+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
Screenshot_20240226_195247~2
schedule19 Jan 23 person by visibility 402 categoryशैक्षणिक
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
 येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विवेकानंद महाविद्यालयाचे ग्रंथपाल हितेंद्र सूर्याजीराव साळुंखे यांची तर साताऱ्याच्या एल. बी. एस. महाविद्यालयाचे प्रा.डॉ. दीपक शंकरराव जाधव यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. करवीरचे सहाय्यक निबंधक बी. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या सभेत निवड प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. 
बिनविरोध निवडीसाठी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ व प्राचार्य सिताराम गवळी, श्रीराम साळुंखे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, विभाग प्रमुख, आजी- माजी आजिव सेवक यांचे सहकार्य लाभले.