+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदादा, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! आपल्या मार्गदर्शनाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळतेय प्रेरणा ! ! adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक
1001157259
1001130166
1000995296
schedule21 Oct 24 person by visibility 500 categoryशैक्षणिक
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनधी, कोल्हापूर :  करवीर तालुका शिक्षक- शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप करण्यात आले. तसेच सभासदांना सात टक्के लाभांश वाटप केले. शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. 
 याप्रसंगी पदोन्नती मिळालेल्या केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, व्हिडीओ निर्मितीमध्ये यश मिळविलेल्या शिक्षकांचा व विविध संस्थावर चेअरमन व संचालक म्हणून निवड झालेल्या शिक्षकांचा सत्कार करणेत आला. पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव पाटील यांनी प्रास्ताविक केले.  प्रशांत पोतदार यांनी पतसंस्थेच्या पारदर्शी कारभाराविषयी माहिती दिली. यावेळी सर्जेराव सुतार, साताप्पा चौगले, बाळासो चौगले, बाजीराव कांबळे, श्वेता खांडेकर, उत्तम पोकर्णेकर यांची भाषणे झाली.
  अध्यक्षीय भाषणात राजाराम वरुटे यांनी पतसंस्था स्थापन करताना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागले यासंबंधीची माहिती दिली. तसेच संघटनात्मक कामांचा आढावा घेतला. संघटनेशिवाय पर्याय नाही.  सर्वांनी संघटनेच्या पाठीशी रहावे असे आवाहान केले. तसेच नुतन केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांनी चांगले काम करुन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल याकडे लक्ष द्यावे असे सांगितले. 
     यावेळी मारुती दिंडे, बंडोपंत संकेश्वरे शिवाजी भोसले, संजय ठाणेकर, संताजी पाटील, सरदार सरनोबत, नवनाथ व्हरकट, पांडू कुंभार, पंढरी काशीद उपस्थित होते. व्हाइस चेअरमन  वर्षा सनगर यांनी आभार मानले.