![](_MaharashtraNews1/u/pos/202404/1000176008--800.jpg)
सिध्दनेर्ली येथील प्रचार सभेला जोरदार प्रतिसाद*
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
लोकसभा निवडणुकीचा मांडव आपल्या दारात आहे. पालकमंत्री या नात्याने त्यांच्या प्रचंड मताधिक्यांच्या विजयाची जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे; सर्वांना सामावून घ्या आणि प्रचंड विजय मिळवा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. निवडणुकीचा मांडव आपल्याच दारात असल्यामुळे प्रसंगी दोन पावले मागे घ्या. तिन्ही गटांचा सन्मान आणि समन्वय ठेवत प्रचंड विजय मिळवूया, असेही ते म्हणाले.
महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सिद्धनेर्ली येथे सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, राजर्षी शाहू महाराज हे रत्न कागल या भूमीनेच देशाला दिले. त्यांच्यामुळेच ही सामाजिक आणि आर्थिक हरितक्रांतीही झाली. त्यांच्याच पुरोगामीत्वाच्या वाटेवरून स्वर्गीय खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांनी वाटचाल केली. त्यांनी सामाजिक काम आणि श्रम करून गोरगरिबांसाठी आयुष्य झिजवले. त्यांचे प्रचंड उपकार आमच्यावर आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासातील त्यांचे योगदान मोठे आहे.*
गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप माने, शिवसेना तालुकाध्यक्ष सुधीर पाटोळे-एकोंडी, शेखर सावंत- बानगे यांचीही मनोगते झाली.
व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, पूनम मगदूम - महाडिक, विष्णू बुवा, बाळासाहेब चौगुले, रमेश पाटील, शहाजी पाटील, कृष्णात मेटील, रघुनाथ अस्वले, राहुल मगदूम - महाडिक, सुभाष चौगुले, व सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वागत सरपंच दत्तात्रय पाटील यांनी केले. प्रास्ताविक कागल तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा मनीषा पाटील-बामणीकर यांनी केले. सूत्रसंचालन विजय कुरणे यांनी केले. आभार दत्ता पाटील केनवडेकर यांनी मानले.