शक्तीपीठ महामार्ग विरोधात एक जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन
schedule27 Jun 25 person by visibility 16 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शेतकऱ्यांच्यावर लादण्यात येतं असलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधात, कृषी दिना दिवशी एक जुलै २०२५ रोजी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय गुरुवारी ऑनलाईन झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यादिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन करण्याचे ठरले. राज्य सरकारने दडपशाही करू नये. पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये. असे आवाहन या बैठकीच्या निमित्ताने विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.
नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे . या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी गुरुवारी राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक झाली. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, खासदार विशाल पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, खासदार नागेश पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, आमदार दिलीप सोपल, आमदार चंद्रकांत नवघरे, आमदार प्रविण स्वामी ऑनलाइन सहभागी झाले होते.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी, राज्य सरकारला वठणीवर आणायच असेल तर, संघर्ष अधिक तीव्र करूया. सरकाराला शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊया. असं आवाहन त्यांनी केलं. खासदार विशाल पाटील यांनी, शक्तीपीठ महामार्ग विरोधात रस्त्यावरच्या लढाईत शेतकऱ्यांच्या सोबत आहे. चक्काजाम आंदोलन अधिक ताकतीन करण्याबाबत नियोजन करण्याच आश्वासन त्यांनी दिले आमदार विश्वजीत कदम यांनी, शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध कायम असून सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन, हा लढा अधिक तीव्र करणारं असल्याचं त्यांनी सांगितलं. आमदार कैलास पाटील, धाराशिव नगर येथील शेतकरी एडवोकेट गजेंद्र येळकर, नांदेड जिल्ह्यातील सतीश कुलकर्णी, गोविंद घातोळ, महेश खराडे, डॉक्टर सुधीन दळवे, गणेश घोडके, एडवोकेट वीरेंद्र फोंडके आदी शेतकऱ्यांनी या बैठकीत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. या बैठकीला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर, बापूराव ढोरे, अजय बुरांडे, अभिजित देशमुख, गणेश घोडके, उमेश एडके, अभिजीत देशमुख, दिगंबर कांबळे, शिवाजी मगदूम, प्रकाश पाटील, कृष्णा पाटील शिवाजी कांबळे अशा विविध जिल्ह्यातील शेतकरी या बैठकीला ऑनलाइन सहभागी झाले होते.