+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान adjustसज्जनशक्ती परिषदेत अजित ठाणेकरांच्या उमेदवारीचा जागर
1001130166
1000995296
schedule02 Jul 24 person by visibility 246 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  :   ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेला सुरुवात झाली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना सरकारतर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. सोमवारी १ जुलैपासून या योजनेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने राज्यातील माता - भगिनींसाठी सुरु केलेली योजना असून या योजनेपासून कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहता कामा नये, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष  राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथील बैठकीत दिल्या. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. 
  क्षीरसागर यांनी, योजनेची अंमलबजावणी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात झाली पाहिजे. ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका बालविकास प्रकल्प अधिकारी शहरी भागात वॉर्ड ऑफिसर यांनी अत्यंत जबाबदारीने काम करून प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. शहरी भागात अर्ज प्रक्रिया गतिमान करण्यासाठी नॅशनल अर्बन रिन्यूअल मिशन अंतर्गत कार्यरत असणाऱ्या बचत गटांचे सहाय्य घ्यावे. सेतू सुविधा केंद्राकडून अर्ज भरून घेण्यासाठी काही रक्कमची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत याबाबत जिल्हाधिकारी यांनी सेतू चालकांची बैठक घेऊन त्यांना सक्त सूचना द्याव्यात व असे गैरप्रकार होत असतील तर त्यांच्यावर कारवाई करून प्रसंगी त्यांची परवानगी रद्द करावी. मार्च २०२४ पर्यंत काढलेले उत्पन्नाचे दाखले या योजनेसाठी ग्राह्य धरले जातील तसेच जुना रहिवास दाखला असल्यास नव्याने काढण्याची आवश्यकता नाही याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने जनजागृती करावी, अशा सूचना दिल्या
 या बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती वाईगडे  उपस्थित होते.