Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहावे, शिवप्रेमींची शुक्रवारी बैठकपीएम विद्यालक्ष्मी योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : शिक्षण सहसंचालक धनराज नाकाडेशेतकऱ्यांची मुंबईत धडक !  आझाद मैदान गरजला एकच जिद्द-शक्तीपीठ रद्द !!महाडिकांची कार्यपद्धती, सामान्य माणसाला पद ! चालक बनला संचालक, शेतकऱ्यांचाही सन्मान!! सारस्वत विकास मंडळातर्फे महिलांचा सन्मानशिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाची प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षणामंत्र्यांसोबत बैठककेआयटीमध्ये गुरुवारी शाश्वत शेतीविषयी व्याख्यानविद्यार्थ्यांनी तयार केले इकोफ्रेंडली रंगआम्ही चित्रकर्मी क्रिकेट लीग 2025' स्पर्धेला सुरुवात, बुधवारी बक्षीस समारंभ आरडी सिनेमातून उलगडणार एका चुकीचे नाट्यमय परिणाम

जाहिरात

 

केआयटीमध्ये गुरुवारी शाश्वत शेतीविषयी व्याख्यान

schedule11 Mar 25 person by visibility 53 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आणि केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या गुरूवारी ( १३ मार्च) उद्योगभूषण कै. शिवाजीराव देसाई स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या वर्षी बिद्री येथील दूधसाखर महाविद्यालयाचे डॉ. नेताजी पाटील यांचे शाश्वत शेती- ग्रामीण विकासाचा पाया या विषयावर व्याख्यान होईल. विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर अध्यक्षस्थानी असतील. यावेळी संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उद्योगभूषण कै. शिवाजीराव देसाई प्रतिष्ठानच्या अध्यक्ष श्रीमती शशीकला देसाई प्रमुख उपस्थित असतील. केआयटीचे संस्थापक अध्यक्ष कै. शिवाजीराव देसाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित ही व्याख्यानमाला गुरूवारी दुपारी ३.३० वाजता केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुख्य सेमिनार हॉलमध्ये होईल. परिसरातील उद्योजक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि शाश्वत शेती या विषयात रस असणाऱ्या नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि केआयटीचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes