+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustव्ही.बींं.नी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्याविरोधात मोर्चा-मुश्रीफ समर्थकांचा इशारा adjustमाणगाव ग्रामपंचायतीचे महिला सुरक्षेसाठी अॅप adjustउपनगरांच्या विकासाचा विचार शारंगधर देशमुख ताकदीने पुढे नेत आहेत – आमदार सतेज पाटील adjustसहा प्राध्यापकांच्या संशोधनास युकेसह जर्मनीचे पेटंट adjustते क्षण मी जगलोय भरभरून, आयुष्य कृतार्थ झालं ! धन्यवाद प्रधानमंत्री महोदय !! adjustट्रॅफिक कंट्रोलसाठी सतेज पाटील उतरले रस्त्यावर, लोकांना भावली आमदारांची तत्परता adjustस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांची सदैव प्रेरणा- प्राचार्य जीवन साळोखे adjustविभागीय क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, सरकारची मान्यता ! adjustमृत्यूनंतरची मानवसेवा ! बालकल्याणला अरुण माने कुटुंबियांकडून २९ लाखांची मदत !! adjustविमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी तेज घाटगे
1000884965
1000854315
1000830448
1000813766
1000781488
schedule17 Jul 24 person by visibility 231 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यावरुन जो हिंसाचार झाला तो दुर्दैवी आहे. मात्र या घटनेचे काँग्रेस आणि महाविकास आघाडी राजकारण करत आहे. त्याला धार्मिक रंग दिला जात आहे. माजी पालकमंत्री सतेज पाटील यांची गजापूरला भेट म्हणजे पुतणा-मावशीचं प्रेम आहे. नाटकी आणि ढोंगीपणा आहे. त्यांच्या पालकमंत्रीपदाच्या कालावधीत विशाळगडावरील अतिक्रमणे का हटविली नाहीत ? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केला. तसेच माजी पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापुरात दंगड घडणार असे जे विधान केले होते, त्याची चौकशी झाली पाहिजे असेही महाडिक म्हणाले.
विशाळगड प्रकरणानंतर खासदार महाडिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. विशाळगड येथील अतिक्रमण हटविणाऱ्या शिवभक्तांना अतिरेकी म्हणणे चुकीचे आहे. महाराष्ट्रातील सगळे गडकिल्ले हे अतिक्रमणमुक्त असायला हवेत ही आमची भूमिका आहे. काँग्रेस व महाविकास आघाडीवाले नेमके कुणाच्या बाजूने आहेत. ते अतिक्रमणच्या बाजूने आहेत का ? अतिरेकी यासिन भटकळ हा विशाळगडावर काही दिवस होता. त्याला पाठीशी घालणाऱ्यासोबत काँग्रेसवाले आहेत का ? हे एकदा जाहीर करावे.’असेही महाडिक म्हणाले.
 गजापूर येथे झालेला हिंसाचार हा दुर्दैवीआहे. मात्र काँग्रेसवाले या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रकार करत आहेत. मतांच्या लाचारीसाठी हे सगळं घडवून आणलं जात आहे का हे समोर आलं पाहिजे. विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी शिवभक्तांवर आंदोलन करण्याची वेळ का आली ? हे त्यांनी तपासावे. शिवाय काही महिन्यापूर्वी दसरा चौकात मुलांच्या शाळकरी बसवर हल्ला झाल्यानंतर काँग्रेसवाले कोठे गेले होते ? अशी विचारणाही महाडिक यांनी केली. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या कोल्हापूर दौऱ्याला हिंदुत्ववादी संघटनांनी केलेला विरोध हा योग्यच आहे. कोल्हापूर सांभाळायला कोल्हापूरकर सक्षम आहेत असेही महाडिक म्हणाले.