चौथीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतूनच हवे, पाचवीपासून हिंदी शिकवण्यास हरकत नाही –शरद पवार
schedule27 Jun 25 person by visibility 13 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण हे मातृभाषेतूनच हवे. यामुळे हिंदीची सक्ती योग्य नाही. पाचवीपासून हिंदी शिकवण्यास हरकत नाही. हिंदीकडे दुर्लक्षित करुन चालणार नाही. काराण देशात ५५ टक्के लोक हिंदी बोलतात’अशी स्पष्ट भूमिका माजी केंद्रींयमंत्री शरद पवार यांनी मांडली. पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर होते. शुक्रवारी, (२७ जून २०२५) सकाळी त्यांची पत्रकार परिषद झाली.
राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी विषय सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, ‘खरं तर, पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण हे मातृभाषेतून हवे. यामुळे सरकारचा हिंदी सक्तीचा हट्ट नको. ’ शक्तीपीठ महामार्ग संबंधी प्रश्न उपस्थित झाल्यावर पवार यांनी, शक्तीपीठ प्रकल्पाच्या दोन्ही बाजू समोर येत नाहीत, तोपर्यंत अधिक भाष्य करता येणार नाही. सरकारने त्यांची भूमिका पटवून दिली तर समजून घेता येईल. तसेच याप्रश्नी शेतकरी नेते राजू शेट्टी व सहकाऱ्यांची शक्तीपीठ महामार्गला विरोध का आहे हे देखींल समजून घ्यायचंय आहे असे सांगितले. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात मुंबईत संयुक्तपणे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे, यावर बोलताना पवार म्हणाले,‘मी, त्या दोघांची विधाने वाचली आहेत, मुंबईत गेल्यावर त्यांच्या भूमिका समजून घेऊ.कोणीही सांगतो म्हणून सहभागी होता येणार नाही.’ पत्रकार परिषेदला समरजितसिंह घाटगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार आदी उपस्थित होते.