे पदाधिकारी सभासद यांच्या उपस्थितीत रविवार दि. 11/01/2026 रोजी संपन्न झाला. क्रिडाई अध्यक्ष सौ व श्री के. पी.खोत यांच्या हस्ते मंडप उभारणी कार्याचे भूमिपूजन करण्यात आले.
क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष श्री. के. पी. खोत यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलताना संघटनेच्या 35 वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेत क्रिडाई ने बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासण्याबरोबर शहराचा विकासात केलेल्या भरीव कार्यावर प्रकाश टाकला. दालन बदल माहिती देताना या दालनचे वैशिष्ट म्हणजे सन 1992 साली बांधकाम विषयक प्रदर्शनाची सुरुवात झाली. यंदाचे *दालन* 2026 हे क्रिडाई कोल्हापूर तर्फे भरवले जाणारे 13 वे दालन आहे. या दालनचे *उदघाटन*शुक्रवार दि 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11. वाजता होणार आहे. दालन 2026 विषयी माहिती देताना दालन चे चेअरमन श्री. महेश यादव यांनी या प्रदर्शनाचा मुख्य हेतू कोल्हापूर व परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली नवनवीन बांधकाम प्रकल्प व तत्रंज्ञान, बांधकाम विषयक साहित्य, सेवा अर्थसाहाय्य योजना यांची माहिती मिळणार असून घराचे स्वप्न प्रत्यक्षात सत्यात उतरविण्यात या प्रदर्शनाचा मोठा फायदा होणार असून याचे लक्ष यंदा संधी सर्वांसाठी असे आहे. 

या दालनचे प्रायोजक पुढीलप्रमाणे -
प्लॅटिनम स्पॉन्सर -1) आर्या स्टील्स् रोलिंग प्रा. लि

*डायमंड स्पॉन्सर- 1)इटाका सिरमिक्स 2)एसकॉन इस्पत प्रेस्टिज एल एल पी.

गोल्ड स्पॉन्सर (बिल्डर्स)1)केवेस्ट इन्फ्रा अँड हायवेस्ट डेव्हलपर्स
गोल्ड स्पॉन्सर- 1) अविष्कार इन्फ्रा  2)मोटो टाईल्स 3) स्टेट बँक ऑफ इंडिया 4)यश पॉली 5) सिम्पोलो टाईल्स 

*सिल्वर स्पॉन्सर-1)विन्डो एक्स्पर्ट  2) एच आर विंडटेक ( व्ही इ के प्रा. ली. 3)तेजस इंडस्ट्रिज 4)युनियन बँक ऑफ इंडिया

सेमी कॉ स्पॉन्सर 1) फेराकॉल 2) स्मॅश इलेव्हटर  3)बँक ऑफ इंडिया 4) एनएन आयटी कार पार्किंग सिस्टीम प्रा. ली. 5) वोक्स इंटेरियर आणि एक्सटेरियर  सोलुशन प्रा. ली. 6)हायड्रा पार्क 7)ग्रेट व्हाईट ग्लोबल 8) पॅरीवेअर रोका 9) लिशा स्वीचेस 10) ओटीस इलेव्हटर्स 11) कोने इलेव्हटर्स वरील सर्व प्रयोजकांची दालन 2026 यशस्वी होण्यासाठी मदत  लाभली आहे.

कोल्हापूर परिसरातील सिव्हिल इंजिनीरिंगच्या विद्यार्थी याच्यासाठी शनिवार दि. 31 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता टेक्निकल सेमिनार आयोजित केले असून, रविवार दिनांक 1 फ्रेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सुसंवाद साधणार आहेत. सांगता समारंभ सोमवार दिनांक 2 फ्रेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता होणार आहे 

    या कार्यक्रमास क्रिडाई कोल्हापूर अध्यक्ष के. पी.खोत  उपाध्यक्ष प्रकाश देवालापूरकर, चेतन वसा,सचिव गणेश सावंत, खजानिस अजय डोईजड,दालन चेअरमन महेश यादव, व्हाईस चेअरमन आदित्य बेडेकर, समन्वयक  निखिल शाह, सह समन्वयक  पवन जामदार, दालन सचिव संग्राम दळवी, खजानिस अमोल देशपांडे,बिझनेस प्रोमोशन चेअरमन गौतम परमार,ग्राउंड कमिटी चेअरमन श्रीकांत पाटील, डिझाईन, प्रिटिंग कमिटी चेअरमन विजय माणगांवकर, हॉस्पीटीलिटी कमिटी चेअरमन केतन शाह, सोवियनर कमिटी चेअरमन संदीप बोरचाटे, स्टॉल ऑलॉकेशन कमिटी चेअरमन तुषार बेर्डे तसेच क्रिडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष विदयानंद बेडेकर, जेष्ठ सभासद कृष्णा पाटील, सुजय होसमनी, विवेकानंद पाटील,श्रेयांश मगदूम, शंकर गावडे,क्रिडाई कोल्हापूरचे सह खाजानिस सागर नालंग, संचालक प्रदीप भारमल,सुनील चिले,तसेच सभासद,प्रायोजक, स्टॉलधारक मोठ्या संख्येने हजर होते. शेवटी आभार प्रदर्शन सचिव गणेश सावंत यांनी केले.

भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन, नवोन्मेष तंत्रज्ञान विकासाची केंद्रे म्हणून कार्य करावे

schedule24 Dec 25 person by visibility 447 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासाची केंद्रे म्हणून कार्य केले पाहिजे. यासाठी उच्च शिक्षणाचा विस्तार आणि संशोधन उत्पादनात वाढ गरजेची आहे. शिवाय जागतिक ज्ञाननेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी भारताने आपल्या वेगाने वाढणाऱ्या उच्च शिक्षण व्यवस्थेचा आणि संशोधन क्षमतेचा प्रभावी उपयोग करणे आवश्यक आहे. शिवाजी विद्यापीठासारख्या संस्था प्रथमच विकसित होणाऱ्या तंत्रज्ञान, संशोधन निष्पत्ती आणि नावीन्यपूर्ण उत्पादनांच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावू शकतात’असे मत डॉ. जी सतीश  रेड्डी यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ बुधवारी, २५ डिसेंबर २०२५ रोजी दिमाखात पार पडला. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. रेड्डी यांनी, ‘भारतात एक हजारांहून अधिक विद्यापीठे असून सुमारे ४.३८ कोटी विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. आयआयटी, आयआयएम, एनआयटी आणि केंद्रीय विद्यापीठांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच संशोधन प्रकाशनांची संख्या आणि पीएच.डी. पदवीधारकांच्या संख्येत भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संस्थांनी गुणवत्ता व स्पर्धात्मकता वाढवून अधिकाधिक विद्यापीठांना जागतिक क्रमवारीतील अग्रभागी नेणे गरजेचे आहे.१०–१५ वर्षांपूर्वी जागतिक टॉप ५०० क्रमवारीत केवळ एक-दोन भारतीय संस्था असत, आज मात्र अनेक संस्था त्या यादीत असून काही टॉप १०० कडे वाटचाल करत आहेत.’असे त्यांनी नमूद केले.

 ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या आवाहनांमुळे क्षेपणास्त्रे, रडार, सोनार, टॉर्पेडो, एअरबॉर्न वॉर्निंग सिस्टीम्स, विमाने, पाणबुड्या, जहाजे, चिलखती वाहने, रणगाडे आणि तोफा अशा विविध क्षेत्रांत स्वदेशी क्षमता विकसित झाली आहे. पुण्यात टाटा आणि भारत फोर्ज यांनी डीआरडीओच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसित केलेली स्वदेशी तोफ—जिचा वापर लाल किल्ल्यावर औपचारिक समारंभात होतो—जागतिक स्तरावर उत्कृष्ट मानली जात असल्याचे त्यांनी सांगितले. ही बाब या परिवर्तनाचे प्रतीक आहे. उद्योगक्षेत्राने, विशेषतः खासगी कंपन्यांनी, संरक्षण संशोधन व उत्पादनात सक्रिय सहभाग घेऊन वाढत्या संधींचा लाभ घ्यावा.’असे आवाहन रेड्डी यांनी केले.  

शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी,  शिवाजी विद्यापीठाची गौरवशाली परंपरा, दर्जेदार व समताधिष्ठित शिक्षण देण्यातील त्याची भूमिका, तसेच पदवीप्राप्त विद्यार्थ्यांकडून समाजोपयोगी व जबाबदार नागरिक म्हणून अपेक्षित असलेली भूमिका यांचा सविस्तर ऊहापोह करण्यात आला. सातत्यपूर्ण अध्ययन, नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार, नैतिक मूल्यांची जोपासना आणि समाज व राष्ट्रासाठी—राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर—योगदान देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांवर आधारित गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि सामाजिक बांधिलकीचे केंद्र म्हणून शिवाजी विद्यापीठाची ओळख आहे. शिवाजी विद्यापीठ हे केवळ शैक्षणिक संस्था नसून स्वाभिमान, सामाजिक जबाबदारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशावर उभे असलेले प्रेरणास्थान असल्याचे’त्यांनी सांगितले. प्रकुलगुरु डॉ. ज्योती जाधव यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला.


 

घघ तत

schedule12 Dec 25 person by visibility 502 category

मा.संपादक

   इंग्लंड येथील आर्बोरिकल्चर असोसिएशन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पार्कर यांचे आज भारतात आगमन झाले. ते 
14 आणि 15 डिसेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत.
    वारसा वृक्षांच्यासाठी जागतिक पातळीवर काम करणाऱ्या इंग्लंड येथील आर्बोरिकल्चर असोसिएशन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पार्कर यांचे आज भारतात आगमन झाले. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी 2 येथे आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी यांच्या वतीने त्यांचे पुष्पहार घालून मुंबई येथे स्वागत करण्यात आले.यावेळी वृक्ष संवर्धन तज्ञ वैभव राजे यांच्या समवेत आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टचे मुकुल म्हात्रे, राहुल कांबळे,
पंकज देहगावकर, महेंद्र हौसनूर उपस्थित होते.
          कोल्हापूर जिल्ह्यातील वारसा वृक्ष (हेरिटेज ट्री) हे आंतर राष्ट्रीय नकाशावर यावेत. यासाठी आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी प्रयत्नशील आहे. जागतिक पातळीवर यासाठी काम करणाऱ्या युके आर्बोरिकल्चर असोसिएशन  या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पार्कर यांच्याशी संस्थापक अध्यक्ष राहुल मगदूम यांनी संपर्क केला. त्याला समाधानकारक प्रतिसाद देत जॉन पार्कर यांनी भारतामध्ये कोल्हापूर येथे गेल्या महिन्यात येणार होते. परंतु काही कौटुंबिक अडचणीमुळे त्यांना येता आले नाही.
        ते आता दोन दिवसांच्या दौऱ्यात आजरा शिरशिंगी येथील भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड, शाहूवाडी येथील खेडेचा महाकाय बेहडा वृक्ष आणि कोल्हापूर शहर येथील गोरख चिंचं तसेच महावीर उद्यान येथील कैलासपती या वारसा वृक्षांची तसेच टाऊन हॉल येथील  दुर्मिळ वृक्षांची पाहणी करणार आहेत त्याचबरोबर चुये येथील नदीकाठचा वड या ठिकाणी भेट देणार आहेत.अशी माहिती आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टचे आणि आझाद हिंद नेचर आर्मीचे अध्यक्ष राहुल मगदूम यांनी दिली.
      फोटो ओळ : 
वारसा वृक्षांच्यासाठी जागतिक पातळीवर काम करणाऱ्या इंग्लंड येथील आर्बोरिकल्चर असोसिएशन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पार्कर यांचे आज भारतात आगमन झाले. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी 2 येथे आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी यांच्या वतीने त्यांचे पुष्पहार घालून मुंबई येथे स्वागत करण्यात आले.यावेळी वृक्ष संवर्धन तज्ञ वैभव राजे यांच्या समवेत आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टचे मुकुल म्हात्रे, राहुल कांबळे,
पंकज देहगावकर, महेंद्र हौसनूर उपस्थित होते.

शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन

schedule08 Dec 25 person by visibility 537 category

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes