महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर कोल्हापूर : कोल्हापूर शहर परिसरातील रस्ते दुरुस्तीसह विविध समस्या मार्गी लावा अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केल्या. आमदार ऋतुराज पाटील यांनी काँग्रेसच्या माजी नगरसेवकासहित शहरातील घटना संदर्भात महापालिका प्रशासक के मश यांच्याशी चर्चा केली त्यांना निवेदने दिले.
थेट पाइपलाइनद्वारे सुरळीत पाणी पुरवठा, शहर आणि उपनगरातील रस्त्यांची दुरुस्ती व नालेसफाई करा, पाणी पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करा, रंकाळा प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उभारणी करावी अशा सूचना आमदार पाटील यांनी प्रशासकांना केली.
कोल्हापूर शहर आणि उपनगर भागातील विविध मूलभूत समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी आमदार पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के . मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व अन्य अधिकाऱ्यासोबत ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात बैठक घेतलीं.
टेंबलाईवाडी येथील महानगरपालिकेच्या १२ हजार चौरस फूट जागेमध्ये क्रीडांगण विकसित करावे, रंकाळा प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उभारणी करावी अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी केल्या. याबाबतचा प्रस्ताव शासनाकड पाठवला जाईल असे प्रशासकांनी सांगितले. कसबा बावडा येथील झूम प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत . शहरातील कचऱ्याचा उठाव वेळेवर होत नाही. यावर कायमस्वरूपी उपाय शोधणे गरजेचे आहे ,असे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, दुर्वास कदम, मधुकर रामाणे, दिग्विजय मगदूम, सुयोग मगदूम आणि प्रवीण केसरकर यांनीही शहरातील समस्या मांडल्या.