+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule02 Jul 24 person by visibility 185 categoryगुन्हे
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : भारतनगर झोपडपट्टी (साळोखे पार्कजवळ) या भागात अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या पथकाने दोन जुलै रोजी छापा टाकून अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई केली. यावेळी घटनास्थळावर वजनकाटा, एक एच पी क्षमतेची मोटर, पाईप नोझल, तीन रिकामे दोन भरलेले १४ किलो वजनाचे घरगुती वापराचे एलपीजी सिलेंडर असा एकूण अंदाजे २५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. 
  अवैध गैस रिफिलींग स्टेशन हे महंमद अल्लाबक्ष मकानदार ही व्यक्ती चालवत होती. त्याच्यावर आयपीसी कलम २८५ कलम २८६ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम तीन व पाच अन्वये राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकामध्ये पथक प्रमुख अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे -पाटील यांच्यासह पुरवठा निरीक्षक मुकुंद लिंगम, भाऊसाहेब खोत व अक्षय ठोंबरे यांचा समावेश होता. 
या कारवाईबद्दल जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले तसेच यापुढेही अशीच कारवाई करत राहण्याच्या सूचना दिल्या. ही वस्ती दाटीवाटीची असल्याने अवैध गॅस रिफिलिंग करताना काही दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित वित्तहानी होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू शकतो, त्यामुळे शहरातील अशा अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनची माहिती नागरिकांनी जवळच्या पोलीस स्टेशन किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयात कळवावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे.