+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust कोल्हापूर जिल्ह्यात ३९ कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ! पंतप्रधानांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन adjustमिरवणुकीत मंडळाचा साऊंड मोठाच ! ध्वनी प्रदूषण पातळी गतवर्षीपेक्षा यंदा वाढली !! adjustअन्यायी धोरणाविरोधात शिक्षकांचे आंदोलन, काळया फिती लावून काम ! प्रशासकीय व्हॉटसअॅप ग्रुपमधून लेफ्ट !! adjustकेआयटीत विद्यार्थ्यांच्या हितासाठी पालक - शिक्षक समन्वयाला प्राधान्य- साजिद हुदली adjustडॉ. सी.डी. लोखंडे अव्वल जागतिक संशोधकांच्या यादीत adjustकोल्हापुरात जल्लोषी १७ तास मिरवणूक ! विद्युत रोषणाईचा झगमगाट, वाद्यांचा गजर, लेझीमचा ताल अन् ढोलताशांचा निनाद !! adjustकोल्हापुरात चाकूने भोसकून तरुणाचा खून, हातगाडी लावण्यावरुन उफाळला वाद adjustकोल्हापूर अर्बन बँकेची १११ वी वार्षिक सभा खेळीमेळीत, दहा टक्के लाभांश वितरित करणार ! adjustराजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेतर्फे पारितोषिक वितरण adjustवसंतराव देशमुखांच्या आठवणींनी शिक्षक-मुख्याध्यापक-संस्थाचालक गहिवरले
1000926502
1000854315
schedule16 Sep 24 person by visibility 80 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा २०२४ सालचा सतीश काळसेकर काव्य पुरस्कार हा ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील (संभाजीनगर ) यांना तर ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार हा वीरधवल परब (वेंगुर्ला) यांना जाहीर झाला. यासंबंधीची माहिती कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के यांनी दिली. काळसेकर काव्य पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. सतीश काळसेकर काव्य पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह आणि रोख २१ हजार रूपये असे आहे. कवी ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह व रोख १० हजार रुपये असे आहे.
मराठीतील ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काळसेकर कुटुंबियांनी शिवाजी विद्यापीठाकडे दिलेल्या देणगीतून मराठी कवितेमध्ये भरीव योगदान दिलेल्या मान्यवर कवीला अनुक्रमे सतीश आणि ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार देण्यात येतो. मराठी कविता समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ कवीस ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ आणि तरुण कवीस ‘ऋत्विज काळसेकर’ यांच्या नावाने पुरस्कार देण्याची योजना विद्यापीठाने तयार केली आहे. त्यानुसार २०२४ चे वरील काव्य पुरस्कार अनुक्रमे पाटील आणि परब यांना देण्यात येत आहेत.
कवयित्री अनुराधा पाटील यांचे ‘दिगंत’ ‘तरीही’, ‘दिवसेंदिवस’, ‘वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’,‘कदाचित अजूनही’ हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. अनुराधा पाटील यांच्या कवितेने मराठी कवितेत एक वेगळी वाट निर्माण केले आहे. विविध रूपांतील स्त्री जीवनाच्या दु:ख, सोशिकता आणि एकाकीपणाचा उद्गार त्यांच्या कवितेत असला तरीही आक्रोशाची, विद्रोहाची किंवा पराभवाची किनार त्यांच्या कवितेला नाही. अनुराधा पाटील यांच्या कवितेला साहित्य अकादमी पुरस्कार-२०१९, महाराष्ट्र फाउंडेशन तसेच अनेक महत्त्वपूर्ण साहित्य पुरस्कारांनी गौरविले आहे. तर वीरधवल परब यांनी आपल्या कवितेतून सुस्त व्यवस्थेवर उपरोध, उपहासात्मक शब्दांनी परखड भाष्य, तगमग व्यक्त केली आहे. वर्तमानातील समाज स्थिती, बदलांवर निरीक्षणे नोंदवणारी कविता ते लिहीत आहेत. ‘मम म्हणा फक्त’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित आहे.
पुरस्कार निवड समितीचे सचिव म्हणून मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी तर निवड समितीमध्ये सदस्य म्हणून डॉ. नितीन रिंढे (मुंबई), डॉ. मेघा पानसरे, डॉ. रणधीर शिंदे यांनी काम पाहिले. या पुरस्काराचे वितरण शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे लवकरच केले जाणार आहे. अशी माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू शिर्के यांनी