Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
यशस्वितेचा षटकार ! महाराष्ट्र न्यूज वनचे सातव्या वर्षात पदार्पण ! !सहकार गौरव पुरस्कार सोहळा; आमदार विनय कोरे यांना सहकार भूषण पुरस्कार ! विद्याधर अनास्कर ठरले सहकार महर्षी !!ब्राह्मण समाजाला सरकारकडून घोषणांची नव्हे, उत्तरदायित्वाची गरज ! गोलमेज परिषदेत राज्यव्यापी कृती समितीची स्थापना ! !न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्रफार्मसीच्या विद्यार्थ्याला 38 लाखाचे पॅकेज, संजय घोडावतनी केले अभिनंदनअरुंधती महाडिक बनल्या लेखिका ! उलगडला नाईक -निंबाळकर घराण्याचा इतिहास, शाही पाककलांचा स्वाद !!वारणा विद्यापीठ करणार आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाची देवाणघेवाणशिवाजी विद्यापीठातील उपकुलसचिवांच्या बदल्या, काही जणांचा एकाच ठिकाणचा मुक्काम हललाप्रा. श्वेता परुळेकर यांना पीएचडीनऊ जुलैला जिल्ह्यातील शाळा बंद, संस्थाचालक - शिक्षक काढणार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जाहिरात

 

ग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे

schedule18 Oct 24 person by visibility 702 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : ‘ग्रंथ हे जगण्याची प्रेरणा देतात, दिशा दाखवतात. मार्गदर्शन करतात. ग्रंथसोबत ही जगण्यासाठी पूरक ठरते. म्हणूनच व्यक्तिमत्व विकासासाठी ग्रंथ मोलाची भूमिका बजावतात’ असे मत पत्रकार समीर देशपांडे यांनी केले. 
येथील करवीर नगर वाचन मंदिरमध्ये ‘वाचन प्रेरणा दिना’ निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बाेलत होते. यावेळी विविध लेखक, साहित्यिक त्यांच्या साहित्यकृतींचा समाज आणि नागरिकांवर झालेला परिणाम याची उदाहरणे देत ग्रंथांचे महत्व विशद केले. 
 याप्रसंगी कनवातर्फे आयोजित निबंध स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन गटामध्ये मेन राजाराम प्रशालेची विद्यार्थिनी पायल दिंगबरे हिने तर खुल्या गटात वृषाली कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेमध्ये ७५ हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. मराठी भाषेला केंद्र शासनाने अभिजात दर्जा दिल्याबद्दल यावेळी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आला.
कनवाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी, कार्याध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण साळाेखे, कार्यवाह अश्विनी वळिवडेकर, उपकार्याध्यक्ष उदय सांगवडेकर यांच्या उपस्थितीत एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयीन गटामध्ये प्रांजल शहापूरकर, ऋचा तेंडुलकर आणि भक्ती उतरंडे यांनी अनुक्रमे दुसरे, तिसरे आणि उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. खुल्या गटात उत्तम तलवार, सुषमा पाटील, दीपक पाटील यांनी अनुक्रमे दुसरे, तिसरे आणि उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. यावेळी संचालक डॉ .अमर आडके, चंद्रशेखर फडणीस, मंगेश राव, मनीषा वाडीकर, डॉ. विजय पाटणकर, मनीषा शेणई उपस्थित होत्या. विकास कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes