महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ग्रंथालय आणि वाचनाची सवय हे माणसाला सुसंस्कृत बनवतात असे उद्गार प्रा. पी. डी. तोरस्कर यांनी काढले.
यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेज मध्ये १५ ऑक्टोबर भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त 'वाचन प्रेरणा दिन व ग्रंथ प्रर्दशनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. बी. एन. उलपे हे होते.
वाचन एक जीवन संस्कृती या विषयावर बोलताना प्रा. पी. डी. तोरस्कर म्हणाले की वाचाल तर वाचाल, वाचनाच्या सवयीमुळे माणसाला विचार करण्याची क्षमता प्राप्त होते. जसा तो विचार करेल तशी त्याची प्रगती होत जाते. यासाठी ग्रंथालयांचे मानवी जीवनात खूप महत्त्व आहे.
या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या मजकुराचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमात नैसर्गिक पर्यावरण आणि शाश्वत विकास या पुस्तकाचे प्रकाशनस्ते करण्यात आले.
पुस्तकाचे लेखक डाॅ. युवराज मोटे व डाॅ. अमित रेडेकर यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा रवींद्र मांगले यांनी प्रास्ताविक केले. डॉ.संजय कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सचिन धुर्वे, यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. संदीप गावित, डॉ. बी. एम. पाटील, प्रा . किरन भोसले,डॉ.जे. एम. शिवणकर, प्रा.विशाल वैराठ, प्रा. ज्योती तरोडे उपस्थित होते.