महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापुरात गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे. 85 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील जवळपास 37 मार्ग वाहतुकीसाठी बंद केले असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली आहे. रविवारी 21 जुलै रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर, शाहूवाडी तालुक्यात मलकापूर शेजारी, जाधववाडी येथे २ फूट पाणी आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आले आहे. बॅरॅकेट्स लावण्यात आले आहेत. दरम्यान पर्यायी मार्ग अणुसकुरा घाट मार्गे वाहतूक वळवले आहे.