Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मुंबईने एक लाख प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम उभारावे, सरकार सहकार्य करेल –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराधानगरीतील गुडाळमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेशगृहमंत्रीपदासाठी मुश्रीफ हे एक उत्तम चॉईस ठरले असते! संजय राऊत यांचे पुस्तकातून प्रकटीकरण !!खासदार महाडिकांचे गोकुळसंदर्भात ज्ञान कमी, डोंगळेंच्यावर अविश्वास ठराव आणण्याची वेळ येणार नाही – आमदार सतेज पाटीलगांधीनगर प्रादेशिक पाणी पुरवठा कामावरुन अधिकारी धारेवर, तर एमजीपीसह मेघा इन्फ्रास्ट्रक्चरच्या कार्यालयाला टाळे -आमदार सतेज पाटीलगार्डन्स क्लबतर्फे कोल्हापुरात दोन दिवसीय ग्रीन शॉपीचे आयोजनवीज कंत्राटी कामगार कायम कधी होणार ? दहा जूनच्या निर्णयाकडे लक्ष !कोल्हापुरात निघणार शनिवारी तिरंगा पदयात्रा, दसरा चौकातून प्रारंभ19 संचालक एकसंघ, आघाडीच्या नेतेमंडळीच्या मार्गदर्शनाखालीच काम ! अरुण डोंगळे एकाकी ?व्यवसाय परवाना फी दरवाढ कमी होणार ! महापालिका उपायुक्तांची चेंबरच्या शिष्टमंडळाला ग्वाही !

जाहिरात

 

गृहमंत्रीपदासाठी मुश्रीफ हे एक उत्तम चॉईस ठरले असते! संजय राऊत यांचे पुस्तकातून प्रकटीकरण !!

schedule16 May 25 person by visibility 334 categoryराजकीय

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : माजी खासदार शिवसेना नेते संजय राऊत यांनी "नरकातला स्वर्ग" हे पुस्तक लिहिले आहे. गेल्या वर्षी ईडीने अटक केल्यानंतर शंभर दिवसांच्या  तुरुंगवासात त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवारी १७   मुंबईत होत आहे. दरम्यान या  पुस्तकात खासदार राऊत यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासंबंधी एक परिच्छेद लिहिलेला आहे. यामध्ये त्यांनी ‘राज्याच्या गृहमंत्रीपदासाठी मुश्रीफ हे उत्तम चॉईस ठरले असते.’असे लिहिले आहे.

या पुस्तकाच्या पान नंबर १०२  वर खासदा राऊत यांनी लिहिलेले आहे,  " महाविकास आघाडी सरकारचे बाळंतपण साधे नव्हते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर गृहखाते कोणाकडे जाणार यावर पैजा लागल्या. अजित पवार पहाटेचा शपथविधी आटोपून रिक्त हस्ते पुन्हा स्वगृही परतले होते. त्यांचा विचार होईल, असे मला वाटले नव्हते. छगन भुजबळ हे तुरुंगातून सुटून आले तरी त्यांच्यावर खटले चालू होते. भुजबळ यांची गृहमंत्री होण्याची इच्छा प्रबळ होती. त्यांच्यात क्षमताही होती पण त्यांच्या तुरुंग प्रवासाची अडचण ठरली असावी.

जयंत पाटील यांना गृहमंत्रिपदाची जबाबदारी नकोच होती. 'तो एक थँकलेस जॉब आहे,' असे त्यांचे म्हणणे होते. वळसे-पाटील यांच्या प्रकृतीच्या कुरबुरी होत्या. कोल्हापूरचा हसन मुश्रीफ हा एक रांगडा व तगडा गडी. मुश्रीफ हे एक उत्तम चॉईस ठरले असते. परंतु ते मुसलमान असल्याने प्रत्येक गोष्टीत त्यांना टार्गेट केले जाईल, अशी भीती पवारांना वाटली. खरं तर मुश्रीफ हे कमालीचे पुरोगामी. पक्के निधर्मी आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व. शाहू महाराजांवर अपार श्रद्धा असलेले कार्यकर्ते. पण शेवटी धर्म आडवा आला."
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes