+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदादा, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! आपल्या मार्गदर्शनाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळतेय प्रेरणा ! ! adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक
1001157259
1001130166
1000995296
schedule21 Oct 24 person by visibility 87 categoryराजकीय
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : उमेदवारी मागण्याचा हक्क सर्वांना आहे पण आपली उमेदवारी गेल्या अडीच वर्षापूर्वीच फायनल झाली आहे. येत्या २८ ऑक्टोबरला शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष  राजेश क्षीरसागर यांनी शिवाजी पेठ पदाधिकारी मेळाव्यात प्रचाराचे रणशिंग फुंकले. 
  शिवसेनेच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात विभागवार मेळावा आयोजित करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी मंदिर येथे शिवाजी पेठेतील पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. 
याप्रसंगी बोलताना क्षीरसागर म्हणाले,  ‘विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार आणि मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे पुन्हा विराजमान होणार यात तिळमात्र शंका नाही. परंतु, शिवसैनिकांनी गाफील राहून चालणार नाही. रात्र वैऱ्याची आहे त्यामुळे मतदानाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत सतर्क राहून आपली जबाबदारी पार पाडावी. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील जनतेला न्याय दिला. कोल्हापूर साठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला.  कोल्हापूर शहराच्या विकासात होणारी भर या कामांची शिदोरी घेवून मतदारांपर्यंत पोहचा. ’
क्षीरसागर म्हणाले, ‘निश्चितच शिवाजी पेठ आणि शिवसेनेचे नात असून कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची मुहूर्तमेढ शिवाजी पेठेतून रोवली गेली आणि आजही शिवसेनेचा धनुष्यबाणच शिवाजी पेठवासीयांच्या मनावर कोरला गेला आहे यात शंका नाही. त्यामुळे गांधी मैदान, रंकाळा तलाव आदी प्रश्न मार्गी लावणे हे माझे कर्तव्य समजतो. शिवाजी पेठेच्या आणि कोल्हापूर शहराच्या विकासाचे ध्येय आपण ठेवले असून, हे ध्येय पूर्ण करून दाखवू.’
 जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मार्गक्रमण करत आहे. राजेश क्षीरसागर यांनी  केलेल्या कामाचे श्रेय इतर लाटण्याचा प्रयत्न करतात पण कोल्हापूरच्या जनतेसमोर त्यांचे पितळ उघडे पडत आले आहे. टीका-टिप्पणी पेक्षा कामाला महत्व देणारे क्षीरसागर हेच कोल्हापूर उत्तरच खर उत्तर आहेत. त्यांना शिवाजी पेठ परिसरातून प्रचंड बहुमताने मताधिक्य देवू, अशी ग्वाही दिली.
 मेळाव्याला शिवसेना महानगरप्रमुख शिवाजीराव जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, युवासेना शहरप्रमुख मंदार पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.  उपशहरप्रमुख अंकुश निपाणीकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, सरिता हारुगले, युवासेनेचे प्रसाद चव्हाण, शहरप्रमुख पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे, योगेश चौगले, धनाजी कारंडे, सचिन राऊत, अमित चव्हाण, निलेश गायकवाड, कपिल सरनाईक, रुपेश इंगवले, भाऊ गायकवाड, शैलेश साळोखे, सुनील भोसले, शुभम शिंदे आदी उपस्थित होते.