Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषद - पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन दिवस लांबणीवरवारसा आबाजींचा…वसा समाजकार्याचा !ङघ यययकेआयटीमध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा प्रा.जयसिंग सावंत यांना जीवनगौरव पुरस्कार ! शंकरराव घाटगे शिक्षण प्रसारक मंडळातर्फे शुक्रवारी संस्कारसोहळा कार्यक्रम !!नवे सभागृह…नवे गटनेते, महापालिका राजकारणात लागणार कसोटी !करवीर निवासिनी गृहतारण सहकारी संस्थेचे उद्घाटन, सभासदांच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल- जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे साधेपणाने होणार क्रिडाईच्या दालन प्रदर्शनाचा प्रारंभ विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू, बारामतीत विमान कोसळले जिल्हा परिषदेसाठी 241 उमेदवार! पंचायत समितीसाठी 455 जण रिंगणात !!

जाहिरात

 

जिल्हा परिषद - पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन दिवस लांबणीवर

schedule29 Jan 26 person by visibility 136 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन दिवस लांबणीवर पडल्या. पाच फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान होणार होते. आता नव्या वेळापत्रकानुसार सात फेब्रुवारी रोजी मतदान आणि नऊ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. राज्य सरकारने राज्यात तीन दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन दिवस पुढे ढकलल्या आहेत. निवडणूक आयोगाने यापूर्वी पाच फेब्रुवारीला मतदान आणि सात फेब्रुवारीला मतमोजणी असा कार्यक्रम जाहीर केला होता. आता सात फेब्रुवारी रोजी मतदान होईल आणि नऊ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांनी सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सात फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes