महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते पैलवान खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या शिष्टमंडळाने स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे केली.
संभाजीराजे यांनी केंद्रीय कायदामंत्री किरण रिजुजू यांच्याशी दूरध्वनीवर संभाषण केले व लवकरच दिल्ली येथे त्यांची भेट घेऊन भारताचे पहिले व महाराष्ट्राचे एकमेव ऑलिंपिक पदक विजेते पैलवान खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी पैलवान संग्राम कांबळे, कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे कोल्हापूर शहराध्यक्ष बाबाराजे महाडिक, पैलवान खाशाबा जाधव यांचे पुतणे शामराव जाधव, नागेश गुरव उपस्थित होते.