Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मुंबईने एक लाख प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम उभारावे, सरकार सहकार्य करेल –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराधानगरीतील गुडाळमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेशगृहमंत्रीपदासाठी मुश्रीफ हे एक उत्तम चॉईस ठरले असते! संजय राऊत यांचे पुस्तकातून प्रकटीकरण !!खासदार महाडिकांचे गोकुळसंदर्भात ज्ञान कमी, डोंगळेंच्यावर अविश्वास ठराव आणण्याची वेळ येणार नाही – आमदार सतेज पाटीलगांधीनगर प्रादेशिक पाणी पुरवठा कामावरुन अधिकारी धारेवर, तर एमजीपीसह मेघा इन्फ्रास्ट्रक्चरच्या कार्यालयाला टाळे -आमदार सतेज पाटीलगार्डन्स क्लबतर्फे कोल्हापुरात दोन दिवसीय ग्रीन शॉपीचे आयोजनवीज कंत्राटी कामगार कायम कधी होणार ? दहा जूनच्या निर्णयाकडे लक्ष !कोल्हापुरात निघणार शनिवारी तिरंगा पदयात्रा, दसरा चौकातून प्रारंभ19 संचालक एकसंघ, आघाडीच्या नेतेमंडळीच्या मार्गदर्शनाखालीच काम ! अरुण डोंगळे एकाकी ?व्यवसाय परवाना फी दरवाढ कमी होणार ! महापालिका उपायुक्तांची चेंबरच्या शिष्टमंडळाला ग्वाही !

जाहिरात

 

बायोलॉजीचे विद्यार्थी अभियांत्रिकीला पात्र ! बारावी ग्रुप-बीच्या विद्यार्थ्यांना संधी !!

schedule07 Jul 24 person by visibility 24481 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
शैक्षणिक वर्ष २४-२५ पासून १२ वीला ‘ग्रुप-बी’ (पी.सी.बी.) म्हणजेच फक्त बायोलॉजी (जीवशास्त्र) ग्रुप असणारे विद्यार्थी आता अभियांत्रिकीला सुद्धा पात्र होणार आहेत. 
राज्य सरकारच्या २०२४-२५ च्या पदवी व पदव्युत्तर अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तकातील क्रमांक सातच्या पात्रता निकषांच्या संदर्भाने ज्या १२ वीच्या बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सरकारच्ी सामायिक प्रवेश परीक्षा (सी.ई.टी) दिली आहे तसेच केंद्र शासनाची ‘नीट’ ची परीक्षा दिली असेल अशा विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये थेट संधी दिली जाणार आहे. यामुळे मेडिकल,फार्मासी अशा प्रवेश परीक्षांना ज्यांनी अर्ज केलेले आहेत अशा हजारो विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाचा पर्याय आता उपलब्ध होणार आहे. भविष्यात अशा सर्व विद्यार्थ्यांना बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग ,एग्रीकल्चर इंजिनिअरिंग, फूड इंजिनिअरिंग, लेदर टेक्नॉलॉजी,पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल इंजीनियरिंग ,प्रिंटिंग इंजिनिअरिंग, फॅशन टेक्नॉलॉजी आणि टेक्स्टाईल केमिस्ट्री अशा अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणे शक्य होणार आहे.
याबाबतचा तपशील लवकरच राज्य सरकारकडून घोषित केला जाईल. तत्पूर्वी संबंधित विद्यार्थी, पालकांनी या सुवर्णसंधीचा उपयोग करून १० जुलै २०२४ पासून सुरु होणाऱ्या अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये स्वतःची नोंदणी करावी व अभियांत्रिकीचा पर्याय स्वतःसाठी उपलब्ध करून घ्यावा असे आवाहन येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी सर्व पालक व विद्यार्थ्यांना केले आहे.
 केआयटीमध्ये १० जुलै २४ पासून विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन,कागद पत्रांची तपासणी/ छाननी व ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे कोल्हापूर,सांगली,सातारा,कोकण परिसरात फक्त केआयटी मध्ये २२ वर्षांची परंपरा असलेला ‘बायोटेक्नॉलॉजी इंजीनियरिंग’ हा कोर्स आता १२ वी च्या फक्त ग्रुप बी असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes