+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान
1001130166
1000995296
schedule21 Jun 24 person by visibility 147 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतििनधी, कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलावाचा सर्वांगीण विकासाठी ३५ लाख रुपय निधीची तरतूद करावी अशी सूचना आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना केली.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकास कामाबाबत आज आमदार जयश्री जाधव यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन चर्चा केली. नुकतेच, कोल्हापूर शहर व नागरी कृती समितीने जलतरण तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष वेधले होते. 
आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, “छत्रपती  शिवाजी स्टेडियम मधील मैदानाचे सपाटीकरण आणि ड्रेनेज लाईनच्याकामासाठी एक कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. याचे काम सध्या सुरू आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलावाची दुरावस्था झाली आहे. यामुळे अनेक जलतरणपटू सराव करताना जखमी झाले आहेत, अशा तक्रारी जलतरणपट्टू व नागरिकांनी माझ्याकडे केली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी हक्काच्या असणाऱ्या जलतरण तलावाचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे असून त्यासाठी ३५ लाख रुपयांचा निधी निधीची मागणी यापूर्वीच केली होती. मात्र याबाबत अद्याप निधीची तरतूद झालेली नाही. तरी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्वरित निधीची तरतूद करावी व तलावाच्या सर्वांगीण विकासाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.”