Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बॅडमिंटन असोसिएशनतर्फे कोल्हापुरात पाच दिवस जिल्हास्तरीय स्पर्धानगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रशासकांच्या आदेशाला केराची टोपली- कोल्हापूर नेक्स्टचा आरोपसभापतीपदी माझी निवड म्हणजे ४२ वर्षाच्या  एकनिष्ठतेचे फळ ! ना नेता बदलला - ना गट !! सुर्यकांत पाटील भैय्या माने पुणे पदवीधरच्या मैदानात ! महायुतीकडून इच्छुक, मतदार नोंदणीसाठी तयारी जोरात !! बाजार समितीच्या सभापती-उपसभापतींच्या सत्कारात शुभेच्छांच्या सरी कमी… राजकीय कडकडाट जास्त !बाजार समितीची दोन्ही पदे राष्ट्रवादीकडे ! सभापतीपदी सुर्यकांत पाटील, उपसभापतीपदी राजाराम चव्हाण !! शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ! कुमार आहुजा, वैभव सावर्डेकर, महेश वारकेंचा पुढाकार !!नंदवाळ दिंडीत वारकऱ्यांना गोकुळतर्फे सुगंधी दूध- हरीपाठ वाटप  व्यापक समाजहितासाठी माध्यमांचा जबाबदारीने वापर व्हावा –डॉ. अशोक चौसाळकरविठूनामाचा गजर-माऊलीची पालखी ! पुईखडीवर रंगला रिंगण सोहळा !!

जाहिरात

 

बायोलॉजीचे विद्यार्थी अभियांत्रिकीला पात्र ! बारावी ग्रुप-बीच्या विद्यार्थ्यांना संधी !!

schedule07 Jul 24 person by visibility 25212 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
शैक्षणिक वर्ष २४-२५ पासून १२ वीला ‘ग्रुप-बी’ (पी.सी.बी.) म्हणजेच फक्त बायोलॉजी (जीवशास्त्र) ग्रुप असणारे विद्यार्थी आता अभियांत्रिकीला सुद्धा पात्र होणार आहेत. 
राज्य सरकारच्या २०२४-२५ च्या पदवी व पदव्युत्तर अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तकातील क्रमांक सातच्या पात्रता निकषांच्या संदर्भाने ज्या १२ वीच्या बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सरकारच्ी सामायिक प्रवेश परीक्षा (सी.ई.टी) दिली आहे तसेच केंद्र शासनाची ‘नीट’ ची परीक्षा दिली असेल अशा विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये थेट संधी दिली जाणार आहे. यामुळे मेडिकल,फार्मासी अशा प्रवेश परीक्षांना ज्यांनी अर्ज केलेले आहेत अशा हजारो विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाचा पर्याय आता उपलब्ध होणार आहे. भविष्यात अशा सर्व विद्यार्थ्यांना बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग ,एग्रीकल्चर इंजिनिअरिंग, फूड इंजिनिअरिंग, लेदर टेक्नॉलॉजी,पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल इंजीनियरिंग ,प्रिंटिंग इंजिनिअरिंग, फॅशन टेक्नॉलॉजी आणि टेक्स्टाईल केमिस्ट्री अशा अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणे शक्य होणार आहे.
याबाबतचा तपशील लवकरच राज्य सरकारकडून घोषित केला जाईल. तत्पूर्वी संबंधित विद्यार्थी, पालकांनी या सुवर्णसंधीचा उपयोग करून १० जुलै २०२४ पासून सुरु होणाऱ्या अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये स्वतःची नोंदणी करावी व अभियांत्रिकीचा पर्याय स्वतःसाठी उपलब्ध करून घ्यावा असे आवाहन येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी सर्व पालक व विद्यार्थ्यांना केले आहे.
 केआयटीमध्ये १० जुलै २४ पासून विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन,कागद पत्रांची तपासणी/ छाननी व ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे कोल्हापूर,सांगली,सातारा,कोकण परिसरात फक्त केआयटी मध्ये २२ वर्षांची परंपरा असलेला ‘बायोटेक्नॉलॉजी इंजीनियरिंग’ हा कोर्स आता १२ वी च्या फक्त ग्रुप बी असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes