+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule07 Jul 24 person by visibility 188 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात निनावी पत्रावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आरोप, प्रत्यारोप रंगत आहे. यामुळे गोकुळच्या राजकारणाला पुन्हा एकदा उकळी फुटली आहे. विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केलेल्या आरोपाला गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांन प्रत्युत्तर दिले आहे. आरोप, प्रत्यारोप सुरू झाल्यामुळे निनावी पत्र प्रकरण आणखी काही दिवस घोंघावत राहण्याच्यी चिन्हे आहेत.
एका निनावी पत्रातून गोकुळ दूध संघातील पशु संवर्धन विभागात औषध घोटाळा सुरू असल्याचा आरोप झाला. हे पत्र सोश मिडियावरही व्हायरल झाले. पशुसंवर्धन विभागातील डॉ. प्रमोद साळुंखे हे कंपन्याशी सेटलमेंट करुन कमिशन लाटत आहेत असे त्या पत्रात म्हटले आहे. त्या पत्राच्या आधारे विरोधी आघाडीच्या संचालिका महाडिक यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर निशाणा साधला.
 महाडिक म्हणाल्या, ‘ निनावी पत्रात गोकुळमध्ये त्या डॉक्टरांकडून गैरव्यवहार केला जात असल्याचे म्हटले आहे. संबंधितांने, प्रस्थापितांना अंगावर घेणे परवडणार नाही म्हणून औषध घोटाळयाची माहिती पत्राद्वारे उघडकीस आणली. त्या पत्राला बेदखल न करता चौकशी करावी. संबंधितावर फौजदारी दाखल करावी. गोकुळमधील चुकीच्या कारभाराविरोधात अनेक वेळा आवाज उठवला. हायकोर्टानेही गोकुळच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. त्यानुसार गोकुळचे संचालक मंडळ बरखास्त झाले असते. मात्र वैयक्तिक आकसापोटी ही कारवाई करुन गोकुळची बदनामी केली असती अशी चर्चा झाली असती म्हणून मीच कारवाई थांबवली. ”
गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, ‘‘गोकुळचा कारभार हा सभासदाभिमुख व पारदर्शी असल्यामुळेच क्लीन चीट मिळाली.चाचणी लेखापरीक्षणामधून काही निष्पनन् झाले नाही.संघामध्ये सत्ताबदल झाल्यापासून गोकुळच्या प्रगती चौफेर होत आहे. हायकोर्टानेही गोकुळच्या कारभारावर कसलेही ताशेरे ओढले नाहीत. गोकुळची चाचणी लेखापरीक्षण कोणामुळे झाली हे सर्वांना माहित आहे. शिवाय निनावी पत्रात काही तथ्य नाही. व्यक्तीगत द्वेषातून व गोकुळच्या बदनामीच्या हेतूने ते पत्र तयार केले आहे. सभासदांची दिशाभूल करण्याचा कोणी प्रकार करू नये. महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यात पशुखाद्य वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वाहतूक भाडेवाढ प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. ”