+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule26 Jul 24 person by visibility 123 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  कास्ट्राईब शिक्षक संघटना कोल्हापूर संघटनेतर्फे दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत आरक्षण दिनाच्या (२६ जुलै) निमित्ताने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य नेते नामदेवराव कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 
कास्ट्राइबचे जिल्हाध्यक्ष व शिक्षक बँकेचे संचालक गौतम वर्धन, कास्ट्राइबचे जिल्हा सरचिटणीस  संजय कुर्डुकर, शिक्षक भारती संघटना जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विजय कुशाण , बी एस कांबळे येवतीकर, अजय कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना नामदेवराव कांबळे म्हणाले, ‘ राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात २६ जुलै १९०२ रोजी  मागासवर्गीय सर्व संवर्गातील लोकांना नोकरीमध्ये ५० टक्के आरक्षण लागू केले. सामाजिक विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी सातत्याने मदत केली . पुढे स्वातंत्र्य प्राप्ती नंतर बाबासाहेबांनी घटनेमध्ये आरक्षणाची एससी, एसटी प्रवर्गाकरिता कायमची तरतूद केली .
 मागासवर्गीय प्रवर्गातील लोकांना भरती व पदोन्नतीमध्ये कायद्याने आरक्षण असताना तत्कालीन सरकारने २९ डिसेंबर २०१७ रोजी साधे पत्र काढून पदोन्नती मधील आरक्षण रोखले व सरळ सेवाज्येष्ठतेने पदोन्नती देण्याचे पत्र काढले.  संघटनेने पदोन्नती मधील आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सातत्याने आंदोलन चालू ठेवले जाईल.’असेेही कांबळे यांनी नमूद केले.  कार्यक्रमास  आकाराम कांबळे, दिनकर जगदीश, संजय पवार,  एन एस कांबळे, बाबासो कांबळे, प्रविण कांबळे उपस्थित होते .