Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वेंगुर्लातील बॅरिस्टर खर्डेकर कॉलेज ठरले सर्वोत्तम ग्रामीण महाविद्यालय ! मुंबई विद्यापीठाकडून बहुमान !!आयआरसीटीसीतर्फे ऑक्टोबरमध्ये रेल्वेद्वारे उत्तर भारत देवभूमी यात्रामेन राजाराममध्ये रानभाज्या महोत्सव उत्साहातविद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत बदल ! आता ना कोणी पुढे-ना कोणी मागे !पन्नास टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र !७५ टक्के अनुदानावर दोन शेळी गट वाटप योजना !कोल्हापूर -सांगली जिल्हा परिषदेत येणार महिलाराज, अध्यक्षपद सर्वसाधारण महिलासाठी राखीवकौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे रत्नाप्पाण्णा अभिवादन सप्ताहसरसकट टीईटी उत्तीर्णतेबाबत पुनर्विचार व्हावा, कार्यरत शिक्षकांना सूट मिळावीना शोध समिती - ना जाहिरात, कुलगुरू निवड प्रक्रिया लांबणीवर ! नवे कुलगुरू लाभणार २०२६ मध्ये ! !कोणत्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने अतिक्रमणे वाढली ? महाद्वार रोड, ताराबाई रोड अतिक्रमणमुक्त करा

जाहिरात

 

मेन राजाराममध्ये रानभाज्या महोत्सव उत्साहात

schedule12 Sep 25 person by visibility 25 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर या प्रशालेतील कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते. प्राचार्य गजानन खाडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले.

याप्रसंगी प्राचार्य खाडे म्हणाले, ‘सध्याच्या जंकफूड,फास्टफुडच्या जमान्यात औषधी रानभाज्या, पालेभाज्यांचा वापर दैनंदिन आहारात कमी होताना दिसत आहे.वेगवेगळ्या असणा-या या पालेभाज्या,त्यांचे नित्याच्या जीवनातील महत्व मोठे आहे. आजची  तरूणाई  रानभाज्या व पालेभाज्या खाण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.. त्यांनी आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपल्या जेवणात या ऋतूनुसार नैसर्गिक उगवणा-या रानभाज्या खाल्या पाहिजेत.’असे त्यांनी नमूद केले. श्रुतिका कोंडाने सर्व भाज्याची माहिती विस्ताराने सांगितली.

यामध्ये सलोनी बारे, प्रतिक्षा बोडके,सिद्धी माने,मेहजबीन मुल्लाणी, श्रेया कळंत्रे, प्रतिक्षा काटे, श्रुतिका कोंडा, जयश्री पाटील, श्रुतिका भोपळे,अंजली कांबळे, सुप्रिया तिबिले, दिव्या धावले,पुनम कुंभार,श्रद्धा कोळी, अमृता जगताप, माया भुजिंगे, स्वराजंली पाटील या विद्यार्थिनींनी पातरी,नाल,करडई, मोहोर,तांदुळ, पालक,चाकवत, शेवगा, पोकळा, शेपू, मेथी, चवळीची, भोपळीची भाजी, अळूच्या वड्या,शेंगदाणे,दोडका, कडिपत्ता,कारले चटणी,ठेचा,बाजरी, तांदूळ,ज्वारी,मका भाकरी,सॅलड अशा वैविध्यपूर्ण भाज्या आणून या महोत्सवाचे वेगळेपण जपले. प्रा. अनिल लाड यांनी स्वागत केले. प्रा बाबासाहेब माळवे यांनी प्रास्ताविक केले. प्रा बी टी यादव यांनी आभार मानले.याप्रसंगी उपप्राचार्या प्रा. वनिता खडके, प्रा राहूल देशमुख, प्रा अयोध्या धुमाळ, प्रा दिपा लोहार, प्रा रेश्मा पाटील, प्रा. प्रमिला मळगे, प्रा. एस वाय कुंभार,प्रा एच एम काटकर,प्रा विकास पाटील,प्रा भाऊसाहेब धराडे, डॉ संतोष माने, प्रा. सृष्टी तांदळे उपस्थित होते.या महोत्सवाचे संयोजन प्रा. सुषमा पाटील यांनी केले.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes