+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule04 Jul 24 person by visibility 315 categoryसंपादकीय
महाराष्ट्र न्यूज वन : वैविध्यपूर्ण विषयांची मांडणी, दर्जेदार लिखाण आणि विश्वसनीय बातम्या यामुळे वाचकांची मने जिंकलेल्या महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज पोर्टलने यशस्वपीणे पाचव्या वर्षात पदार्पण केले. पाच जुलै रोजी या न्यूज पोर्टलचा चौथा वर्धापनदिन आहे. या चार वर्षाच्या कालावधीत वाचक, हितचिंतक व जाहिरातदार यांनी जो विश्वास दाखविला, त्या बळावरच महाराष्ट्र न्यूज वनची घोडदौड सुरू आहे. व्हिजीटर्सची संख्या तब्बल ५८ लाखांहून अधिक आहे.
 कोल्हापुरातील एक आघाडीचे न्यूज पोर्टल म्हणून महाराष्ट्र न्यूज वनची ओळख बनली आहे. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील महत्वाच्या घटनांची नोंद ठळकपणे वाचकापर्यंत ते पोहविण्याची खासियत निर्माण केली आहे. मोठया घटना असोत की महत्वाच्या बातम्या त्या सर्वप्रथम महाराष्ट्र न्यूज वनने ठळकपणे वाचकांपर्यंत पोहोचविल्या. महापालिकेतील घडामोडी, जिल्हा परिषदेच्या लोकाभिमुख योजना, राजकारणातील हालचाली, क्रीडा क्षेत्रातील कामगिरी, सांस्कृतिक क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, शैक्षणिक जगतातील माहिती, उद्योगविश्चातील बदलते तंत्र हे सारं वाचकांना एका क्लिकवर उपलब्ध केले आहे.
पाच जुलै २०२० मध्ये महाराष्ट्र न्यूज वनची सुरुवात झाली. २०२० चे वर्ष म्हणजे कोरोनाचा काळ. या कठीण काळातही महाराष्ट्र न्यूज वनची कामगिरी धडाडीची ठरली. समाजाशी निगडीत प्रत्येक घटना वस्तुनिष्ठपणे नागरिकांपर्यंत पोहोचविली. शैलीदार लिखाण, दर्जेदारपणा आणि विश्वासार्हता ही त्रिसूत्री महाराष्ट्र न्यूज वनने जपली आहे. जे समाज हिताचं आहे त्यांना बळ दिले आहे. आणि जे समाजहिताच्या विरोधी आहे त्याचा निर्भीडपणे समाचार घेतला आहे. निपक्ष:पातीपणे लिखाण करत वेगळी ओळख निर्माण केली आहे.
समाजकारण, राजकारण, सहकार, क्रीडा, सिनेसृष्टीतील घडामोडी, स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामकाज यावर सातत्याने लिखाण करत समाजमनाशी घट्ट नाळ जुळविली आहे. या वाटचालीत जाहिरातदार, वाचक, हितचिंतक अशा विविध घटकांनी नेहमीच सहकार्य केले. महाराष्ट्र न्यूज वनसोबत स्नेहबंध निर्माण केला. या संचितावरच महाराष्ट्र न्यूज वन पाचव्या वर्षात यशस्वीपणे पाऊल टाकत आहे. ‘महाराष्ट्र न्यूज वन’चा चौथा वर्धापनदिन साजरा करताना ‘लोक आमच्या सोबत आणि आम्ही सदैव नागरिकांसोबत’ हा विश्वास आणखी दृढ होत आहे. साऱ्यांच्या सदिच्छाच्या बळावर महाराष्ट्र न्यूज वनच्या यशाचा आलेख उंचावत आहे.