Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महाडिकांची कार्यपद्धती, सामान्य माणसाला पद ! चालक बनला संचालक, शेतकऱ्यांचाही सन्मान!! सारस्वत विकास मंडळातर्फे महिलांचा सन्मानशिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाची प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षणामंत्र्यांसोबत बैठककेआयटीमध्ये गुरुवारी शाश्वत शेतीविषयी व्याख्यानविद्यार्थ्यांनी तयार केले इकोफ्रेंडली रंगआम्ही चित्रकर्मी क्रिकेट लीग 2025' स्पर्धेला सुरुवात, बुधवारी बक्षीस समारंभ आरडी सिनेमातून उलगडणार एका चुकीचे नाट्यमय परिणामकेआयटीला आयएसटीईचा बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मिंग इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट पुरस्कारसमिधा प्रतिष्ठानतर्फे महिला दिन-पुरस्कार वितरण समारंभ उत्साहातमहायुतीचे नेते म्हणतात राज्याचा अर्थसंकल्प लोकाभिमुख ! काँग्रेसच्या आमदारांचे टीकास्त्र !!

जाहिरात

 

रमाईच्या त्यागामुळेच सारा समाज आनंदात- डॉ. प्रवीण कोडोलीकर

schedule07 Feb 25 person by visibility 169 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘विश्वरत्न डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांनी मानव जातीला आदर्श निर्माण करून दिला. त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांनी सुद्धा त्यासाठी खूप मोठा त्याग केला आहे; त्यामुळेच सारा समाज संविधानाच्या माध्यमातून आनंदात आहे,’ असे प्रतिपादन आजी-माजी विद्यार्थी संघटना शिवाजी विद्यापीठाचे डॉ. प्रवीण कोडोलीकर यांनी केले.
विचारे माळे येथे निळा रक्षकतर्फे रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी डॉ. कोडोलीकर बोलत होते. याप्रसंगी ते म्हणाले, ‘एखादे चांगले कार्य करायचे असेल तर त्यासाठी पत्नीचा त्याग सुद्धा महत्त्वाचा असतो. रमाई यांनी अनेक हालअपेष्टा सहन करत बाबासाहेब यांना कायमच पाठिंबा देण्याचं काम केलं त्यांचा त्याग समाज कधीच विसरणार नाही.’ कार्यक्रमाला  अनिल भोसले, अनिल माने, विराज सुतार, राहुल शिंदे,  नितिन शिंदे, निलेश शिंदे, रोहन वाघमारे, सतिश साळवे, राजू भंडारे आदी  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes