+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule26 Jul 24 person by visibility 112 categoryराजकीय
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : पुराचे पाणी शहरातील विविध भागात शिरल्याने धास्तावलेल्या नागरिकांना धीर देण्यासाठी  राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर धावले. त्यांनी शुक्रवारी, भर पावसात शहरातील विविध भागातील पूरग्रस्त ठिकाणाची पाहणी केली. नागरिकांना धीर दिला. अधिकाऱ्यांच्यासमेवत पाहणी करुन मदतीसंबंधी सूचना केल्या. 
२०१९ आणि २०२१ ची महाभयंकर पूरस्थितीचा अनुभव पाहता प्रशासनाने योग्य पद्धतीने नियोजनातून परिस्थिती हाताळणे गरजेचे आहे. पूरस्थितीबाबत नागरिकही सतर्क आहेत. महापूरस्थिती उद्भवून नागरिकांचे नुकसान होवू नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे. पण, प्रशासनासह नागरिकांनी सतर्कता बाळगावी, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून पूरग्रस्त भागातील नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे, प्रशासनाने त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशा सूचना क्षीरसागर यांनी प्रशासनास दिल्या. 
 राजेश क्षीरसागर यांनी दुपारी पंचगंगा तालीम, शुक्रवार पेठ, शाहूपुरी कुंभार गल्ली, सुतारवाडा, बापट कॅम्प आदी भागाची पाहणी केली. याठिकाणी नागरिकांशी संवाद साधून स्थलांतरीत होण्याबाबत आवाहन केले. अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्यासाठी कर्नाटक शासनाशी चर्चा करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधणार आहेत .शिवसेनेच्या वतीनेही पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत कार्य सुरु आहे. प्रशासनासह शिवसैनिक संभाव्य पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले.  
दरम्यान पूरग्रस्त भागाची पाहणी दरम्यान शाहूपुरी येथील स्थलांतरीत नागरिकांची अंबाबाई शाळा आणि सुतारवाडा येथील नागरिकांची चित्रदुर्ग मठ येथे व्यवस्था केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या स्थलांतरीत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करून त्यांना धीर देण्यासाठी क्षीरसागर यांनी या दोन्ही ठिकाणांना भेट देवून, स्थलांतरीत नागरिकांची आपुलकीने चौकशी केली. शाहूपुरी येथील नागरिकांना राधाकृष्ण मंदिर, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल याठिकाणीही स्थलांतरीत करून याठिकाणी सुविधा पुरविण्याच्या सूचना महापालिका प्रशासनास दिल्या. 
 यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहाय्यक अभियंता फफे शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, विनय वाणी, अनुसूचित जाती जमाती जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, अल्पसंख्याक सेनेचे रियाज बागवान, राकेश पोवार, आकाश झेंडे, बंडा माने, अभिजित काशीद, प्रशांत नलवडे, अमर क्षीरसागर, अभिजित कुंभार  उपस्थित होते.