Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चौथीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतूनच हवे, पाचवीपासून हिंदी शिकवण्यास हरकत नाही –शरद पवारशक्तीपीठ महामार्ग विरोधात एक जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनधनंजय महाडिकांसहित भाजपा पदाधिकाऱ्यांकडून राजर्षी शाहू महाराजांना अभिवादनतळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला- डॉ.जब्बार पटेलजिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाने काम करुन व्यक्तिमत्वाची उंची वाढवावी-प्रकाश आबिटकरलग्नात रुखवतासोबत पुस्तकाचे कपाट, अक्षताबरोबर राजर्षी शाहूंचे पुस्तक द्या– डॉ. जयसिंगराव पवारशिरीष सप्रे म्हणजे जगतमित्र, माणसं जोडणारे सुसंवादी व्यक्तिमत्व -शरद पवारांनी जागविल्या आठवणीकोल्हापुरी चप्पलच्या रक्षणासाठी कृष्णराज महाडिकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट गोकुळमध्ये राजर्षी शाहू महाराजांची १५१ वी जयंती साजरीशक्तीपीठ महामार्गप्रश्नी मुश्रीफ, आबिटकरांच्या मंत्रीमंडळातील भूमिकेवर साशंकता-सतेज पाटलांचा हल्लाबोल

जाहिरात

 

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला- डॉ.जब्बार पटेल

schedule26 Jun 25 person by visibility 36 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘तळागाळातील वंचित,शोषित समाजाला सत्तेच्या मार्गातून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराज यांनी देशाला दिला आहे. विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि सामाजिक मूल्ये जपण्याचे कार्य करुन देवत्वाच्याही पलीकडे जाणारा राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होते. राजर्षी शाहू महाराजांच्या समतेची शिकवण आत्मसात करुन माणुसकी जपा, राज्य करण्यासाठी सर्वप्रथम माणुसकी कळली पाहिजे. ’असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री डॉ.जब्बार पटेल यांनी केले.

  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने यंदाचा 'राजर्षी शाहू पुरस्कार' ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री डॉ.जब्बार पटेल यांना खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा ट्रस्टचे अध्यक्ष अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले उपस्थित होते.

    देशाने आदर्श घ्यावा, असे उत्तुंग कार्य शाहू महाराजांनी केले आहे. शाहू महाराज प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात आहेत. शाहू महाराजांचे विचार आणि त्यांचे कार्य सर्वदूर पोहोचवण्याच्या दृष्टीने शाहू स्मारकाच्या नूतनीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पाच कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री  आबिटकर यांनी केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिले आहे. शाहू महाराजांनी दिलेला समतेचा विचार डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रपटांच्या माध्यमातून रुजवला. कलेच्या माध्यमातून राज्याला नवी दिशा देण्याचे काम डॉ.  पटेल यांनी केले असल्याचे यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितले. जिल्हा पुरवठा अधिकारी तथा ट्रस्टच्या सदस्य सचिव मोहिनी चव्हाण मोहिनी चव्हाण यांनी मानपत्राचे वाचन केले. राजदीप सुर्वे यांनी आभार मानले.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes