Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राजर्षी शाहू विद्यामंदिराला माजी विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेटकेंद्र, राज्य सरकारने राजर्षी  शाहू महाराजांच्या विचाराप्रमाणे कृती करावी : खासदार शाहू महाराजपालकमंत्री आबिटकर, आमदार महाडिकांनी केली क्रीडा संकुलाची पाहणीउद्योजकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उद्योगमंत्र्यांच्यासोबत विशेष बैठककृषी-तंत्र विद्यापीठाकडून उत्कर्ष आवळेकर, योगेश चिमटेंना पीएचडीजिल्ह्यात ३६८४ शाळांमध्ये योगदिन साजराहद्दवाढीच्या प्रस्तावात नवी उजळाईवाडीचा समावेश, पीरवाडीचा चुकून उल्लेख-राजेश क्षीरसागरकोटा, पुणेच्या धर्तीवर कागलमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र करणार-मंत्री हसन मुश्रीफपप्पा सांगा कुणाचे… पप्पा साऱ्या कलारसिकांचे ! अरुण सरनाईक म्हणजे मराठी सिनेमाचे सिंहासन!! हद्दवाढीचे काम निस्वार्थपणे, कुठलाही स्वार्थ नाही ! आठ गावांच्या समावेशाबाबत आयुक्तांना पत्र !!

जाहिरात

 

उद्योजकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उद्योगमंत्र्यांच्यासोबत विशेष बैठक

schedule22 Jun 25 person by visibility 25 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्यापक स्वरूपात बैठक घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. कोल्हापूर शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळखीचा भाग असलेल्या शाहू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शाहू महाराज स्मारक उभारण्याच्या दृष्टीने सरकारकडून कटिबद्ध राहू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

पालकमंत्री आबिटकर यांनी, माजी आमदार व शिवसेना उपनेते जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव उपस्थित होते.  शिवसेना उपनेत्या जाधव यांच्या नेतृत्वात सादर झालेले महत्त्वाचे प्रस्ताव सादर केले. जाधव यांनी आमदारकीच्या काळात कोल्हापूर शहराच्या पायाभूत सुविधा, रस्ते विकास, उद्यान, क्रीडा संकुल, सांडपाणी व्यवस्थापन, पर्यटन आराखडे व महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास या बाबत शासन दरबारी अनेक प्रस्ताव सादर केले होते, परंतु सध्या हे प्रस्ताव प्रलंबित आहेत.

“या प्रस्तावांना तातडीने गती मिळावी, त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद व्हावी व ह्या प्रकल्पांचे प्रत्यक्षात रूपांतर व्हावे,” अशी ठाम मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी 'शाहू मिल पर्यटन विकास आराखडा' स्वखर्चाने तयार करून सरकारकडे सादर केला होता. हा आराखडा कोल्हापूर शहराच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि पर्यटन विकासासाठी मोलाचा ठरणार आहे. या आराखड्याला मान्यता मिळून शाहू मिलच्या जागेवर भव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शाहू महाराज स्मारक उभारावे, अशी मागणीही  केली. युवा उद्योजक सत्यजित जाधव यांनी जिल्ह्यातील उद्योजक व लघुउद्योगांवरील अडथळे, परवानग्यांची प्रक्रियात होणाऱ्या विलंबासंदर्भात स्पष्टपणे मांडणी केली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes