हद्दवाढीचे काम निस्वार्थपणे, कुठलाही स्वार्थ नाही ! आठ गावांच्या समावेशाबाबत आयुक्तांना पत्र !!
schedule21 Jun 25 person by visibility 553 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "हददवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे शहरासह ग्रामीण भागाच्या विकासासाठी हददवाढ महत्त्वाची आहे. हद्दवाढीसाठी निस्वार्थपणे काम करत आहे त्यामध्ये कुठलाही व्यक्तिगत स्वार्थ नाही" असे स्पष्ट भूमिका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी मांडली. तसेच त्यांनी हददवाढीत शहरालगतच्या आठ गावांचा समावेश करून तो प्रस्ताव तत्काळ सरकारकडे सादर करावा यासाठी महापालिकेच्या शासकीय आयुक्त के मंजूलक्ष्मी यांना पत्र दिले. यामध्ये उचगाव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा, नवे बालिंगा, नवे पाडळी, पिरवाडी या आठ गावांचा हद्दवाढीत समावेश करून प्रस्ताव तात्काळ सादर करावा असे पत्रात म्हटले आहे
दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात वीस गावातील सरपंच व उपसरपंचांनी बैठक घेऊन हद्दवाढीच्या विषयावरून आमदार क्षीरसागर यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्या संदर्भात बोलताना क्षीरसागर म्हणाले, माझ्यावर जी टीका झाली त्याबद्दल मी कोणालाही काही बोलणार नाही. शहर व ग्रामीण असा भेदभाव करणार नाही. ग्रामीण भागातील लोकांना विश्वासात घेऊन हद्दवाढ करायची ही आमची भूमिका आहे. त्यांचे गैरसमज दूर करण्याची जबाबदारी आमची आहे. हद्दवाढीत समावेश झाल्यानंतर त्या भागांचा विकास करण्याची जबाबदारी महापालिकेची अर्थात प्रशासनाची आहे. हद्दवाढीवरून माझ्यावर जी राजकीय टीका केली जाते त्याला मी भीक घालत नाही. मात्र स्वार्थासाठी काम करत आहे असे म्हणणे चुकीचे आहे. 1942 मध्ये नगरपालिकेची स्थापना झाली तेव्हापासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नाही. गेली 80 वर्ष हद्दवाढ नाही. या शहराचे वाटोळे करण्याचे काम काँग्रेसने केले. राजकीय हेतू ठेवून कोणी सांगितले म्हणून पोपटासारखे माझ्यावर टीका करत असाल तर त्यांच्या टीकेला उत्तर द्यावे लागेल असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
हद्दवाढ कधी करायची ? निवडणुकीच्या आधी की निवडणुकीनंतर ? या संदर्भात राज्याचे दोन वरिष्ठ अधिकारी निवडणूक आयोगाशी चर्चा करत आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. हद्दवाढ झाल्यानंतर ग्रामीण भागातील जमिनी संपुष्टात येणार हा गैरसमज आहे. शाळा मैदाने बगीचा यासाठी सरकारी नियमाप्रमाणे आरक्षण पडते. त्या आरक्षणाशी लोकप्रतिनिधींचा काही संबंध नसतो. आरक्षण आम्ही टाकत नाही. साऱ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे. मात्र हद्दवाढीला चुकीच्या भूमिकेतून विरोध होत आहे. यामुळे शहर आणि जिल्ह्याचा विकास खुंटत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार संजय मंडलिक, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील बैठकीत झालेला चर्चेचा तपशील मांडत क्षीरसागर म्हणाले पहिल्या टप्प्यात शहराजवळील आठ गावे हददवाढीत समाविष्ट करून घेण्यासंबंधी झाली. त्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी समन्वय साधून शहराशी एकरूप झालेल्या उचगाव , सरनोबतवाडी , मोरेवाडी, पाचगाव, कळंबा, नवे बालिंगा, नवे पाडळी, पिरवाडी या आठ गावांचा हददवाढीत समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव तत्काळ सरकारला सादर करावा असे पत्र महापालिका आयुक्तांना दिल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. मुंबईतील बैठकीला करवीरचे आमदार चंद्रदीप नरके व कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक हे का अनुपस्थित होते या प्रश्नावर क्षीरसागर म्हणाले, प्रत्येक लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातील लोकांचे म्हणणे ऐकावे लागते. ते का बैठकीला उपस्थित नव्हते हा प्रश्न तुम्ही त्या दोन्ही आमदारांना विचारा. ते त्याचे उत्तर देऊ शकतील. गेल्या काही वर्षात कोल्हापूरचा विकास झपाट्याने होत आहे. विविध योजना राबविले आहेत. मी राजकीय जीवनात कोणताही व्यक्तिगत स्वार्थ न पाहता शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी काम करत आहे. हद्दवाढ ही अटळ आहे.
पत्रकार परिषदेला शिवसेनेच्या उपनेत्या व माजी आमदार जयश्री जाधव, स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, राहुल चव्हाण, राजू हुंबे, कमलाकर जगदाळे, दुर्गेश लिंग्रस, सुनील जाधव, महिला आघाडीच्या मंगला साळोखे, पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील उपस्थित होते
दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात वीस गावातील सरपंच व उपसरपंचांनी बैठक घेऊन हद्दवाढीच्या विषयावरून आमदार क्षीरसागर यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्या संदर्भात बोलताना क्षीरसागर म्हणाले, माझ्यावर जी टीका झाली त्याबद्दल मी कोणालाही काही बोलणार नाही. शहर व ग्रामीण असा भेदभाव करणार नाही. ग्रामीण भागातील लोकांना विश्वासात घेऊन हद्दवाढ करायची ही आमची भूमिका आहे. त्यांचे गैरसमज दूर करण्याची जबाबदारी आमची आहे. हद्दवाढीत समावेश झाल्यानंतर त्या भागांचा विकास करण्याची जबाबदारी महापालिकेची अर्थात प्रशासनाची आहे. हद्दवाढीवरून माझ्यावर जी राजकीय टीका केली जाते त्याला मी भीक घालत नाही. मात्र स्वार्थासाठी काम करत आहे असे म्हणणे चुकीचे आहे. 1942 मध्ये नगरपालिकेची स्थापना झाली तेव्हापासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नाही. गेली 80 वर्ष हद्दवाढ नाही. या शहराचे वाटोळे करण्याचे काम काँग्रेसने केले. राजकीय हेतू ठेवून कोणी सांगितले म्हणून पोपटासारखे माझ्यावर टीका करत असाल तर त्यांच्या टीकेला उत्तर द्यावे लागेल असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
हद्दवाढ कधी करायची ? निवडणुकीच्या आधी की निवडणुकीनंतर ? या संदर्भात राज्याचे दोन वरिष्ठ अधिकारी निवडणूक आयोगाशी चर्चा करत आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. हद्दवाढ झाल्यानंतर ग्रामीण भागातील जमिनी संपुष्टात येणार हा गैरसमज आहे. शाळा मैदाने बगीचा यासाठी सरकारी नियमाप्रमाणे आरक्षण पडते. त्या आरक्षणाशी लोकप्रतिनिधींचा काही संबंध नसतो. आरक्षण आम्ही टाकत नाही. साऱ्यांना बरोबर घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे. मात्र हद्दवाढीला चुकीच्या भूमिकेतून विरोध होत आहे. यामुळे शहर आणि जिल्ह्याचा विकास खुंटत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार संजय मंडलिक, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील बैठकीत झालेला चर्चेचा तपशील मांडत क्षीरसागर म्हणाले पहिल्या टप्प्यात शहराजवळील आठ गावे हददवाढीत समाविष्ट करून घेण्यासंबंधी झाली. त्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी समन्वय साधून शहराशी एकरूप झालेल्या उचगाव , सरनोबतवाडी , मोरेवाडी, पाचगाव, कळंबा, नवे बालिंगा, नवे पाडळी, पिरवाडी या आठ गावांचा हददवाढीत समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव तत्काळ सरकारला सादर करावा असे पत्र महापालिका आयुक्तांना दिल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. मुंबईतील बैठकीला करवीरचे आमदार चंद्रदीप नरके व कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक हे का अनुपस्थित होते या प्रश्नावर क्षीरसागर म्हणाले, प्रत्येक लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातील लोकांचे म्हणणे ऐकावे लागते. ते का बैठकीला उपस्थित नव्हते हा प्रश्न तुम्ही त्या दोन्ही आमदारांना विचारा. ते त्याचे उत्तर देऊ शकतील. गेल्या काही वर्षात कोल्हापूरचा विकास झपाट्याने होत आहे. विविध योजना राबविले आहेत. मी राजकीय जीवनात कोणताही व्यक्तिगत स्वार्थ न पाहता शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी काम करत आहे. हद्दवाढ ही अटळ आहे.
पत्रकार परिषदेला शिवसेनेच्या उपनेत्या व माजी आमदार जयश्री जाधव, स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, राहुल चव्हाण, राजू हुंबे, कमलाकर जगदाळे, दुर्गेश लिंग्रस, सुनील जाधव, महिला आघाडीच्या मंगला साळोखे, पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील उपस्थित होते