Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
लवकरच आरोग्य क्षेत्रातील सर्वच विभागांसाठी पुरस्कार सुरु करणार- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरशारंगधर देशमुख उतरले मैदानात, मंगळवारपासून शारंग चषक फुटबॉल स्पर्धा !दहावीचा मंगळवारी ऑनलाइन निकाल ! मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्धता !!यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक राज्यव्यापी दौऱ्यावर, नागपूर येथून सुरुवातमहात्मा बसवण्णांच्या वचनात मराठीतील प्रबोधन परंपरेचे मूळ – प्राचार्य राजेखान शानेदिवाणशिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शाहू मानेंचा केआयटीत सत्कारसतेज पाटलांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नगरसेवकांचे प्रीतीभोजन, खुलेपणाने रंगली राजकारणावर चर्चा !किसनराव मोरे ट्रस्टतर्फे पुरस्कार जाहीर, बुधवारी पुरस्कार वितरण समारंभकोल्हापूर उद्यम  सोसायटीच्या अध्यक्षपदी जयश्री जाधव, उपाध्यक्षपदी सुधाकर सुतारकोल्हापुरातून सात शहरांशी थेट विमानसेवा, मुंबई-अहमदाबाचे विमान आता ७६ आसनी !

जाहिरात

 

कारखान्याचे कार्यालय फोडून कागदपत्रे पळविण्याचा विरोधकांचा डाव - अध्यक्ष दिलीप पाटील यांचा आरोप

schedule05 Apr 23 person by visibility 1091 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
राजाराम कारखान्याची निवडणूक रंगात आली असताना मंगळवारी रात्री एक खळबळ जनक प्रकार उघडकीला आला आहे विरोधी आघाडीच्या वीस ते पंचवीस जणांनी रात्रीच्या अंधारात कारखान्यात जबरदस्ती घुसून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. कारखान्याच्या सुरक्षारक्षकांना दमदाटी करून घुसलेल्या विरोधकांनी केलेला हा प्रकार निंदनीय आहे अशी टीका अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केली. लोकशाहीच्या आणि नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या विरोधकांनी काल मात्र आपले खरे रूप दाखवून दिले. राजाराम कारखाना कार्यस्थळावर रात्री अकराच्या सुमारास कारखान्याचे प्रमुख कार्यालय फोडून कागदपत्रे लंपास करण्याचा त्यांचा बेत होता असा आरोप अध्यक्ष पाटील यांनी केला. सुरक्षारक्षकांनी आरडाओरडा करताच त्यांना आल्या पावली धुम ठोकावी लागली. एक प्रकारे निवडणुकीपूर्वीच कारखान्यावर दरोडा टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय . मुद्दाम सुट्टीच्या दिवशी आणि रात्री अपरात्री येऊन कारखाना कर्मचाऱ्यांमध्ये दहशत वाजवण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी सांगितले.सभासदांच्या हक्काची भाषा करणाऱ्या विरोधकांनी लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरे जायला हवं होतं पण आपला पराभव समोर दिसत असल्याने विरोधक आता गुंडगिरीवर उतरले आहेत अशी टीका अध्यक्ष पाटील यांनी केली. या  प्रकरणाची तक्रार देण्यासाठी राजाराम कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील आणि शिष्टमंडळ जिल्हा पोलीस प्रमुखांची सायंकाळी सहा वाजता भेटणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes