Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पालखी सोहळयात गोकुळची सेवा, वारकऱ्यांना साहित्य वाटपकोल्हापुरात उभारणार मराठी सिने कलाकारांचे म्युझियम, चित्रनगरीत चित्रपट शिक्षण केंद्र- मंत्री आशिष शेलारधनंजय महाडिक सिनेमा कलाकार ! तरुणपणी केलेली कृष्णाची भूमिका !! कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूरच्या पर्यटकाचा मृतदेह सापडलासरकारकडून चित्रपट महामंडळावर अन्याय, अनुदान योजनेवरील सदस्यत्व घेतले काढूनआलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात दहा जुलैला सांगलीत मोर्चाशिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवले !  हर्षल सुर्वे, विशाल देवकुळेंना नवी जबाबदारी!शिक्षण सहसंचालक कार्यालयावर अखेर अॅक्शन, तीन अधिकारी निलंबितजिल्हा परिषदेचा कर्मचारी कावळेसाद दरीत कोसळला,बचाव पथकाकडून शोध कार्यकम्प्युटर-डिजीटल साक्षरतेसाठी जयंत आसगावकरांचे कार्य अनुकरणीय-माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

जाहिरात

 

शहरातील वाहतूक-पार्किंगला शिस्त लागणार, सुट्टीच्या दिवशी शाळांच्या मैदानावर पे अँड पार्क !

schedule19 Jun 25 person by visibility 304 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : कोल्हापूर शहरात वाढत्या वाहतुकीच्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिक्रमण हटविणे, नवीन पार्किंगची सोय करणे, झेब्रा क्रॉसिंग, रोड मार्किंग, ट्रॅफिक वॉर्डन नियुक्ती, विविध दिशा दर्शक फलक अशा विविध उपाययोजना तातडीने राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित विभागांना दिल्या. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सुट्टीच्या काळात मेन राजाराम हायस्कूल, पेटाळा मैदान, प्रायव्हेट हायस्कूल मैदान व खराडे महाविद्यालय या ठिकाणी ‘पे अँड पार्क’ तत्वावर खासगी पार्किंग सुरु करण्यासंबंधी सूचना केल्या. याबाबत शाळांशी बोलून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. शाळा सुटण्याच्या वेळेचे नियोजन करून त्या भागातील गर्दी टाळण्यासाठी नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

 जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी शहरात रहदारी सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना हाती घेण्याची सूचना केली.  बैठकीला महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, परिवहन विभाग, वाहतूक विभाग, महापालिका, सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शहरातील प्रमुख रस्त्यांवरील स्टॅन्ड बोर्ड, छपरी, पायऱ्या, दुकानांपुढील अतिक्रमण तत्काळ काढावे. दुकानदारांनी आपली व कामगारांची वाहने इतरत्र पार्क करून ग्राहकांच्या वाहनांसाठी जागा सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध करून द्यावी. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते रंकाळा रोड साईड पांढरे पट्टे मारणे, पान लाईन, चप्पल लाईन ते पापाची तिकटी ते गंगावेश ते रंकाळा स्टॅंड ते रंकाळा टॉवर तसेच बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक नो थांबा करणे. रंकाळा टॉवर ते डी मार्ट या दरम्यान रस्त्याच्या बाजुचा वॉकींग ट्रॅकचे खांब काढून त्याठिकाणी दुचाकी व चार चाकी पार्कींग करणे शक्य आहे का यावर चर्चा झाली.

 महाद्वार रोड व ताराबाई रोड अतिक्रमण, रोड साईड मार्कींग, ताराबाई रोड पी-१,पी-२ पार्किगबाबत नियोजन करण्यात आले. भवानी मंडपमधील अतिक्रमण व वाहने काढणे, पर्यटकांच्या वाहनाकरीता भवानी मंडप कमानीजवळ ड्रॉपींग पॉईट करणे. ट्रॅव्हल्स बसेस या दाभोळकर सिग्नल ते ताराराणी सिग्नल चौक या  मार्गावर पिकअपसाठी थांबतात. त्यामुळे सायंकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी होते. ट्रॅव्हल्स बसेससाठी ताराराणी पुतळा, पाण्याच्या टाकीजवळ पार्कींग सुविधा करण्याच्या सूचना दिल्या. तावडे हॉटेल येथील बस स्टॉपची जागा बदलणे, त्याठिकाणच्या रस्त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. सासने मैदान ते आदित्य कॉर्नर पी-१.पी-२ पार्किंग व्यवस्था करणे. याबाबत पुढील आठ दिवसात कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes