+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule26 Jul 24 person by visibility 406 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून शहरातील विविध भागांना पुराच्या पाण्याचा फटका बसत आहे. पंचगंगा नदी धोका पातळीवरुन (४३ फूट) वाहत असल्याने नागरिकांत धास्ती निर्माण झाली. नदीकाठावरील लोकवस्तीत पाणी शिरले आहे.शुक्रवारी, 26 जुलै 2024 रोजी  रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील जयंती नाल्यावर पाणी आले. यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे प्रशासनाने म्हटले आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी ४६ फूट चार इंचावर पोहोचली आहे. शहरातील व्हिनस कॉर्नर, शाहूपुरी, बापट कॅम्प, लक्षतीर्थ वसाहत, रमणमळा परिसर अशा विविध भागात पाणी शिरले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयनजीकच्या काही अपार्टमेटमध्ये पाणी शिरले होते. एनडीआरएफच्या जवानांनी त्या अपार्टमेंटमधील नागरिकांना बाहेर काढले आहे.