Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
साऊंड सिस्टीम-लेझर लाईटला फाटा देणाऱ्या खंडोबा तालीम मंडळाचा सत्कार    महापालिका कर्मचारी मंगळवारच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावरगणेशोत्सव कामासाठी गैरहजर राहिल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई, महापालिकेने काढला आदेशप्लास्टिक मुक्तीचे मॉडेल ! १०० दिवसात प्लास्टिक दूर... नक्की करणार आमचं कोल्हापूर!!डीवायपी ग्रुपचे ध्येय, जगातील टॉप ५०० विद्यापीठात स्थान ! कोल्हापुरात सर्वात उंच २३ मजली इमारत उभारणार!!गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच डीवाय पाटील विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना संस्काराची शिदोरी - लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयलपाइपलाइन योजनेवरुन काँग्रेस-भाजपमध्ये वाकयुद्ध, काँग्रेसच्या चर्चेच्या आव्हानाला जयंत पाटलांचे प्रत्युत्तरसेवानिवृत्त सैनिकाचा मेव्हण्यावर गोळीबारअयोध्या फाउंडेशन शिंगणापूरतर्फे मुंबईकडे शिदोरी रवानाआंदोलनासाठी जमलेले मनसेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

जाहिरात

 

पर्यावरणपूरक गणेशोत्सवात जिल्हावासियांनी अधिकाधिक सहभाग नोंदवावा-सीईओ कार्तिकेयन एस

schedule12 Aug 25 person by visibility 134 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमासाठी जिल्हा परिषद सज्ज झाली असून दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही जास्तीत जास्त कुटुंबे या उपक्रमामध्ये सहभागी करून घेणेसाठी प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमाच्या नियोजनाबाबत आज रोजी जिल्हास्तरीय बैठक झाली. " जिल्हयात २०१५ पासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबविण्यात येत आहे. या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे हे दहा वर्ष पूर्ण झाली असून या उपक्रमामुळे लोकांमध्ये झालेला पर्यावरणपूरक वर्तन बदल या वर्षी ही टिकवायचा आहे. यासाठी सर्वांनी या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा." असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे.  

 ग्रामीण भागात 'एक गाव, एक गणपती' या संकल्पनेनुसार सार्वजनिक गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करणे, घरगुती गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करताना धातुच्या/ संगमरवरी/ इतर पर्यायी किंवा मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना, 'घरगुती गणेशमुर्तींचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी यासंबधी गावस्तरावर प्रबोधन करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना केल्या आहेत. तसेच गावनिहाय मुर्ती संकलन व पर्यायी विसर्जनासाठी ठिकाणे निश्चिती, त्या ठिकाणांची स्वच्छता, विसर्जनाकरिता आवश्यक काहिली संख्या किंवा वापरात नसलेल्या पाण्याच्या खणी निश्चित करण्याबाबत कळविल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

निर्माल्य संकलन, वाहतूक व योग्य व्यवस्थापन यासंबंधी चर्चा झाली. घरातून निर्माल्याचे वर्गीकरण केले जाईल याबाबत आशा, अंगणवाडी सेविका, शालेय विद्यार्थी यांचेमार्फत जनजागृती करणे अशा सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या आहेत. जिल्हास्तरावरून या उपक्रमाचे सनियंत्रण केले जाणार आहे. घरगुती गणेश विसर्जनादिवशी जिल्हा परिषद, कोल्हापूर, व उपप्रादेशिक कार्यालय, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, कोल्हापूर यांच्या पथकाव्दारे गावामध्ये केलेल्या नियोजनाच्या पाहणीसाठी भेटी दिल्या जाणार आहेत.या बैठकीला सर्व गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीव्दारे उपस्थित होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाबाबत जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट यांनी प्रास्ताविक केले.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes