Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राज्यस्तरीय महामंडळ सभेला राज्यभरातील पदाधिकारी ! १७०० हून अधिक शिक्षक !!कौस्तुभ गावडेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, २०० रक्तदात्यांचा सहभागजिल्हा परिषदेतर्फे सोमवारी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणदहा हजार जातिवंत म्हैशी जिल्ह्यात आणू या ! २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठू -मंत्री हसन मुश्रीफप्रमोद बराले निलंबित ! रमेश मस्कर, हर्षजीत घाटगेसह चौघांना नोटीस!!शिवाजी विद्यापीठाच्या आयडिया लॅबसाठी मेनन समूहाकडून पन्नास लाखाचा निधीआमदारांच्या प्रश्नावर महापालिका अधिकाऱ्यांची भंबेरी, पालकमंत्र्यांनी दिला आठ दिवसाचा अल्टिमेटमराष्ट्रवादीचे आमदारपुत्र भाजपात जाणार, शरद लाड हाती घेणार कमळ !मागच्या दरवाजाने निवडून येणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय कळणार ! राजेश क्षीरसागरांचा सतेज पाटलांच्यावर पलटवार प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा रविवारी ! संभाजीराव थोरात, बाळासाहेब मारणे मार्गदर्शन करणार !!

जाहिरात

 

मी साधा माणूस नाही, गोकुळ राष्ट्रवादीमय करण्याची ताकत आमच्यात !

schedule24 Sep 25 person by visibility 188 categoryराजकीय

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची कोल्हापूरातील मोठी आर्थिक संस्था. या संस्थेवर वर्चस्व कोणाचे हे राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचे. यामध्ये काही संचालक ही मातब्बर. यामध्ये माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांचा समावेश. गोकुळच्या निवडणुकीत आणि कामकाजात गेली पाच वर्षे डोंगळे आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या भूमिकेला अनन्य साधरण महत्व राहिलंय. अरुण डोंगळे यांनी, मंगळवारी (२३ सप्टेंबर २०२५) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे झालेल्या या पक्षप्रवेश सोहळयात डोंगळे यांनी तडाखेबाज भाषण केले. ‘मी साधा माणूस नाही, गोकुळ राष्ट्रवादीमय करण्याची ताकत आमच्यात आहे.’असा गर्भित इशारा त्यांनी दिला. मात्र हा इशारा नेमका कोणाला  ? यावर आता चर्चा रंगलीय.

 राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थिमध्ये डोंगळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. डोंगळे यांचे व्यक्तिमत्व रांगडे. राजकारणही त्याच पद्धतीने. कधी कोणता निर्णय घेतील याचा अंदाज लागत नाही. दोन वर्षे गोकुळचे चेअरमन पद भूषविले. चेअरमनपदाची मुदत संपत असताना त्यांनी, गोकुळचा अध्यक्ष हा महायुतीचा झाला पाहिजे असे सांगत धमाका उडविला. पुढे राजकारणही तसे घडत गेले. काँग्रेसचे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील यांच्या तोंडचा घास हिरावला. गोकुळच्या शह-काटशहाचे राजकारण कोल्हापूर ते मुंबईपर्यंत रंगले. महायुतीचे म्हणून नविद मुश्रीफ चेअरमन झाले. मात्र निवडीनंतर मंत्री मुश्रीफ व चेअरमन नविद यांनी, ‘हम सब एक है’चा नारा दिला. अजूनही गोकुळचा चेअरमन कोणाचा ? महाविकास आघाडीचा की महायुतीचा ? यावर प्रत्येकजण सोयीनुसार अर्थ लावत आहे. मात्र अरुण डोंगळे यांचे राजकीय विधान मात्र गोकुळच्या अध्यक्ष निवडीच्या राजकारणाला कलाटणी देणारे ठरले. यावेळी मुश्रीफ आणि त्यांच्यात अंतर वाढल्याचे दिसत होते.

उपमुख्यमंत्र अजित पवार यांच्याशी डोंगळे यांचे स्नेहपूर्ण संबंध आहेत. त्यांनी, नवी वाशी नाका येथे सुरू केलेल्या हॉटेलच्या उद्घाटनला अजित पवार उपस्थित होते. मुश्रीफ यांच्याशीही ते उत्तम समन्वय राखून होते. दरम्यान पुढे विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत डोंगळे यांनी, महायुतीचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांना मदत केली. तत्कालिन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही ते व्यासपीठावर दिसू लागले. त्यांची शिवसेनेशी जवळीक वाढल्याचे नजरेत पडत असताना डोंगळे यांनी पुन्हा एकदा साऱ्यांनाच धक्का दिला. आणि त्यांनी, राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राष्ट्रवादीत प्रवेश करताना चेअरमन डोंगळे म्हणाले, ‘मी साधा माणूस नाही. हत्तीला उभं करुन खाली बसविण्याची ताकत आमच्यात आहे. एकदा भूमिका घेतली की त्यामध्ये बदल होत नाही. गोकुळच्या गेल्या निवडणुकीत तीस वर्षे सत्तेवर असलेल्या नेत्यांना सत्तास्थानावरुन बाजूला करण्यात आणि मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्याकडे सत्तेचे नेतृत्व सोपविण्यात आमची भूमिका मोलाची ठरली. गोकुळ हे आमचे होमटाऊन आहे. गेली तीस वर्षे प्रतिनिधीत्व करत आहे. सभासदांचा दांडगा विश्वास आहे. गोकुळची आगामी निवडणूक महायुती की महाविकास आघाडीतर्फे याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. नेते निर्णय घेतील. आम्ही आता राष्ट्रवादीत आहे. गोकुळ संपूर्ण राष्ट्रवादीमय करण्याची ताकत आमच्यात आहे. पाच-सहा जिल्ह्यात काम करण्याची माझी तयारी आहे. आम्ही बोलते ते करतो. मंत्री मुश्रीफ म्हणजे मोठी शक्ती आहे. १९९३ मध्ये शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यावेळी, कोल्हापुरात अजित पवारांना घेऊन मेळावा मी घेतला होतो. ’याची आठवणही करुन दिली. तसेच ‘राष्ट्रवादीशिवाय आता दुसरा कुठला पक्ष नाही. शेवटपर्यंत राष्ट्रवादीच.’हे ही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान डोंगळे यांची कारकिर्दी काँग्रेसमधून सुरू झाली होती. काँग्रेस, शिवसेनेशी जवळीक आणि आता  राष्ट्रवादी असा आतापर्यंतचा प्रवास राहिला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes