+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule17 Jul 24 person by visibility 162 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विशाळगड प्रकरणावरुन एमआयएमचे नेते इम्तियाज जलील हे १९ जुलै रोजी कोल्हापुरात मोर्चा काढण्याच्या वल्गना करत आहेत. त्यांच्या दौऱ्याने कोल्हापूरच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ते जर कोल्हापुरात आले तर त्यांचे कोल्हापुरी पायताणने स्वागत करू शिवाय कोल्हापूर बंद पुकारला जाईल असा इशारा सकल हिंदू समाजाने पत्रकार परिषदेत दिला आहे.
जलील हे चिथावणीखोर वक्तव्ये करत आहेत. चलो कोल्हापूरची भाषा करत आहेत. प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा. त्यांच्या दौऱ्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील असेही सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. विशाळगड व गजापूर घटनेवरुन शिवभक्तांवर एकतर्फी गुन्हे दाखल करू नयेत. दोन्ही बाजूंनी तपास झाला पाहिजे अशी मागणी केली. पत्रकार परिषदेला गजानन तोडकर, दीपक देसाई, उदय भोसले, निरंजन शिंदे, मनोहर सोरप, राजू तोरस्कर, अभिजित पाटील, योगेश केळकर, अनिरुद्ध कोल्हापुरे, आशिष लोखंडे, सुनील सामंत, संदीप सासने, राजेंद्र करंबे, सनी पेणकर, आनंद कवडे, विकी भोगम, केदार मुनिश्वर, ऐश्वर्या मुनिश्वर उपस्थित होते.