+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustहातकणंगले गटशिक्षणाधिकारीपदी रवींद्रनाथ चौगुले adjustघोडावत विद्यापीठात एम फार्म कोर्स सुरू adjustवारणा विद्यापीठ - टेलर्स युनिव्हर्सिटी मलेशिया यांच्यामध्ये सामंजस्य करार adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री
1001130166
1000995296
schedule18 Oct 24 person by visibility 23 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : ‘ग्रंथ हे जगण्याची प्रेरणा देतात, दिशा दाखवतात. मार्गदर्शन करतात. ग्रंथसोबत ही जगण्यासाठी पूरक ठरते. म्हणूनच व्यक्तिमत्व विकासासाठी ग्रंथ मोलाची भूमिका बजावतात’ असे मत पत्रकार समीर देशपांडे यांनी केले. 
येथील करवीर नगर वाचन मंदिरमध्ये ‘वाचन प्रेरणा दिना’ निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बाेलत होते. यावेळी विविध लेखक, साहित्यिक त्यांच्या साहित्यकृतींचा समाज आणि नागरिकांवर झालेला परिणाम याची उदाहरणे देत ग्रंथांचे महत्व विशद केले. 
 याप्रसंगी कनवातर्फे आयोजित निबंध स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन गटामध्ये मेन राजाराम प्रशालेची विद्यार्थिनी पायल दिंगबरे हिने तर खुल्या गटात वृषाली कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेमध्ये ७५ हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. मराठी भाषेला केंद्र शासनाने अभिजात दर्जा दिल्याबद्दल यावेळी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आला.
कनवाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी, कार्याध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण साळाेखे, कार्यवाह अश्विनी वळिवडेकर, उपकार्याध्यक्ष उदय सांगवडेकर यांच्या उपस्थितीत एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयीन गटामध्ये प्रांजल शहापूरकर, ऋचा तेंडुलकर आणि भक्ती उतरंडे यांनी अनुक्रमे दुसरे, तिसरे आणि उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. खुल्या गटात उत्तम तलवार, सुषमा पाटील, दीपक पाटील यांनी अनुक्रमे दुसरे, तिसरे आणि उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. यावेळी संचालक डॉ .अमर आडके, चंद्रशेखर फडणीस, मंगेश राव, मनीषा वाडीकर, डॉ. विजय पाटणकर, मनीषा शेणई उपस्थित होत्या. विकास कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.