Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डॉ बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायमन्यू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी निर्मल लोहिया, उपाध्यक्षपदी नितीन वाडीकर, नेमचंद संघवीशाहू स्मारक भवनमध्ये लोकराजांवरील चित्रमय प्रदर्शनसुनील कदम,शारंगधर देशमुखसह २५ नगरसेवक शिवसेनेत ! काँग्रेससोबत भाजप, राष्ट्रवादीलाही झटका !!शिरीष सप्रे प्रथम स्मृतीदिनानिमित्त गुरुवारी पुस्तक प्रकाशन, सांगितीक कार्यक्रमकलाकार ओंकार भिसेच्या कुटुंबासाठी एकवटले संवेदनेचे हातमाहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळीला खंडणी स्वीकारताना अटककोल्हापुरात राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, खेडकरांनी जिंकलीय पाच वेळा निवडणूकभाजप कोल्हापूरतर्फे श्यामाप्रसाद मुखर्जींना अभिवादन, आणीबाणीतील सत्याग्रहींचा सन्मानस्वतःच्या आवडीचे करिअर निवडा, यशस्वी भविष्य घडवता येते : रविंद्र खैरे

जाहिरात

 

भाजप कोल्हापूरतर्फे श्यामाप्रसाद मुखर्जींना अभिवादन, आणीबाणीतील सत्याग्रहींचा सन्मान

schedule24 Jun 25 person by visibility 34 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनसंघाचे संस्थापक, विचारवंत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पक्ष कोल्हापूरतर्फे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक,आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आणीबाणी काळातील सत्याग्रहींना सन्मानित करण्यात आला. यामध्ये प्र. द. गणपुले, प्रफुल्ल जोशी, अशोक पाटील, प्रमोद जोशी,अशोक फडणीस, अभय कुलकर्णी, डॉ. मधु तोडकर, विद्याधर काकडे, अनु लिमये, भगवान मिस्त्री आदींचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देण्यात आली.

याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या अकरा वर्षातील विविध विकास योजनेवर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात आले. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून उडान योजनेअंतर्गत विमानसेवा, कोल्हापूर मुंबई रेल्वेचे दुहेरीकरण करणे, कोल्हापूर महानगरपालिकेची सेवा असणाऱ्या केमटी साठी १०० इ बसेस मंजूर करणे अशा अनेक विषयांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास चौफेर चालू आहे. गेल्या अकरा वर्षांमध्ये खऱ्या अर्थानं श्यामा प्रसाद मुखर्जींना अपेक्षित असणार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अपेक्षित असणारे कार्य देशांमध्ये घडत आहे.

 जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी, सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून पंतप्रधान मोदी यांनी काम चालू आहे त्यामुळे आज जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणारी भारताची अर्थव्यवस्था येणाऱ्या काळामध्ये प्रथम क्रमांकावरील असेल असा विश्वास आम्हा कार्यकर्त्यांना आहे. प्रदेश सचिव महेश जाधव यांचेही भाषण झाले. याप्रसंगी माजी नगरसेवक विजय सुर्यवंशी, राजसिंह शेळके, माधुरी नकाते,  हेमंत आराध्ये, गणेश देसाई, गायत्री राऊत, कोमल देसाई, श्वेता गायकवाड, माधुरी कुलकर्णी, संतोष भिवते, संतोष माळी, अमर साठे, प्रज्ञेश हमलाई, विराज चिखलीकर, संपतराव पवार, आप्पा लाड, विजय सूर्यवंशी, अशोक लोहार, महादेव बिरंजे, मानसिंग पाटील, अतुल चव्हाण, विजय अग्रवाल सतीश आंबर्डेकर, दिलीप मैत्राणी उपस्थित होते. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes