+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule25 Jul 24 person by visibility 554 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राधानगरी, काळम्मावाडी, कोयना धरण क्षेत्रात गेले काही दिवस धुवाँधार पाऊस होत असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस धरण पूर्ण क्षमतेने भरला आहे. २५ जुलै २०२४ रोजी सकाळी दहा वाजून सहा मिनिटाला धरणाचा सहा क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला. दरवाजातून १४२८ व वीजगृहातून १५०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पंचगंगा नदीने गुरुवारी सकाळी नऊ वाजता धोका पातळी ओलांडली. राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी ४३ फूट एक इंच झाली आहे. तुळशी धरण ८४ टक्के भरले आहे. 
दरम्यान गुरुवार सकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे.
राधानगरी धरण परिसरात गेले काही दिवस जोरदार पाऊस होत आहे. धरण ९५ टक्क्याहून अधिक भरले आह. धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडतील अशी शक्यता होती. गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास धरणाचा सहा नंबरचा दरवाजा उघडला. दरम्यान राजाराम बंधारा येथे रात्री एक वाजता पाणी पातळी ४२ फूट ९ इंच होती. गुरुवारी सकाळी पाणी पातळी ४३ फूट ११ इंचापर्यत वाढली.
गुरुवारी सकाळी आठ वाजता कोयना धरणामध्ये एकूण ७५.२६ टीएमसी म्हणजे ७१.५१ टक्के इतका पाणीसाठा आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस असल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी धरणाची वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उचलून सांडव्यावरुन दहा हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे कोयना धरण व्यवस्थापनने म्हटले आहे. धरण पायथा विद्युत गुहामधील १०५० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ११०५० क्युसेक्स असेल असे म्हटले आहे. यामुळे नदीपात्राजवळील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन केले आहे.