Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जज फब तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडस्ट्री रेडी इंजिनिअर प्रोग्रामउद्योजक रवींद्र माणगावे यांचा भाजपात प्रवेशसौंदत्ती यात्रेसाठी एसटी भाडे- खोळंबा आकारात विशेष सवलत : आमदार राजेश क्षीरसागरजिल्ह्यातील ५८ ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीस, तर सरपंचावरही कारवाई ! सीईओंनी काढला आदेशकागलात दोन उमेदवारांची माघार, मुश्रीफांच्या स्नुषा बिनविरोधशिरोली एमआयडीसीत युवा उद्योजकात मारहाण, मोटारीची तोडफोडसमरजितसिंह घाटगे राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाहीत, जनता निवडणुकीत धडा शिकवेल – व्ही. बी. पाटीलआमची युती सत्तेसाठी नव्हे तर कागलच्या विकासासाठी - जनतेच्या भल्यासाठी : हसन मुश्रीफ, समरजितसिंह घाटगेकेआयटी बेस्ट नॉलेज सेंटर या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

जाहिरात

 

जज फब

schedule19 Nov 25 person by visibility 2 category

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


*संवेदनशील कृतज्ञता........🤝*


सन २०१९ च्या महापुरामध्ये आपल्या तालुक्यातील बाधित शाळांच्या मदतीसाठी सारा महाराष्ट्र धावून आला होता. ते ऋण आपण विसरू शकत नाही. त्या ऋणाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुराने बाधित झालेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी शिरोळ तालुका शैक्षणिक मंचच्या माध्यमातून आपल्या शिक्षक परिवाराकडून मदतनिधी उभारण्याचा संकल्प केला होता. त्याला अत्यंत संवेदनशीलपणे सक्रिय प्रतिसाद देत तालुक्यातील तुम्हा सर्व शिक्षक परिवाराने एक लाखाहून अधिक निधी जमा केला.

 त्या निधीतून पुराने बाधित झालेल्या शाळांसाठी आपण चांगल्या पद्धतीची पोर्टेबल साउंड सिस्टीम (माईकसह), अवांतर वाचनाची पुस्तकं आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य संच ( पाण्याची बाटली, वह्या,पेन,पेन्सिल व स्कुलबॅग) खरेदी केल्या.

सोमवार दि.१७ नोव्हेंबर २०२५ रोजी हे सर्व मदत साहित्य सोलापूर जिल्ह्यातील वाकाव,मुंगशी व नाडी आणि धाराशिव जिल्ह्यातील नालगाव,वडणेर व देऊळगाव या गावातील आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांना पोहोच केले आहे.अत्यंत योग्य ठिकाणी मदत पोहचल्याचे समाधान आहे.

या सत्कार्यात संवेदनशीलपणे मदतीचा हात देणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींचे मनःपूर्वक कृतज्ञ आभार !! 'एक वही एक पेन' या संकल्पामध्ये सामील झालेल्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप धन्यवाद...!!

लवकरच मदत अभियानाची सविस्तर माहिती आणि मदतनिधीबाबतचा हिशोब सादर करीत आहोत.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*शिरोळ तालुका शैक्षणिक मंच*

ठठ बबब

schedule06 Oct 25 person by visibility 103 category

*बातमीपत्र*

*व्यापारी-उद्योजकांच्या असणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक होईपर्यंत महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून पाठपुरावा करणार- रवींद्र माणगांवे*

*कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*

 

कोल्हापूर दि. ६: व्यापारी-उद्योजकांच्या असणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक होईपर्यंत महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र माणगांवे यांनी प्रतिपादन केले. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, व्यापारी-उद्योजकांना व्यवसाय करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण त्या अडचणींमध्ये संधी शोधून आपला व्यवसाय टिकवून ठेवावा. वीज दरवाढीचे मोठे संकट व्यापारी-उद्योजकांसमोर आ वासून उभे आहे. वीज नियामक आयोगाने आपल्याच आदेशाला स्थगिती दिल्याने जुनाच आदेश कायम राहण्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून संघटीतपणे लढा लढूया. कोल्हापुरी चप्पल बाबत महाराष्ट्र चेंबरने सर्वप्रथम प्रश्न उचलून धरला होता. त्यावर ब्लॉक अँड चेन ही व्यवस्था अभ्यास करुन कोल्हापूरात क्लस्टर होणेसाठी चर्चा करेल असे सांगितले. फूड सेफ्टी कायद्यानुसार उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी आवश्यक असणारी NABL लॅब कोल्हापूर- सांगली परिसरात होणेसाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. त्याबाबत संबंधीत मंत्र्यांशी लवकरच चर्चा करणार आहे. व्यवसाय कर व मार्केट सेस रद्द होणेसाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. केंद्र शासनाने जीएसटी 2.0 लागू केल्याने वस्तूंच्या किंमती कमी झाल्याने त्याचा फायदा ग्राहकांसोबतच व्यापारी-उद्योजकांनाही होणार आहे. व्यापारी-उद्योजकांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून २ दिवसांत उद्योगमंत्री उदय सामंत व पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन जरुर ती कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. 

कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी अहवाल सालात केलेल्या कार्याचा सविस्तर आढावा वार्षिक सभेत सांगितला. त्यानंतर मार्गदर्शन कार्यक्रमाच्या स्वागतपर भाषणात वीज दरवाढ, परवाना धारकांच्या भाड्याचा प्रश्न, फूड सेफ्टी कायद्यानुसार कराव्या लागणाऱ्या तपासणी लॅब कोल्हापूरात होणेसाठी तसेच केवळ महाराष्ट्रात वसूल केला जाणारा व्यवसाय कर व मार्केट सेस कमी करणेसाठी महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची विनंती केली. 

महाराष्ट्र चेंबरच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी निवड झालेबद्दल रवींद्र माणगांवे यांचा कोल्हापूर चेंबरचे माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया व आनंद माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

माजी आमदार व संचालिका जयश्री जाधव, माजी आमदार प्रदीपभाई कापडिया, माजी अध्यक्ष आनंद माने यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी भरत ओसवाल, लक्ष्मण पटेल, सुभाष जाधव, अभिजित डुबल यांनी वेगवेगळ्या पदांवर मिळविलेल्या नोवलौकीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष रमाकांत मालू, कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष व स्मॅक चे अध्यक्ष राजू पाटील, वैभव सावर्डेकर, जयेश ओसवाल, अजित कोठारी, राहुल नष्टे, संपत पाटील, अनिल धडाम, दिलीप मोहिते, प्रकाश केसरकर, शिवराज जगदाळे, इंजिनिअरिंग असोसिएशनचे व्हाईस चेअरमन श्रीकांत दुधाणे, गोशिमाचे अध्यक्ष सुनिल शेळके, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे व सभासद मोठ्या संख्यने उपस्थित होते.

उपाध्यक्ष धनंजय दुग्गे यांनी सर्व सभासदांचे स्वागत केले. आभार मानद सचिव प्रशांत शिंदे यांनी मानले. सूत्रसंचालन सीमा जोशी यांनी केले.

ठठ थथथ

schedule16 Sep 25 person by visibility 172 category

प्रेस नोट

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार "स्वस्थ नारी सशक्त परिवार" या अभियानात दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यात सर्व ठिकाणी २० प्रकारचे उपक्रम

कोल्हापूर, १५ सप्टेंबर २०२५

मा. प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा यांच्या मार्गदर्शना खाली कोल्हापूर जिल्हया मध्ये "स्वस्थ नारी सशक्त परिवार" या अभियानात दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी ८१ आरोग्य वर्धीनो केंद्र, नगरपालिका सर्व आरोग्य नागरी केंद्रे व ४१३ उपकेंद्र ठिकाणी २० प्रकारचे उपक्रम दिनांक १७सप्टेंबर २०२५ रोजी पासुन मोहिम सुरू करण्यात येणार आहे.

'स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरुकता वाढवण्यासाठी आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी यांच्यामार्पन्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान हे विशेष अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. महिलांच्या आरोग्य तपासणीसह उपचार व आवश्यक संदर्भ सेवा व समुपदेशन करण्यात येणार आहे. विशेषतः सर्व माता व मुली, महिलांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेएन यांनी केले आहे.

या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी शिक्षित करणे, जागृत करणे आणि त्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणेत आले आहे. या शिबिरांमध्ये महिलांच्या स्तन आणि गर्भाशयाच्या कॅन्सर निदान. यामध्ये विशेषतज्ज्ञ यांच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्र यामध्ये सदरील शिबिर घेण्यात येणार आहेत यसाठी सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज असून या अभियानात जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आरोग्यवर्धिनी केंद्र सहभागी होणार आहेत. या अभियानामुळे महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याविषयी प्रोत्साहन मिळेल आणि गंभीर आजारांचे लवकर निदान होऊन योग्य वेळी उपचार सुरू करण्यास मदत होईल, यामुळे स्वस्थ नारी, सशक्त परिवार हे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल.

अभियानातील उपक्रम

सर्व महिलांसाठी तपासणी आणि आरोग्य सेवा

१. रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंत रोग तपासणी

२. स्तन व गर्भाशय मुख व मुख कर्करोग तपासणी
3. ३. गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी

४. लसीकरण सेवा, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी

५. क्षयरोग तपासणी

६. सिकसेल आजार व रक्तक्षय तपासणी

७. विशेष तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन निरोगी जीवनशैली आणि पोषण निरोगी जीवनशैली आणि पोषण

८. स्थानिक व क्षेत्रीय आहाराला प्रोत्साहन देणे.

९. गरोदर आणि स्तनदा मातांसाठी तसेच लहान बाळांसाठी योग्य आहार.

१०. मासिक पाळी स्वच्छता व पोषण

११. टेक-होम राशन (THR) चे वितरण

१२. आरोग्य सेवा घेणे सोपे करण्यासाठी

१३. माता व बालसुरक्षा (एमसीपी) कार्ड

१४. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नोंदणी

१५. आयुष्मान वय वंदना कार्ड

१६. सिकल सेल कार्ड

१७. पोषण ट्रॅकर मध्ये लाभार्थी नोंदणीनागरिकांचा सक्रिय सहभाग नागरीकांचा सर्कीय सहभाग

१८. रक्तदान शिबीर

१९. निक्षय मित्र स्वयंसेवक नोंदणी

२०. अवयवदान नोंदणी

या अभियानामध्ये प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील सर्व महिला व माता यांना तपासणीसाठी सक्रियपणे सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आबाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेएन, उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांनी केले आहे

(डॉ. अनिरुध्द पिंपळे)

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर

णणजझ त

schedule31 May 25 person by visibility 456 category

संजय घोडावत विद्यापीठातील ओंकार पडळकरचे क्रीडा स्पर्धेत यश

schedule18 Apr 25 person by visibility 535 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: संजय घोडावत विद्यापीठाचा विद्यार्थी ओंकार पडळकर याने ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी बेस्ट फिजिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकून विद्यापीठाचा गौरव वाढवला आहे. तसेच, त्याने आय एफ बी बी युनिव्हर्सिटी २०२४ हा प्रतिष्ठेचा किताब जिंकत आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप निर्माण केली आहे.

या यशाबद्दल विद्यापीठाचे  विश्वस्त  विनायक भोसले,  कुलगुरू डॉ. उद्धव भोसले,  कुलसचिव डॉ. विवेक कायंदे,  क्रीडा अधिकारी  सुर्यजीत घोरपडे यांनी ओंकारचे अभिनंदन केले. या यशामध्ये विद्यापीठाचे चेअरमन  संजयजी घोडावत यांचे  प्रोत्साहन आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. ओंकारच्या या मेहनती आणि कौशल्यामुळे त्याची निवड २०२५ मध्ये होणाऱ्या
अर्नोल्ड क्लासिस स्पर्धेसाठी झाली आहे.

अभाविप

schedule23 Dec 22 person by visibility 817 category


कोल्हापूर :  "जेथे जेथे विद्यार्थी आहे, तिथे तिथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यरत असेल" असा विश्वास अभाविपचे प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५७ वे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशच्या तीन दिवसीय अधिवेशनाला शुक्रवारी सुरुवात झाली. 
 अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (२३ डिसेंबर) प्रदेश अध्यक्ष व प्रदेश मंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षीय मनोगत मांडत असताना प्रदेश अध्यक्ष प्रा. निर्भयकुमार विसपुते यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या विद्यार्थी परिषदेच्या कार्यांची माहिती उपस्थितांना सांगितली. अभाविपचे अमृत महोत्सवी वर्ष आपण सर्वजण अतिशय उत्साहाने साजरा करीत आहोत.     अनिल ठोंबरे म्हणाले, " बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली अशा छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व संघर्षाच्या लढ्याच्या प्रतिनिधित्वाची साक्ष देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात  ५७ वे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन होत आहे " याचा मला विशेष आनंद असल्याचे प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी सांगितले.
या अधिवेशनात वर्ष २०२२ - २०२३ ची नविन कार्यकारिणी घोषित करण्यात येणार आहे. आज या नविन वर्षासाठी पुननिर्वाचित घोषित झालेल्या प्रदेश अध्यक्ष प्रा. निर्भयकुमार विसपुते व प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी त्यांचा पदभार स्विकारला. 
 
G20 : विश्वपटल पर भारत या विषयावर अभाविप चे क्षेत्रीय सहसंघटन मंत्री राय सिंह यांनी सर्व विद्यार्थ्यांना संबोधित केले. भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. तर पुढील अमृत काळामध्ये तरूणांची भुमिका ही महत्वाची राहणार आहे. असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. येत्या काही वर्षांत भारतात देशा बाहेरून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, हाच दूर दृष्टीकोन ठेवून विद्यार्थी परिषदेने वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट्स अँड युथ या गतिविधी ची स्थापना केली होती. मी, माझ गाव, माझ शहर इतकाच विचार न करता जागतिक पातळीवरचा विचार करण्याची गरज आहे असे आवाहन त्यांनी तरूणांना केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes