Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उद्योजकतेचे रोपटे तरुणाईत रुजवण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची- श्रीनिवास चेटलापल्लीभक्तीतून घडतेय सहजसेवा ! रौप्यमहोत्सव अन्नछत्राचा, देणाऱ्या हातांचा - दातृत्वाच्या ओंजळीचा !!इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने !  आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय, भाजपवर हल्लाबोल !!जाधव गुरूजींच्या निरुपणाने तुकाराम गाथेच्या अभ्यासाची परंपरा समृध्द- विचारवंत डॉ.सदानंद मोरेजयप्रभा संवर्धन-सुशोभीकरणाचा प्रस्ताव सादर करा - उपमुख्यमंत्र्यांच्या महापालिका आयुक्तांना सूचनाबी.एस.पाटील यांचे लेखन हृदयस्पर्शी अन् प्रवाही -  डॉ.माणिकराव साळुंखेयशवंत ब्रिगेडतर्फे स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांचे वाटपभाजपा शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट, विश्वकर्मा योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणीशिवनेरीनगर मित्र मंडळतर्फे हनुमान जन्मोत्सवानिमित्ति विविध कार्यक्रमस्नेहसंगीत प्रतिज्ञाच्या सांगितिक मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध

जाहिरात

 

 पंचगंगा कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त, मे महिन्यात नव्याने निवडणुका

schedule04 Apr 25 person by visibility 58 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केंद्रीय सहकार खात्याने देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. त्याचवेळी नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. निवडणुकीच्या नव्या कार्यक्रमानुसार ११ मे २०२५ रोजी मतदान आणि बारा मे रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान केंद्रीय सहकार खात्याच्या य आदेशाने कारखान्याचे विद्यमान चेअरमन पी. एम. पाटील यांना धक्का बसला.

जानेवारी २०२५ मध्ये पंचगंगा कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीत सत्तारुढ गटाने १७ पैकी १७ जागा बिनविरोध केल्या होत्या. दरम्यान कारखान्याचे माजी अध्यक्ष रजनी मगदूम यांनी कारखान्याची झालेली पंचवार्षिक निवडणूक बेकायदेशीर होती. चुकीच्या पद्धतीने  विरोधकांचे अर्ज बाद केले होते असा आक्षेप नोंदवित होते. तसेच त्यांनी केंद्रीय सहकार खात्याकडे तक्रार केली होती. त्या निवडणुकीत विरोधकांचे सर्व अर्ज बाद ठरविले होते. वार्षिक सभेला गैरहजर, उमेदवारांच्या सूचक-अनुमोदकांकडून दरवर्षी ऊस पुरवठा न होणे या कारणावरुन अर्ज बाद ठरविले होते.

केंद्रीय सहकार खात्याने या तक्रारीची दखल घेत संचालक मंडळ बरखास्त करत नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश दिले. केंद्रीय सहकार खात्याच्या आदेशानुसार नव्याने निवडणूक कार्यक्रम होत आहे. यामध्ये २९ एप्रिल ते ३ मे या कालावधीत अर्ज भरणे, पाच मे रोजी अर्जांची छाननी, सहा मे अर्ज माघारी असा निवडणूक विषयक कार्यक्रम आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes