![](_MaharashtraNews1/u/pos/202404/1000147006cl01F6--800.jpg)
वीरशैव बँकेचे अध्यक्ष सदानंद हत्तरकी यांचे निधन
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील वीरशैव को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सदानंद राजकुमार हत्तरकी यांचे बुधवारी (तीन एप्रिल) निधन झाले. मृत्यूसमयी ते ५० वर्षाचे होते. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याचे ते संचालक होते. गोकुळचे माजी चेअरमन राजकुमार हत्तरकी व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखा हत्तरकी यांचे ते चिरंजीव होते.
सदानंद हत्तकरी हे विविध सामाजिक संघटनांशी निगडीत होते. त्यांची शांत व संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळख होती. हलकर्णी विद्या प्रसारक मंडळाचे ते सर्वेसर्वा होते. त्यांची नोव्हेंबर २०२३ मध्ये वीरशैव बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. दरम्यान गेले आठ दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती. बेळगाव येथील केएलई हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले. हलकर्णी येथे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने गडहिंग्लज तालुक्यातील उमदे व आश्वासक नेतृत्व हरपले अशा शब्दांत शोक व्यक्त होत आहे.