महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्याविषयी राज्यातील सत्ताधाऱ्यांशी निगडित मंडळीकडून सातत्याने अवमानकारक वक्तव्ये केले जात आहेत. अशा मंडळींचा निषेध व त्यांना, महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेनी सदबुद्धी द्यावी यासाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे सोमवारी (पाच डिसेंबर) जागर करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांनी तत्काळ माफी मागावी यासाठी तुळजाभवानी मातेचा जागर होणार आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौक येथे दुपारी बारा वाजता जागर करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांनी केले आहे