महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी, (१५ ऑक्टोबर २०२४) जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची, नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू होऊ शकते.
महाराष्ट्रातील २८८ जागा तर झारखंडमधील ८१ जागासाठी निवडणूक होणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. महायुती व महाविकास आघाडीतर्फे विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.