महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वीज ऊद्योगातील कंत्राटदार हटवून हरियाणा राज्यातील पध्दतीने कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने केली आहे. या मागणीचे निवेदन कामगार ऊपायुक्त कार्यालय पुणे येथे झालेल्या मिटींग मध्ये सचिव निखिल टेकवडे यांनी केली.
महाराष्ट्र राज्यात वीज ऊद्योगात रिक्त पदांवर सातत्याने व नियमीतपणे कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. येथील कंत्राटदार एजन्सी फक्त नामधारी असून फक्त वेतन वाटपाचे काम करीत आहे, असे असताना ही मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण, बेकायदेशीर बाबी कंत्राटदार कडून केल्या जातात, पोर्टल मध्ये नावे असतानाही आवश्यक ती कागदपत्रे जमा करूनही वेगवेगळ्या नावाखाली पैशाची मागणी केली जाते, पगार वेळेवर मिळत नाही, कामगार खात्याकडे मुख्य नियोक्ता व कंत्राटदार यांच्या तपासणी बाबतीत तक्रारी दाखल करूनही कारवाई होत नाही. असे निवदेनात म्हटले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंत्राटी कामगारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता प्रशासनाने करावी, महाराष्ट्रात देखील हरियाना सरकार प्रमाणे कंत्राटदार मुक्त जॉब सिक्युरिटी द्यावी, वेतनात वाढ करावी, वीज कंपनीच्या होऊ घातलेल्या भरती मध्ये वयात वाढ, आरक्षण व मार्क द्यावेत इत्यादि मागण्या करिता "*सरकार जगाओ" आंदोलनाच्या तिसरा टप्यात आज महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे अप्पर कामगार आयुक्त पुणे विभाग शैलेंद्र पोळ, कामगार उपायुक् अभय गीते यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात सचिन मेंगाळे, निखिल टेकवडे, अविनाश जगताप महेश वाघमारे ,चंद्रकांत नागरगोजे , वैभव कामठे तुकाराम वाल्हेकर,गणेश कपले , सुनील गिरासे यांचा समावेश होता.
.................
विविध जिल्ह्यात कामगार कार्यालाकडे निवेदन
कंत्राटदार तुपाशी व कामगार उपाशी अशी वेळ आल्याने तिन्ही वीज कंपनीतील वीज कंत्राटी कामगार अन्यायाला वाचा फोडुन सरकारला जागे करण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाकडून विधानसभा अधिवेशना दरम्यान 9 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर सरकार जगाओ आंदोलन करणार आहे. विविध जिल्ह्यातील कामगार कार्यालयात गुरुवारी निवेदन देण्यात आले असे संघटनेने म्हटले आहे.