णण तय
schedule12 Apr 26 person by visibility 16 categoryसामाजिक
*माझी आणि आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट झाल्यानंतर त्यांचे सगळे गैरसमज दूर होतील*
*वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण*
*आमदार श्री. पाटील यांना दूध संस्था नोंदणीची प्रक्रियाही सविस्तर समजावून सांगेन*
*कोल्हापूर, दि. १२:*
माझी आणि आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट झाल्यानंतर त्यांच्या मनातील सगळे गैरसमज, शंका- कुशंका आणि प्रश्न दूर होतील, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आमदार श्री. पाटील यांना दूध संस्था नोंदणीची प्रक्रियाही सविस्तर समजावून सांगेन, असेही ते म्हणाले.
याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता श्री. मुश्रीफ म्हणाले.....
□ गोकुळ दूध संघामध्ये आजघडीला महायुतीची सत्ता आहे.
यामध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार म्हणून मी, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, भाजपाचे माजी आमदार संजयबाबा घाटगे व इतर नेतेमंडळी आम्ही सत्तेमध्ये सहभागी आहोत. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आमची याबद्दल सविस्तर चर्चा झालेली आहे. ही सगळी माहिती आमदार शिवाजीराव पाटील यांना कळाली की त्यांच्या सगळ्या शंकांचे आणि गैरसमजांचे निरसन होईल, अशी मला खात्री आहे.
□ चंदगडचे आमदार श्री. शिवाजीराव पाटील यांची सोशल मीडियावर व्हिडिओ बघितला आणि मी आश्चर्यचकित झालो. कारण माझी आणि त्यांची गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत दोनवेळा सविस्तर चर्चा झालेली होती. ते असे का बोलले आहेत, हे ते मला भेटल्यानंतरच समजेल.
□ आमदार श्री. शिवाजीराव पाटील यांची जी वक्तव्ये आहेत ते पाठीमागून त्यांना कुणीतरी चुकीचे "प्राॅम्टींग" करीत असल्यासारखे वाटते.
□ आमदार शिवाजीराव पाटील यांना मी समजावून सांगेन की, त्यांनी कागलसह करवीर, राधानगरी या तीन तालुक्यांचा उल्लेख केलेला आहे. कदाचित, या वातावरणामुळे सभासदांच्यात गैरसमज निर्माण होतील आणि आमदार शिवाजीराव पाटील जे उमेदवार देणार आहेत त्यांच्या मताधिक्यावरही परिणाम होऊ शकतो. ही गोष्टही मी त्यांना समजावून सांगणार आहे.
□ याबद्दल मा. उच्च न्यायालय आणि दुग्धविकास विभागाने एस. आय. टी. नेमलेली आहे. या सर्व चौकशीअंती "दूध का दूध आणि पाणी का पाणी" होईलच. न्यायालयात प्रत्यक्षात बाराशे दूध संस्थांची सुनावणी सुरू असताना, तो आकडा ३७०० सांगितल्यामुळे विनाकारण लोकांच्यात गैरसमज निर्माण होईल.
चौकट........
मोठा गैरसमज......!
□ श्री. मुश्रीफ म्हणाले, आमदार शिवाजीराव पाटील यांचा मोठा गैरसमज झालेला दिसतोय. दूध संस्था नोंदणी करतानाची काय -काय प्रक्रिया असते, हे सुद्धा मी त्यांना समजावून सांगेन. सरकारी अधिकारी ही कोणतीही बेकायदेशीर गोष्ट करू शकत नाहीत. श्री. महेश कदम हे सहाय्यक निबंधक- दुग्ध कधीच नव्हते. माझ्या माहितीनुसार या दूध संस्थांची नोंदणी दुग्धचे सहाय्यक निबंधक श्री. गजेंद्र देशमुख आणि श्री. प्रदीप मालगावे यांच्या काळामध्ये झालेली आहे.
===========
णण तत
schedule25 Mar 26 person by visibility 78 categoryउद्योग
[25/03, 18:49] Raja: " प्रेस नोट "
"मुंबई उच्च्य न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून तत्कालीन मा. मैत्री दुग्धविकास व सहनिबंधक सहकारी संख्या (दुग्ध) यांचे दि. ०८/१२/२०२३ चे आदेश रद्द "
तत्कालीन सचिव दुग्धविकास श्री. तुकाराम मुढे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील ग्रामीण प्राथमिक सहकारी दुध संस्था नियम व उपविधीनुसार वर्षातून २४० दिवस किमान ५० लिटर दुध हे दुध संघास पुरवठा करीत नाहीत त्या संस्था नियमानुसार त्यांच्यावर अवसायनात्त्वी कारवाई करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले होते. असा निर्णय त्यांच्या २७/०९/२०२३ च्या बैठकीत झाला होता. त्यानुसार राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यातील सहनिबंधकांना बैठीतील निर्णयानुसार अवसायनायची कारवाई पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
सहनिबंधक सहकारी संस्था दुग्धा कोल्हापूर यांनी गोकूळ कडून सर्व दुग्ध संस्थाच्या दूध संकलनाची माहिती मागितली होती गोकूळचे रेकॉर्ड तपासून सुमारे १२०० दूध संस्था दररोज १५ लिटरपेक्षा कमी दुध टाकण्याचे निष्पन झाले. त्यामुळे अंतरिम आदेश काढून १२०० संस्था अवसायनात काढयाची प्रक्रिया केली सर्व संस्थांनी ३० दिवसात समाधानकारक खुलासा न दिल्यास अवसायनाचा आदेश अंमि का करण्यात येऊ नये म्हणुन त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ३० दिवसांचा वेळ दिला ३० दिवसात एकाटी संस्थेने त्यांचे म्हणणे मांडले नाही किंवा समाधानकारक खुलासा केला नाही याउलट तत्कालिन पालकमंत्री आणि वैद्यकीय हसन मुश्रीफ यांनी तत्कालीन दुग्ध विकास मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून राज्यात लंपी नावाच्या रोंगाचा उद्रेक झाला आहे. व महाराष्ट्रात दुष्काळ आहे म्हणून दुध उत्पादन कमी झाल्याने दुध संस्थेचे संकलन कमी झाले असल्याने अशा परिस्थितीत सहनिबंधकाने अर्धव्यायक अवसायनाची प्रक्रिया रद्द करावी म्हणून बिनतारखेचे पत्र तत्कालीन दुग्ध विकास मंत्र्यांना दि. ११ डिसे २०२३ रोजी प्राप्त झाले पालकामंत्र्यांच्या वरील पत्रावर तत्कालीन दुग्ध विकास मंत्र्यांनी कोल्हापूर जिल्हातील दुग्ध विकास संस्थावरील अवसायनाच्या प्रक्रियेला स्थागिती देण्याचे आदेश दिले.
पालक मंत्र्याचे पत्र मिळण्यापूर्वी व दुग्ध विकास मंत्र्याचे आदेश होण्यापूर्वी सहनिबंधका सहकारी संस्था दुग्ध श्री. शहाजी पाटील यांनी दुग्ध विकास मंत्र्यांच्या आदेशाची अमंलबजावणी करावी असे आदेश ३ दिवस आधिच काढले विभागीय उपान्याधक पुणे यांनी मा दुग्ध विकास मंत्र्यांचे आदेशाची अमलबजावणी करावी असे आदेश दिले
[25/03, 18:49] Raja: त्यानुसार सहय्यक निबंधक कोल्हापूर यांनी अवसायनाची पुढील कारवाई स्थगित केली पर्यायाने अवसायकांची नेमणूक करून देखील संस्थांचा ताबा घेता आला नाही.
श्री प्रकाश बेलवाडे, संचालक महादेव सह. दुग्ध विकास संस्थेने मा दुग्ध विकास मंत्र्याकडे हस्तक्षेप अर्ज दाखल करून दुग्ध विकास मंत्र्यांनी दिलेली स्थागिती रद्द करावी अथवा उठवावी व दुग्ध विकास मंत्र्यांनी दिलेला आलेला रद्द करावा अशी विनवणी केली. तेव्हा दुध विकास मंत्र्यांनी बैलवाडेंच्या अर्जावर सुनावणी घेतली नाही म्हणून नाईलाजाने प्रकाश बेलवाडे यांना मा. उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली.
पालक मंत्र्यांनी वैयक्तिक राजकीय स्थार्थापोटी तत्कालीन दुग्ध विकास मंत्र्याकडून स्थागिती आदेश मिळाविला जो त्यांच्या अधिकार नव्हाता तत्कालीन दुग्ध विकास मंत्र्यांच्या अधिकार बाह्य आदेशाविरूद्ध मा. उच्च न्यायालयात आव्हाने दिले.
दुग्ध विकास मन्यानी पालक मध्याच्या पावर स्थागिती देयावी अशी टिपणी केली होती. मंत्र्याची टिपनी हा म्हणजे महाराष्ट्र शासनाचा आहेशन की एखादया अर्जावर किंवा पनावर मंत्र्यांनी टिपणी केल्यावर त्यान्चे शासन आदेशात रूपांतर होण्यासाठी मलालयात विहीत प्रक्रियेचा अवलंवा करून मा. राज्यपालांच्या नावाने आदेश काढावे स्वागतातः असे कोणतेही आदेश महाराष्ट्र शासनाकडून निर्मनिर्गमित झाले नसलेने तत्कालीन सहनिबक सहकारी संस्था दुधा महाराष्ट्र यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून गंसायी गर्जी राखण्यासाठी बेकायदेशीर आदेश काहले. वरील याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे मा न्यायमुती सचिन देशमुख यांनी समोर, झार्नेऊसना याचिकाकर्याकडून अँड सतिश तळेकर यांनी आपल्या युक्नीकदात अधिकार बाढ्य आदेश घटनेच्या कलमन्द चा भंग होतो. व तसेच सहकारी म शासनातर्फ अंडमाळी. तर हसन मुश्रीफ यांचे तकै अँड अनिल साखरेयोनी महाराष्ट्र सहकारी कायदा कलम १९ नुसार शासनास आदेश काढत्वयागचा अधिकार आहे हे म्हणने करो चुकीचे आहे कारण प्रशासकीय अधिकाराचा कपर करून अर्धन्यायिक प्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नाही. दोमिही मंसानी त्यांच्या प्रभात किंवा टिपणीत तारखेचा उल्लेख नसल्याने वरील वर्तणूक राज्यायानांनी शासनाच्या दैनंदिनी कारभाराबाबत केलेल्या नियमाला धरुना नाही.
[25/03, 18:50] Raja: अँड सतिश तळेकर यांचा युक्तिवाद सुरु असतानाच श्ती हसन मुश्रीफ यांचे वकील व शासनाचे वकील योनी वरील आदेश खूद करण्यास आमची संमती आहे तेबा कोर्टाचा वेळ वाचेल व श्री महादेव दूध व्याव सहकारी संस्थेच्या याविकेतील मागणी माझ्य करता येईल, असे मांडले.
उच्च न्यायालयाकडून मंसांच्या वर्तणूकीबद्दल ताशेरे येतील किंवा उपका ठेवला जाईल या भितीने मा. मंत्र्यांचे आदेश व रतह निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) महाराष्ट्र घोचे आदेश रद्द करण्यात यावेत अशी विनंती प्रतिवादीतर्फे करण्यात आली. कोर्टाने ती माझ्य करून तत्कालीन दूध विकास मैन्यांचे आदेश व सहनिबंधकांचे आदेश रद्द केले. अशा प्रकारे सत्याचाच विजय झाला।
घघ मण
schedule16 Jan 26 person by visibility 271 category
क्रिडाई कोल्हापूर आयोजित वास्तू विषयक प्रदर्शन (दालन) मंडप उभारणीस सुरुवात
क्रिडाई कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिक सर्वोच्च शिखर संघटना असून क्रिडाई कोल्हापूर तर्फे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे बांधकाम व वास्तू विषयक प्रदर्शन (दालन)दि. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान महासैनिक दरबार हाॅल ग्राउंड येथे आयोजित करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचा मंडप उभारणी कार्याचा शुभारंभ क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत यांच्या शुभ हस्ते व दालनचे चेरमन महेश यादव, व्हा. चेरमन आदित्य बेडेकर,समन्वयक निखिल शाह क्रिडाई चे सेक्रेटरी गणेश सावंत, दालन सेक्रेटरी संग्राम दळवी तसेच दालनचे पदाधिकारी सभासद यांच्या उपस्थितीत रविवार दि. 11/01/2026 रोजी संपन्न झाला. क्रिडाई अध्यक्ष सौ व श्री के. पी.खोत यांच्या हस्ते मंडप उभारणी कार्याचे भूमिपूजन करण्यात आले.
क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष श्री. के. पी. खोत यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलताना संघटनेच्या 35 वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेत क्रिडाई ने बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासण्याबरोबर शहराचा विकासात केलेल्या भरीव कार्यावर प्रकाश टाकला. दालन बदल माहिती देताना या दालनचे वैशिष्ट म्हणजे सन 1992 साली बांधकाम विषयक प्रदर्शनाची सुरुवात झाली. यंदाचे *दालन* 2026 हे क्रिडाई कोल्हापूर तर्फे भरवले जाणारे 13 वे दालन आहे. या दालनचे *उदघाटन*शुक्रवार दि 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11. वाजता होणार आहे. दालन 2026 विषयी माहिती देताना दालन चे चेअरमन श्री. महेश यादव यांनी या प्रदर्शनाचा मुख्य हेतू कोल्हापूर व परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली नवनवीन बांधकाम प्रकल्प व तत्रंज्ञान, बांधकाम विषयक साहित्य, सेवा अर्थसाहाय्य योजना यांची माहिती मिळणार असून घराचे स्वप्न प्रत्यक्षात सत्यात उतरविण्यात या प्रदर्शनाचा मोठा फायदा होणार असून याचे लक्ष यंदा संधी सर्वांसाठी असे आहे.
या दालनचे प्रायोजक पुढीलप्रमाणे -
प्लॅटिनम स्पॉन्सर -1) आर्या स्टील्स् रोलिंग प्रा. लि
*डायमंड स्पॉन्सर- 1)इटाका सिरमिक्स 2)एसकॉन इस्पत प्रेस्टिज एल एल पी.
गोल्ड स्पॉन्सर (बिल्डर्स)1)केवेस्ट इन्फ्रा अँड हायवेस्ट डेव्हलपर्स
गोल्ड स्पॉन्सर- 1) अविष्कार इन्फ्रा 2)मोटो टाईल्स 3) स्टेट बँक ऑफ इंडिया 4)यश पॉली 5) सिम्पोलो टाईल्स
*सिल्वर स्पॉन्सर-1)विन्डो एक्स्पर्ट 2) एच आर विंडटेक ( व्ही इ के प्रा. ली. 3)तेजस इंडस्ट्रिज 4)युनियन बँक ऑफ इंडिया
सेमी कॉ स्पॉन्सर 1) फेराकॉल 2) स्मॅश इलेव्हटर 3)बँक ऑफ इंडिया 4) एनएन आयटी कार पार्किंग सिस्टीम प्रा. ली. 5) वोक्स इंटेरियर आणि एक्सटेरियर सोलुशन प्रा. ली. 6)हायड्रा पार्क 7)ग्रेट व्हाईट ग्लोबल 8) पॅरीवेअर रोका 9) लिशा स्वीचेस 10) ओटीस इलेव्हटर्स 11) कोने इलेव्हटर्स वरील सर्व प्रयोजकांची दालन 2026 यशस्वी होण्यासाठी मदत लाभली आहे.
कोल्हापूर परिसरातील सिव्हिल इंजिनीरिंगच्या विद्यार्थी याच्यासाठी शनिवार दि. 31 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता टेक्निकल सेमिनार आयोजित केले असून, रविवार दिनांक 1 फ्रेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सुसंवाद साधणार आहेत. सांगता समारंभ सोमवार दिनांक 2 फ्रेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता होणार आहे
या कार्यक्रमास क्रिडाई कोल्हापूर अध्यक्ष के. पी.खोत उपाध्यक्ष प्रकाश देवालापूरकर, चेतन वसा,सचिव गणेश सावंत, खजानिस अजय डोईजड,दालन चेअरमन महेश यादव, व्हाईस चेअरमन आदित्य बेडेकर, समन्वयक निखिल शाह, सह समन्वयक पवन जामदार, दालन सचिव संग्राम दळवी, खजानिस अमोल देशपांडे,बिझनेस प्रोमोशन चेअरमन गौतम परमार,ग्राउंड कमिटी चेअरमन श्रीकांत पाटील, डिझाईन, प्रिटिंग कमिटी चेअरमन विजय माणगांवकर, हॉस्पीटीलिटी कमिटी चेअरमन केतन शाह, सोवियनर कमिटी चेअरमन संदीप बोरचाटे, स्टॉल ऑलॉकेशन कमिटी चेअरमन तुषार बेर्डे तसेच क्रिडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष विदयानंद बेडेकर, जेष्ठ सभासद कृष्णा पाटील, सुजय होसमनी, विवेकानंद पाटील,श्रेयांश मगदूम, शंकर गावडे,क्रिडाई कोल्हापूरचे सह खाजानिस सागर नालंग, संचालक प्रदीप भारमल,सुनील चिले,तसेच सभासद,प्रायोजक, स्टॉलधारक मोठ्या संख्येने हजर होते. शेवटी आभार प्रदर्शन सचिव गणेश सावंत यांनी केले.
भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन, नवोन्मेष तंत्रज्ञान विकासाची केंद्रे म्हणून कार्य करावे
schedule24 Dec 25 person by visibility 343 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासाची केंद्रे म्हणून कार्य केले पाहिजे. यासाठी उच्च शिक्षणाचा विस्तार आणि संशोधन उत्पादनात वाढ गरजेची आहे. शिवाय जागतिक ज्ञाननेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी भारताने आपल्या वेगाने वाढणाऱ्या उच्च शिक्षण व्यवस्थेचा आणि संशोधन क्षमतेचा प्रभावी उपयोग करणे आवश्यक आहे. शिवाजी विद्यापीठासारख्या संस्था प्रथमच विकसित होणाऱ्या तंत्रज्ञान, संशोधन निष्पत्ती आणि नावीन्यपूर्ण उत्पादनांच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावू शकतात’असे मत डॉ. जी सतीश रेड्डी यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ बुधवारी, २५ डिसेंबर २०२५ रोजी दिमाखात पार पडला. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. रेड्डी यांनी, ‘भारतात एक हजारांहून अधिक विद्यापीठे असून सुमारे ४.३८ कोटी विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. आयआयटी, आयआयएम, एनआयटी आणि केंद्रीय विद्यापीठांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच संशोधन प्रकाशनांची संख्या आणि पीएच.डी. पदवीधारकांच्या संख्येत भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संस्थांनी गुणवत्ता व स्पर्धात्मकता वाढवून अधिकाधिक विद्यापीठांना जागतिक क्रमवारीतील अग्रभागी नेणे गरजेचे आहे.१०–१५ वर्षांपूर्वी जागतिक टॉप ५०० क्रमवारीत केवळ एक-दोन भारतीय संस्था असत, आज मात्र अनेक संस्था त्या यादीत असून काही टॉप १०० कडे वाटचाल करत आहेत.’असे त्यांनी नमूद केले.
‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या आवाहनांमुळे क्षेपणास्त्रे, रडार, सोनार, टॉर्पेडो, एअरबॉर्न वॉर्निंग सिस्टीम्स, विमाने, पाणबुड्या, जहाजे, चिलखती वाहने, रणगाडे आणि तोफा अशा विविध क्षेत्रांत स्वदेशी क्षमता विकसित झाली आहे. पुण्यात टाटा आणि भारत फोर्ज यांनी डीआरडीओच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसित केलेली स्वदेशी तोफ—जिचा वापर लाल किल्ल्यावर औपचारिक समारंभात होतो—जागतिक स्तरावर उत्कृष्ट मानली जात असल्याचे त्यांनी सांगितले. ही बाब या परिवर्तनाचे प्रतीक आहे. उद्योगक्षेत्राने, विशेषतः खासगी कंपन्यांनी, संरक्षण संशोधन व उत्पादनात सक्रिय सहभाग घेऊन वाढत्या संधींचा लाभ घ्यावा.’असे आवाहन रेड्डी यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी, शिवाजी विद्यापीठाची गौरवशाली परंपरा, दर्जेदार व समताधिष्ठित शिक्षण देण्यातील त्याची भूमिका, तसेच पदवीप्राप्त विद्यार्थ्यांकडून समाजोपयोगी व जबाबदार नागरिक म्हणून अपेक्षित असलेली भूमिका यांचा सविस्तर ऊहापोह करण्यात आला. सातत्यपूर्ण अध्ययन, नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार, नैतिक मूल्यांची जोपासना आणि समाज व राष्ट्रासाठी—राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर—योगदान देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांवर आधारित गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि सामाजिक बांधिलकीचे केंद्र म्हणून शिवाजी विद्यापीठाची ओळख आहे. शिवाजी विद्यापीठ हे केवळ शैक्षणिक संस्था नसून स्वाभिमान, सामाजिक जबाबदारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशावर उभे असलेले प्रेरणास्थान असल्याचे’त्यांनी सांगितले. प्रकुलगुरु डॉ. ज्योती जाधव यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला.
घघ तत
schedule12 Dec 25 person by visibility 398 category
मा.संपादक
इंग्लंड येथील आर्बोरिकल्चर असोसिएशन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पार्कर यांचे आज भारतात आगमन झाले. ते
14 आणि 15 डिसेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत.
वारसा वृक्षांच्यासाठी जागतिक पातळीवर काम करणाऱ्या इंग्लंड येथील आर्बोरिकल्चर असोसिएशन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पार्कर यांचे आज भारतात आगमन झाले. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी 2 येथे आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी यांच्या वतीने त्यांचे पुष्पहार घालून मुंबई येथे स्वागत करण्यात आले.यावेळी वृक्ष संवर्धन तज्ञ वैभव राजे यांच्या समवेत आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टचे मुकुल म्हात्रे, राहुल कांबळे,
पंकज देहगावकर, महेंद्र हौसनूर उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील वारसा वृक्ष (हेरिटेज ट्री) हे आंतर राष्ट्रीय नकाशावर यावेत. यासाठी आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी प्रयत्नशील आहे. जागतिक पातळीवर यासाठी काम करणाऱ्या युके आर्बोरिकल्चर असोसिएशन या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पार्कर यांच्याशी संस्थापक अध्यक्ष राहुल मगदूम यांनी संपर्क केला. त्याला समाधानकारक प्रतिसाद देत जॉन पार्कर यांनी भारतामध्ये कोल्हापूर येथे गेल्या महिन्यात येणार होते. परंतु काही कौटुंबिक अडचणीमुळे त्यांना येता आले नाही.
ते आता दोन दिवसांच्या दौऱ्यात आजरा शिरशिंगी येथील भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड, शाहूवाडी येथील खेडेचा महाकाय बेहडा वृक्ष आणि कोल्हापूर शहर येथील गोरख चिंचं तसेच महावीर उद्यान येथील कैलासपती या वारसा वृक्षांची तसेच टाऊन हॉल येथील दुर्मिळ वृक्षांची पाहणी करणार आहेत त्याचबरोबर चुये येथील नदीकाठचा वड या ठिकाणी भेट देणार आहेत.अशी माहिती आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टचे आणि आझाद हिंद नेचर आर्मीचे अध्यक्ष राहुल मगदूम यांनी दिली.
फोटो ओळ :
वारसा वृक्षांच्यासाठी जागतिक पातळीवर काम करणाऱ्या इंग्लंड येथील आर्बोरिकल्चर असोसिएशन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पार्कर यांचे आज भारतात आगमन झाले. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी 2 येथे आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी यांच्या वतीने त्यांचे पुष्पहार घालून मुंबई येथे स्वागत करण्यात आले.यावेळी वृक्ष संवर्धन तज्ञ वैभव राजे यांच्या समवेत आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्टचे मुकुल म्हात्रे, राहुल कांबळे,
पंकज देहगावकर, महेंद्र हौसनूर उपस्थित होते.
शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन
schedule08 Dec 25 person by visibility 433 category
ठठ थफ
schedule06 Dec 25 person by visibility 448 category
यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासह विद्युत विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
जज दद
schedule12 Nov 25 person by visibility 536 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन : कोल्हापूर फर्स्ट व इंजिनिअरिंग असोसिएशनच्या प्रतिनिधी मंडळाने खासदार श शाहू महाराज यांची न्यू पॅलेस येथे भेट घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा विषयांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत रेल्वे आणि विमानतळ सेवा या विषयांवर विशेष भर देण्यात आला. आगामी हिवाळी संसदीय अधिवेशनात कोल्हापूर, सांगली, गोवा आणि कोकण विभागातील खासदारांना सोबत घेऊन रेल्वे मंत्र्यांची बैठक दिल्ली येथे आयोजित केली जाईल.
सह्याद्री एक्सप्रेस (११०२३/११०२४) ही पूर्वी दैनंदिन धावणारी गाडी पुन्हा सुरू करून कोल्हापूर-मुंबई दरम्यान कायमस्वरूपी दैनंदिन सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. वंदे भारत एक्सप्रेस (२०६७३/२०६७४) सध्या आठवड्यातून तीन दिवस धावते. ही सेवा दररोज चालविण्यात यावी आणि मुंबई सीएसएमटी पर्यंत वाढवावी, अशी मागणी करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे सुरू झाल्यामुळे वकील व प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीचे वेळापत्रक सुधारावे, अशी विनंती करण्यात आली.
कोल्हापूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी झालेल्या चर्चेत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. बैठकीला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे कोल्हापूर संचालक अनिल शिंदे आणि त्यांची टीम उपस्थित होती.
रनवे विस्तार आणि नाईट लँडिंग सुविधा या कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. सध्याचा १७८० मीटर रनवे पटना आणि भावनगर विमानतळांप्रमाणेच क्रिटिकल एअरक्राफ्ट कॅटेगरीसाठी सक्षम आहे. त्यामुळे विद्यमान पायाभूत सुविधांवर तांत्रिक चाचणी घेऊन अपग्रेडेशन साठी मंत्री महोदयांकडे पाठपुरावा करावा.
कोल्हापूर-दिल्ली थेट उड्डाण सेवा सुरू करावी. तसेच जर कोणत्याही एअरलाइनने सेवा बंद केली असेल, तर त्या रिक्त मार्गांवर इतर इच्छुक एअरलाइन्सना परवानगी देऊन उड्डाणे सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
एअरपोर्ट अथॉरिटीतर्फे माहिती देण्यात आली की, कार्गो हँडलिंगसाठी आवश्यक स्वतंत्र कार्गो हब युनिट्स सुविधा सुरू करण्याची योजना सध्या प्रगतीपथावर आहे.
खासदार श्री. छत्रपती शाहू महाराज यांनी सर्व विषयांवर सकारात्मक प्रतिसाद देत केंद्र व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून या प्रश्नांवर लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.या बैठकीसाठी कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेंद्र जैन, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, स्मकचे चेअरमन जयदीप चौगुले, मॅकचे चेअरमन मोहन कुशिरे, कोल्हापूर फर्स्टचे व्हा. चेअरमन डॉ. अमोल कोडोलीकर, ्अड. सर्जेराव खोत, सचिव बाबासो कोंडेकर, सहसचिव जयदीप पाटील, खजानिस पद्मसिंह पाटील, कोल्हापूर फर्स्टचे विशेष निमंत्रित सदस्य सचिन मेनन, सतीश घाटगे, ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे बी. व्ही. वराडे, आर्किटेक्ट असोसिएशनचे अजय कोराणे, रेल्वे कमिटी सदस्य बाबा निंबाळकर, संजय देशिंगे, प्रसन्न तेरदाळकर, सुरेश शिरसागर, निलेश भालकर, विशाल मंडलिक, प्रदीप व्हराबळे, शंतनू गायकवाड, विकास जगताप आदी उपस्थित होते.
ठठ दद
schedule07 Nov 25 person by visibility 566 category
या वेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक मीना शेंडकर. B D ओ, पंत अमात्य बाल विकास विश्वस्त निधी चे विश्वस्त डॉ उद्धव पाटील. श्रीमती अश्विनी वाळिंवडेकर, श्रीमती माधवी पुरोहित , श्री तेज घाटगे, परशुराम विद्यालय मधील काही विद्यार्थिनी, शिक्षक. ,माईसाहेब बावडेकर शाळेतील शिक्षक विदयार्थी हजर होते
जज दद
schedule05 Nov 25 person by visibility 578 category
५ नोव्हेंबर २०२५ | 📍 कोल्हापूर
शिवसेना म्हणजे संघटन, समर्पण आणि शक्ती !
आज कोल्हापूर मार्केट यार्ड येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भव्य गटप्रमुख मेळावा पार पडला.
शिवसेनेचं बळ म्हणजे कार्यकर्ता, प्रत्येक गटप्रमुख, विभागप्रमुख, पदाधिकारी हा आपल्या विभागाचा आधारस्तंभ आहे. आज या मेळाव्यातून आपण सर्वांनी एकत्र येऊन शिवसेनेचा भगवा अधिक जोमाने फडकवू असा निर्धार व्यक्त केला.
गेल्या काही वर्षांत आपण अनेक चढ-उतार पाहिले, पण प्रत्येक शिवसैनिकाने आपल्या निष्ठा आणि समर्पणाने पक्षाचा कणा ताठ ठेवला. याच एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या जोरावर शिवसेना आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि जनतेच्या मनामनात आहे.
“शिवसेनेचं मजबूत संघटन महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आहे. त्यातील एक ठिकाण आपलं कोल्हापूर आहे" हे याप्रसंगी आवर्जून नमूद केले.
कोल्हापूरच्या भूमीवर भगवा फडकवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या असंख्य शिवसैनिकांच्या भावना साकार केल्याबद्दल आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मा. एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानले.
आगामी निवडणुका फक्त सत्ता मिळवण्यासाठी नाहीत, तर ज्यांनी शिवसेनेसाठी हाडाची काडं केली त्या प्रत्येक कार्यकर्त्याला ताकदीचं स्थान मिळवून देण्यासाठी असल्याचे याप्रसंगी ठळकपणे नमूद करत कार्यकर्त्यांना अधिक जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.
एकत्र येऊ, संघटित होऊ आणि पुन्हा एकदा भगवा विजयी करू!
या मेळाव्याला खासदार मा. धैर्यशील माने, मा. संजयदादा मंडलिक, उद्योगमंत्री मा. उदय सामंत, राज्यमंत्री मा. योगेश कदम, मंत्री मा. शंभूराज देसाई, आमदार मा. राजेश क्षीरसागर, मा. चंद्रदीप नरके, मा. राजेंद्र पाटील-यड्रावकर, मा. सुजित मिणचेकर, मा. जयश्रीताई जाधव, जिल्हाप्रमुख मा. सुजित भाऊ चव्हाण, मा. रवींद्र माने, मा. विजय बलगुडे तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Dhairyasheel Mane Sanjay Mandlik Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Shambhuraj Desai Rajesh Kshirsagar Chandradeep Narake - चंद्रदीप नरके Jayshri Chandrakant Jadhav
#Shivsena #EknathShinde #prakashabitkar #shivsenamelva #unityformaharashtra #kolhapur