+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदादा, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! आपल्या मार्गदर्शनाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळतेय प्रेरणा ! ! adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक
1001157259
1001130166
1000995296
schedule18 Oct 24 person by visibility 97 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. राज्याचा सर्वंकष विकास हे सूत्र डोळयासमोर ठेवून सरकार काम करत आहे. विकासाच्या पातळीवर राज्य नेहमी अग्रस्थानी राहावे यासाठी सरकार कटिबद्ध आहे. गेल्या दोन-अडीच वर्षात महाराष्ट्रात आठ लाख कोटीची गुंतवणूक झाली. लोकाभिमुख योजना आणि विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी संबंधी रिपोर्ट कार्ड लोकांच्या हाती देणारे हे पहिलेच सरकार आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतील साथ द्यावी’असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
‘महायुती –काम हीच ओळख’ या नावांनी सरकारच्या विविध लोकल्याणकारी योजनांची व कामकाजाची माहितीयुक्त ‘रिपोर्ट कार्ड २०२२-२४’ प्रकाशित केले आहे. यासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत क्षीरसागर बोलत होते. नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, शिवसेनेचे शिवाजी जाधव, किशोर घाटगे, उदय भोसले, रणजीत साळोखे, राष्ट्रवादीचे उत्तम कोराणे आदींच्या उपस्थितीतमध्ये रिपोर्ट कार्ड प्रकाशित केले.
भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, ‘ राज्यातील जनता महायुती सरकारला पुन्हा निवडून देईल.महायुतीच सगळे कार्यकर्ते महायुती सरकार सत्तेवर आणण्यासाठी जीवापाड प्रयत्न करतील. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळेल. विरोधकांकडे उमेदवारांची वानवा आहे.’ पत्रकार परिषदेला शिवसेनेचे निलेश हंकारे, महिला आघाडीच्या मंगल साळोखे, पूजा भोर, भाजपाच्य गायत्री राऊत आदी उपस्थित होत्या.
……………………………………….
महायुतीतील सगळे घटक पक्ष मनाने एक
 पत्रकार परिषदेत राजेश क्षीरसागर यांनी महायुती सरकारच्या विकासकामांचा आलेख मांडला. राज्यातील सरकार हे संयमी आहे. ‘जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. महिलांना एसटी प्रवासात सवलत, लाडकी बहिण योजना, मुलींना उच्च शिक्षण मोफत, ज्येष्ठ नागरिकांना सुविधा, युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, कृषी पंप वीज बिल माफ असे विविध निर्णय घेत सरकारने लोकाभिमुख कामकाज केले आहे. विधानसभा निवडणुकीत वरिष्ठ जो आदेश देतील तो आम्हाला मान्य आहे. महायुतीतील सगळे घटक पक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मनाने एक आहेत. कोणतेही रुसवे फुगवे नाहीत.’असे क्षीरसागर यांनी सांगितले.