Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राजर्षी शाहू विद्यामंदिराला माजी विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेटकेंद्र, राज्य सरकारने राजर्षी  शाहू महाराजांच्या विचाराप्रमाणे कृती करावी : खासदार शाहू महाराजपालकमंत्री आबिटकर, आमदार महाडिकांनी केली क्रीडा संकुलाची पाहणीउद्योजकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उद्योगमंत्र्यांच्यासोबत विशेष बैठककृषी-तंत्र विद्यापीठाकडून उत्कर्ष आवळेकर, योगेश चिमटेंना पीएचडीजिल्ह्यात ३६८४ शाळांमध्ये योगदिन साजराहद्दवाढीच्या प्रस्तावात नवी उजळाईवाडीचा समावेश, पीरवाडीचा चुकून उल्लेख-राजेश क्षीरसागरकोटा, पुणेच्या धर्तीवर कागलमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र करणार-मंत्री हसन मुश्रीफपप्पा सांगा कुणाचे… पप्पा साऱ्या कलारसिकांचे ! अरुण सरनाईक म्हणजे मराठी सिनेमाचे सिंहासन!! हद्दवाढीचे काम निस्वार्थपणे, कुठलाही स्वार्थ नाही ! आठ गावांच्या समावेशाबाबत आयुक्तांना पत्र !!

जाहिरात

 

कोटा, पुणेच्या धर्तीवर कागलमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र करणार-मंत्री हसन मुश्रीफ

schedule22 Jun 25 person by visibility 80 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजस्थानमधील कोटा व पुण्याच्या धर्तीवर यूपीएससी व  एमपीएससी या स्पर्धा परीक्षांसाठीचे मार्गदर्शन केंद्र कागलमध्ये निर्माण करू, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.         
कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने व माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांच्या पुढाकाराने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मुश्रीफ म्हणाले, राजस्थानमधील कोटा आणि पुण्यातील कोचिंग क्लासेसकडे विद्यार्थ्यांचा जास्त ओढा आहे. तिथे असणाऱ्या सोयीसुविधा आणि त्या कोचिंग क्लासेसची कार्यपद्धती अभ्यासण्यासाठी एक कमिटी स्थापन करा. कमिटीने जाऊन या दोन्ही शहरातील कोचिंग क्लासेसचा अभ्यास करून अहवाल सादर करावा.  त्यानुसार कागललाही त्या पद्धतीचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व मार्गदर्शन उभारू.      
     
माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले, ‘दहावी-बारावीत उत्तीर्ण झालेल्या मुलांना योग्य दिशा देणे व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे . विद्यार्थ्यांची स्वप्न पूर्ण करण्याची सुरुवात आता होत आहे. विद्यार्थ्यांनी कष्ट घेऊन मोठे यश संपादित करावे. जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने म्हणाले, शिक्षणामुळेच देशात समृद्धी आले आहे . संघर्षातून आपण तयार होतो . आयुष्यात संघर्ष करायची तयारी ठेवा. महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा शितल फराकटे म्हणाल्या, दर्जेदार व गुणवत्त शिक्षण घेऊन आपल्याला व्यवसाय- नोकरी तर करायचीच आहे. त्याच जोडीला एक चांगला माणूस व सुजाण नागरिक बना.....!

प्राचार्य डॉ . संजयकुमार इंगळे, उदय काटकर यांची मनोगते झाली.कागल शहरातील रहिवाशी व दृष्टीदोष असलेल्या शिवम चौगुले यांनी आयआयटीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतल्याबद्दल विशेष सत्कार झाला. कार्यक्रमाला चंद्रकांत गवळी, रामगोंड पाटील, अतुल जोशी, शुभम चौगुले, नवल बोते, पी. बी . घाटगे, नामदेवराव पाटील, प्रविण काळबर, ॲड . संग्राम गुरव, नितीन दिंडे, अस्लम मुजावर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes